शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हॉटेलमध्ये थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 00:20 IST

बंदुकीच्या धाकावर लुटले : चार तासांत तीन आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद

पालघर/तलासरी/कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल ‘आकाश’च्या मालकाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून १ लाख १० हजारांची रक्कम घेऊन पळून जाणाऱ्या तीन आरोपींना अवघ्या चार तासांत अटक करण्यात पालघर पोलिसांना यश मिळाले आहे. या कामी उत्कृष्ट कार्य करणाºया पोलिसांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी सांगितले.

कासा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या धुंदलवाडीजवळील हॉटेल ‘आकाश’मध्ये बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास २० ते २२ वयोगटातील तीन तरुण जेवण करण्यास आले. जबरी चोरी करण्याचा डाव असल्याने जेवण करता करता त्यांनी हॉटेलमधील सर्व व्यवस्थेची पाहणी केली. जेवण आटोपल्यानंतर त्या तीन इसमांपैकी एकाने बाहेर जात आपली कार सुरू केली, तर हॉटेलमध्ये असलेल्या अन्य दोन तरुणांनी हॉटेलचे मालक नितेश यादव (३०) यांच्यावर रिव्हॉल्वर रोखून त्यांच्याकडील १ लाख १० हजाराची रक्कम घेऊन पळून जाऊ लागले. या वेळी मालकाने आरडाओरड केल्याने हॉटेलमधील वेटर आणि जवळच असलेल्या ट्रकमधील चालक मदतीला धावले. दोन्ही आरोपी आपल्या गाडीकडे धाव घेताना उपस्थितांनी कारचालकावर हल्ला चढवीत गाडीची चावी काढून घेतली. आपल्याला घेरण्यात आल्याचे लक्षात आल्यावर त्यातील एकाने आपल्याकडील रिव्हॉल्वरमधून तीन राऊंड फायर केले. त्यामुळे उपस्थित सर्व जण थोडे मागे हटले. ही संधी साधीत तीनही आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला.पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, डहाणूचे मंदार धर्माधिकारी, बोईसरचे विश्वास वळवी यांच्या सहकार्याने १२० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या टीम बनवून परिसरात नाकाबंदी केली. घटनास्थळी मिळालेल्या महत्त्वपूर्ण पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अवघ्या चार तासांत पकडण्यात यश मिळवले.काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या ताब्यातघटनास्थळी दोन काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या आरोपींवर मध्य प्रदेशमध्येही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पुढील तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी आरोपींची नावे जाहीर केलेली नाहीत. या प्रकरणाचा पुढील तपास कासा पोलीस ठाण्याच्या सिद्धवा जायभाये या करणार असून या प्रकरणी उत्कृष्ट तपास करणाºयांना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार