शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

डहाणूत अन्न सुरक्षा योजनेचे तीनतेरा

By admin | Updated: August 4, 2015 03:21 IST

डहाणू तालुक्यात गेल्या मे, जून, जुलै महिन्याचा अन्न सुरक्षा योजनेतून मिळणारा धान्यसाठा रास्तभाव दुकानदारांना मिळाला नाही. या प्रकारामुळे डोंगरकुशीत

डहाणू : डहाणू तालुक्यात गेल्या मे, जून, जुलै महिन्याचा अन्न सुरक्षा योजनेतून मिळणारा धान्यसाठा रास्तभाव दुकानदारांना मिळाला नाही. या प्रकारामुळे डोंगरकुशीत राहणाऱ्या हजारो आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी डहाणू रास्तभाव दुकानदारांच्या एका शिष्टमंडळाने डहाणू तहसीलदारांना केली आहे.साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या व सत्तर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या डहाणू तालुक्यात एकूण ७५ हजार रेशनकार्डधारक असून त्यात ४५ हजार कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहे. डहाणू तालुक्यात गेल्या चोवीस वर्षांपासून केंद्र शासनाने उद्योगबंदी लादल्यामुळे येथे कायमस्वरूपी रोजगार मिळत नाही. परिणामी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या स्वस्त तांदूळ, गहू, साखर, तेल, रॉकेल आदी वस्तूंचा येथील हजारो आदिवासी कुटुंबांना मोठा आधार असतो. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून येथील रास्तभाव दुकानदारांना धान्य मिळत नाही. मागील आघाडी सरकारने जानेवारी २०१४ पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा योजना सुरू केली. त्यानुसार अंत्योदय व दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका लाभार्थ्याला प्रति माह ३५ किलो धान्य तसेच प्राधान्य कुटुंबाला पाच किलो प्रति माह धान्य पुरविण्यात येत होते. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाने मोठ्या प्रमाणात धान्यसाठ्यात कपात केल्याने गोरगरिबांना प्रचंड महागाईत जीवन जगणे अत्यंत कठीण झाले आहेत. त्यातच गेल्या मे, जून, जुलैपासून बहुसंख्य धान्य दुकानदारांनी पैसे भरून धान्याचे परमिटदेखील मिळविले. परंतु, एफसीआय (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) मधून होणाऱ्या अपुऱ्या धान्य पुरवठ्याने दुकानदार व रेशनकार्डधारक त्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)