शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

महावितरणकडे भरपाईसाठी साडेतीनशे अर्ज

By admin | Updated: July 9, 2017 01:14 IST

डहाणूतील वीज वितरण कार्यालयात सध्या ग्राहकांच्या तक्र ार अर्जाचा ओघ सुरू आहे. वीज तंत्रातील बिघाड अथवा वाढीव वीज बिलाचे आकडे कमी करण्यासाठी

- अनिरुद्ध पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : डहाणूतील वीज वितरण कार्यालयात सध्या ग्राहकांच्या तक्र ार अर्जाचा ओघ सुरू आहे. वीज तंत्रातील बिघाड अथवा वाढीव वीज बिलाचे आकडे कमी करण्यासाठी या तक्र ारी नसून त्या म्हणजे अविरत ३४ तास पुरवठा खंडित राहिल्याने साडेतीनशे ग्राहकांनी नुकसानभरपाईसाठी केलेले दावे आहेत. डहाणू शहरात ३० जून रोजी सकाळी १० वाजता वीज खंडित झाली होती. त्यानंतर तब्बल ३४ तासांनी वीज पुरवठा सुरळीत झाला. पावसाळ्याच्या हंगामात रात्री अंधारात काढाव्या लागल्यामुळे डासांचा त्रास सहन करावा लागला. रोजगारावरही त्याचा परिणाम झाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे भरपाई मिळावी या करीता डहाणू शहराच्या पश्चिमेला असलेल्या रेल्वे स्थानक परिसर, बस आगार, इराणी रोड या परिसरातील वसाहतीत राहणाऱ्या सुमारे ३५० वीज ग्राहकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या करिता वीज कायद्यातील एमईआरसी २०१३ च्या कलमानुसार प्रतितास ५० रु पयांप्रमाणे ३४ तासांचे १७०० रु पये मिळावेत असे ग्राहकांचे म्हणणे आहे. सोसायटी फॉर जस्टीस ही संस्था या प्रकरणात ग्राहकांच्या बाजूने उभी राहिली आहे. दरम्यान या प्रकरणा विषयी डहाणू वीज कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता बी. एस. धोडी यांच्याशी संपर्क साधला असता ग्राहकांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. मात्र, ३० जून या काळात तालुक्यात वादळीवाऱ्याने हा वीज पुरवठा खंडित झाल्याने नैसिर्गक आपत्ती असताना ही तरतूद लागू होत नाही. त्यामुळे अशी कोणतीही नुकसान भरपाई दिली जाणार नसल्याचे लेखी उत्तर पाठवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.नुकसान भरपाईची मागणी करणारे अर्ज वीज ग्राहकांनी कार्यालयाकडे पाठवले आहेत. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीकाळात ती तरतूद लागू नसल्याने त्यांना लाभ मिळणार नसल्याचे उत्तर पत्राद्वारे ग्राहकांना पाठविले जाणार आहे. -बी. एस. धोडी, उप कार्यकारी अभियंता, महावितरण (डहाणू)