शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

महसूल कर्मचाऱ्यांची ३५२ पदे जिल्ह्यात रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:24 IST

पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा अशा आठ तालुक्यांचा समावेश आहे.

मनोर : पालघर जिल्ह्याच्या निर्मितीला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही महसूल कर्मचाऱ्यांची तब्बल ३५२ पदे रिक्त आहेत. मात्र, ही पदे भरण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून ही पदे भरण्याची पदे भरण्यासाठी मागणी कोणी केलीच नाही.

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी महसूल विभागाचे ६५३ मनुष्यबळ मंजूर करण्यात आले. मात्र त्यापैकी पन्नास टक्के अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यावर कामाचा अधिक ताण असल्याने त्यांची मानसिकता स्थिर नाही. एका तलाठ्याला दोन ते तीन सजामध्ये काम करावे लागते.पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा अशा आठ तालुक्यांचा समावेश आहे. नायब तहसीलदार १६, अव्वल कारकून ५९, लिपिक ३९, तलाठी ६७, मंडळ अधिकारी २३, शिपाई ५६, कोतवाल ८४, वाहन चालक १४, अशी एकूण ३५२ पदे रिक्त आहेत. फक्त ३०३ अधिकारी आणि इतर कर्मचाºयांवर पालघर जिल्ह्याचे शासकीय काम मंद गतीने सुरू आहे. त्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री तसेच जिल्ह्यात असलेल्या संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासनाकडे रिक्त पदे भरण्यासाठी कधीही मागणी केली नाही. संजय गांधी योजनेचे काम देखील पूर्ण ठप्प आहे.मनुष्यबळाचे प्रमाण वाढविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. जनतेची सर्व शासकीय कामाबाबत दखल घेण्यात येईल. यापुढे प्रत्येक सोमवारी मिटिंग वगैरे घेणार नाही त्या दिवशी नागरिकांबरोबर राहून त्यांची कामे मार्गी लावण्याचे काम करणार आहे.- कैलास शिंदे,जिल्हाधिकारी, पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरार