शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
3
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
4
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
5
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
6
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
7
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
8
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
9
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
10
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
11
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
12
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
13
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
14
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
15
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
16
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
17
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
18
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
19
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
20
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!

महसूल कर्मचाऱ्यांची ३५२ पदे जिल्ह्यात रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:24 IST

पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा अशा आठ तालुक्यांचा समावेश आहे.

मनोर : पालघर जिल्ह्याच्या निर्मितीला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही महसूल कर्मचाऱ्यांची तब्बल ३५२ पदे रिक्त आहेत. मात्र, ही पदे भरण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून ही पदे भरण्याची पदे भरण्यासाठी मागणी कोणी केलीच नाही.

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी महसूल विभागाचे ६५३ मनुष्यबळ मंजूर करण्यात आले. मात्र त्यापैकी पन्नास टक्के अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यावर कामाचा अधिक ताण असल्याने त्यांची मानसिकता स्थिर नाही. एका तलाठ्याला दोन ते तीन सजामध्ये काम करावे लागते.पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा अशा आठ तालुक्यांचा समावेश आहे. नायब तहसीलदार १६, अव्वल कारकून ५९, लिपिक ३९, तलाठी ६७, मंडळ अधिकारी २३, शिपाई ५६, कोतवाल ८४, वाहन चालक १४, अशी एकूण ३५२ पदे रिक्त आहेत. फक्त ३०३ अधिकारी आणि इतर कर्मचाºयांवर पालघर जिल्ह्याचे शासकीय काम मंद गतीने सुरू आहे. त्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री तसेच जिल्ह्यात असलेल्या संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासनाकडे रिक्त पदे भरण्यासाठी कधीही मागणी केली नाही. संजय गांधी योजनेचे काम देखील पूर्ण ठप्प आहे.मनुष्यबळाचे प्रमाण वाढविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. जनतेची सर्व शासकीय कामाबाबत दखल घेण्यात येईल. यापुढे प्रत्येक सोमवारी मिटिंग वगैरे घेणार नाही त्या दिवशी नागरिकांबरोबर राहून त्यांची कामे मार्गी लावण्याचे काम करणार आहे.- कैलास शिंदे,जिल्हाधिकारी, पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरार