शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन शिथिल झाले तरी मोलकरणींवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 23:32 IST

शासनाने लॉकडाऊन शिथिल केला असला तरी कामवाल्या बार्इंना कामावर येण्यास मज्जाव केला जात आहे

प्रतीक ठाकूर ।

विरार : एप्रिलपासून सुरू झालेल्या लॉकडाऊन कालावधीचे टप्पे खबरदारीच्या कारणास्तव वाढत गेल्याने हातावर पोट असलेल्या असंख्य नागरिकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्याने कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा कसा? असा प्रश्न त्यांना पडला असून घरोघरी धुणीभांडी करणाऱ्या मोलकरणींवर उपासमारीची वेळ आली आहे.

शासनाने लॉकडाऊन शिथिल केला असला तरी कामवाल्या बार्इंना कामावर येण्यास मज्जाव केला जात आहे. कोरोनाच्या भीतीने हा निर्णय घेतला जात आहे. कोरोनासारख्या जागतिक आपत्तीने वसई-विरार महापालिका परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत जाणाºया कर्मचाऱ्यांमुळे महापालिका हद्दीत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला. त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर अद्याप कायम आहे.शासनाने लॉकडाऊनचे नियम शिथिल केले असले तरी घराबाहेर पडताना नागरिक दहावेळा विचार करत आहेत. अशा वेळी बाहेरून घरी कामासाठी येणाºया मोलकरीण बार्इंना कामावर बोलावण्याचा धोका कोणीही पत्करायला तयार नाही. घरचे काम कष्टाचे असले तरी कोणताही धोका न पत्करता गृहिणीच घरची कामे करत आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये पुरूषही घरीच अडकून पडल्याने घरची कामे करण्यास ते गृहिणींना मदत करत आहेत. त्यामुळे कामवाल्या बार्इंना घरी कामासाठी बोलावण्याच्या मनस्थितीत सध्यातरी काही मंडळी नाहीत.शासनाचे दुर्लक्ष नको!या काळात त्यांच्या होणाºया उपासमारीकडे शासनाने कानाडोळा करू नये. जेवढे शक्य होईल तेवढी मदत शासकीय पातळीवरून या गरीब बार्इंना पोहोचवण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार