शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

आज नवरात्रोत्सवाची धूम; गरब्याला मिळणाऱ्या प्रतिसादावर होणार विपरीत परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 23:44 IST

बुधवार पासून आदिशक्तीचे आगमन होत असून जिल्ह्यात ८३८ सार्वजनिक दुर्गामाता मंडळाचे आॅनलाइन अर्ज आले असून त्यातील ७७३ सार्वजनिक आणि २४ खाजगी ठिकाणी मुर्ती स्थापना होणार आहे.

पालघर: बुधवार पासून आदिशक्तीचे आगमन होत असून जिल्ह्यात ८३८ सार्वजनिक दुर्गामाता मंडळाचे आॅनलाइन अर्ज आले असून त्यातील ७७३ सार्वजनिक आणि २४ खाजगी ठिकाणी मुर्ती स्थापना होणार आहे. देवीच्या आगमनाची व स्थापनेची तयारी पूर्ण झाली असून हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.नुकत्याच शांततेत पार पडलेल्या गणेशोत्सवानंतर पालघर जिल्हावासीयांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले होते. हा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळे मोठ्या उत्साहाने कामाला लागली आहेत. हा स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जात असल्याने तो पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी महिलांची मोठी धावपळ सुरू आहे. नऊ दिवस चालणाºया या उत्सवामध्ये गरबा, दांडिया खेळण्यासाठी तरुण-तरुणी वेगवेगळ्या पोषाखाची खरेदी करून सज्ज झाली असून गरब्याच्या नवनवीन स्टेप्स शिकण्यासाठी कोर्स ही पूर्ण करण्यात आल्याचे विणाली नाईक यांनी लोकमतला सांगितले.बाजारात हार, फुले, धूप, अगरबत्ती आदी पूजा साहित्याच्या खरेदीसाठी तर घट स्थापनेसाठी लागणाºया रंगीबेरंगी घट, देवीचे मुखवटे यांची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे ८३८ सार्वजनिक दुर्गामाता मंडळाचे अर्ज नोंदणी करीत प्राप्त झाले असून ७७३ सार्वजनिक व अन्य रूपात २४ दुर्गादेवीची स्थापना होणार आहे. तसेच २० ठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रमही साजरे केले जाणार आहेत. हा नवरात्रोत्सवाचा सण शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण आणि विजयकांत सागर ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, ११४ पोलीस अधिकारी, १ हजार ४६० पोलीस कर्मचारी,एक एस आरपी कंपनी, २५० होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी राखीव पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी २४ तास पोलीस बंदोबस्त सज्ज राहणार आहे. रेकॉर्ड वरील गुन्हेगार आणि अवैध धंद्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली असून संशयास्पद बाबीची माहिती नागरिकांनी पोलिसांना अथवा नियंत्रण कक्षाला द्यावी असे आवाहन केले आहे.आवाज आणि कालावधीच्या बंधनाने तरुणाई झाली नाराजनवरात्रोत्सव व मिरवणूकीमध्ये डिजे वरील बंदी कायम असल्याने आयोजकांना गरबा डान्स स्पर्धा वेळेच्या आत आवराव्या लागणार आहेत. त्यामुळे गरबा प्रेमीत नाराजी आहे. किती व कोणत्या दिवशी गरब्याचा कालावधी वाढेल हे ही अद्याप जाहिर व्हायचे आहे.तरुणाईने तºहेतºहेचे पोषाख आणि दांडिया खरेदी केल्या असल्यातरी १० च्या आतच दांडिया संपवायचा असल्याने व त्याचा आवाजही हळू ठेवावा लागणार असल्याने तिच्यामध्ये नाराजी आहे. याचा परिणाम गरब्याला मिळणाºया प्रतिसादावर होणार आहे.आवाज आणि खेळण्याच्या वेळेवर लादलेली बंधने यामुळे यंदा गरब्याला मिळणाºया प्रायोजकांमध्ये मोठी घट झाली आहे. ही घट संख्या आणि प्रायोजकत्वाची रक्कम अशा दोनही रुपात झाली आहे. आगामी वर्ष निवडणूकीचे असल्याने गतवर्षीपेक्षा यंदा स्थिती बरी आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार