शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पालघर जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, १५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 05:27 IST

शुक्रवारी झालेल्या पावसात जिल्ह्यात वीज पडून महिलेसह अन्य दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दहा ते बारा लोक जखमी झाले आहेत.

पालघर/ मनोर/ कासा : शुक्रवारी झालेल्या पावसात जिल्ह्यात वीज पडून महिलेसह अन्य दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दहा ते बारा लोक जखमी झाले आहेत. पालघरमध्ये एका धोकादायक इमारतीचा मागचा भाग कोसळला. यात सुदैवाने १८ कुटुंबे वाचली आहेत. तसेच अनेक भागातील शेतकºयांच्या घराचे पत्रे वादळी वाºयाने उडून गेले आहेत. तसेच कापणी करून शेतात रचलेले पीक भिजल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर वीजपुरवठा खंडित झाल्याने रेल्वेही उशिराने धावल्या.शुक्रवारी पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, विक्रमगड, वसई तालुक्यांत संध्याकाळी ५ वाजता विजेच्या वादळीवारी, कडकडाटासह पडलेल्या पावसाने धुमाकूळ घातला.मनोरजवळील म्हसकर पाड्यातील संगीता सखाराम सुतार (४१), आंबेदा येथील वसंत कृष्णा पाटील (५४) तर विक्रमगड तालुक्यातील एकनाथ काशिनाथ शेलार (३५, रा. केव) या तिघांचा मृत्यू झाला. नारायण खेवटा व अन्य १० ते १२ लोकांच्या अंगावर वीज कोसळली. तर एकूण १५ जखमी झाले आहेत.जुना पालघर येथील प्रकाश बेकरी नामक धोकादायक ठरवलेल्या दोन मजली इमारतीचा मागचा भाग कोसळला. सुदैवाने या इमारतीमधील १८ कुटुंबांचा जीव वाचला. तर बहाडोली येथील एका घरावर वीज पडून ते घर मधोमध चिरले गेले. यात प्राणहानी झाली नाही. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झाड पडल्याने काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.