शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आज नवरात्रोत्सवाची धूम; गरब्याला मिळणाऱ्या प्रतिसादावर होणार विपरीत परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 23:44 IST

बुधवार पासून आदिशक्तीचे आगमन होत असून जिल्ह्यात ८३८ सार्वजनिक दुर्गामाता मंडळाचे आॅनलाइन अर्ज आले असून त्यातील ७७३ सार्वजनिक आणि २४ खाजगी ठिकाणी मुर्ती स्थापना होणार आहे.

पालघर: बुधवार पासून आदिशक्तीचे आगमन होत असून जिल्ह्यात ८३८ सार्वजनिक दुर्गामाता मंडळाचे आॅनलाइन अर्ज आले असून त्यातील ७७३ सार्वजनिक आणि २४ खाजगी ठिकाणी मुर्ती स्थापना होणार आहे. देवीच्या आगमनाची व स्थापनेची तयारी पूर्ण झाली असून हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.नुकत्याच शांततेत पार पडलेल्या गणेशोत्सवानंतर पालघर जिल्हावासीयांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले होते. हा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळे मोठ्या उत्साहाने कामाला लागली आहेत. हा स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जात असल्याने तो पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी महिलांची मोठी धावपळ सुरू आहे. नऊ दिवस चालणाºया या उत्सवामध्ये गरबा, दांडिया खेळण्यासाठी तरुण-तरुणी वेगवेगळ्या पोषाखाची खरेदी करून सज्ज झाली असून गरब्याच्या नवनवीन स्टेप्स शिकण्यासाठी कोर्स ही पूर्ण करण्यात आल्याचे विणाली नाईक यांनी लोकमतला सांगितले.बाजारात हार, फुले, धूप, अगरबत्ती आदी पूजा साहित्याच्या खरेदीसाठी तर घट स्थापनेसाठी लागणाºया रंगीबेरंगी घट, देवीचे मुखवटे यांची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे ८३८ सार्वजनिक दुर्गामाता मंडळाचे अर्ज नोंदणी करीत प्राप्त झाले असून ७७३ सार्वजनिक व अन्य रूपात २४ दुर्गादेवीची स्थापना होणार आहे. तसेच २० ठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रमही साजरे केले जाणार आहेत. हा नवरात्रोत्सवाचा सण शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण आणि विजयकांत सागर ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, ११४ पोलीस अधिकारी, १ हजार ४६० पोलीस कर्मचारी,एक एस आरपी कंपनी, २५० होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी राखीव पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी २४ तास पोलीस बंदोबस्त सज्ज राहणार आहे. रेकॉर्ड वरील गुन्हेगार आणि अवैध धंद्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली असून संशयास्पद बाबीची माहिती नागरिकांनी पोलिसांना अथवा नियंत्रण कक्षाला द्यावी असे आवाहन केले आहे.आवाज आणि कालावधीच्या बंधनाने तरुणाई झाली नाराजनवरात्रोत्सव व मिरवणूकीमध्ये डिजे वरील बंदी कायम असल्याने आयोजकांना गरबा डान्स स्पर्धा वेळेच्या आत आवराव्या लागणार आहेत. त्यामुळे गरबा प्रेमीत नाराजी आहे. किती व कोणत्या दिवशी गरब्याचा कालावधी वाढेल हे ही अद्याप जाहिर व्हायचे आहे.तरुणाईने तºहेतºहेचे पोषाख आणि दांडिया खरेदी केल्या असल्यातरी १० च्या आतच दांडिया संपवायचा असल्याने व त्याचा आवाजही हळू ठेवावा लागणार असल्याने तिच्यामध्ये नाराजी आहे. याचा परिणाम गरब्याला मिळणाºया प्रतिसादावर होणार आहे.आवाज आणि खेळण्याच्या वेळेवर लादलेली बंधने यामुळे यंदा गरब्याला मिळणाºया प्रायोजकांमध्ये मोठी घट झाली आहे. ही घट संख्या आणि प्रायोजकत्वाची रक्कम अशा दोनही रुपात झाली आहे. आगामी वर्ष निवडणूकीचे असल्याने गतवर्षीपेक्षा यंदा स्थिती बरी आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार