शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

तीन साहसीवीरांनी पूर्ण केला वसई ते नेपाळ २१०० किमी सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2023 15:57 IST

काठमांडू येथील थमेल मार्केटमध्ये प्रवेश करत आपली साहसी २१०९ किमी सायकल मोहिम संपवली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- "सेव्ह ट्री, सेव लाइफ" हे ब्रीदवाक्य घेऊन वसईतील तीन साहसवीर वसई ते नेपाळ काठमांडू येथे २० ऑगस्टला सायकलवरून प्रवासाला निघाले होते. तब्बल २१०० किलोमीटरचा हा सायकल प्रवास हे तिघे २१ दिवसात पूर्ण करणार होते. मात्र या साहसी वीरांनी निर्धारित वेळेच्या तीन दिवस अगोदरच म्हणजेच १८ दिवसांत ही मोहीम फत्ते केली आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता त्यांनी नेपाळ, काठमांडू येथील थमेल मार्केटमध्ये प्रवेश करत आपली साहसी २१०९ किमी सायकल मोहिम संपवली.

ज्युड डिसोझा, सचिन कवळी व प्रणव राऊत अशी या तिघांची  नावे असून ते वसई एडवेंचर फाउंडेशनच्या माध्यमातून या मोहिमेसाठी निघाले होते. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या विमानाने हे तिघेही मुंब‌ईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. वसई एडवेंचर फाउंडेशन तर्फे वसई ते काठमांडू अशी दीर्घ अंतराची साहसी सायकल मोहीम आयोजित करण्यात आली होती. सेव्ह ट्री सेव लाइफ हा संदेश घेऊन वसई वरून हे सायकल स्वार निघाले होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पुढे भारत-नेपाळ सीमा ओलांडून तेव्हा काठमांडू येथे पोहोचले. २० ऑगस्टला वस‌ई येथून माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी या सायकल मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला होता.

या मोहिमेत सायकल स्वारांनी सायकल व्यतिरीक्त कुठलेही इतर वाहन न वापरता वसई ते काठमांडू हे २१०० किमी अंतर पार केले आहे. वसई एडवेंचर फाउंडेशन ही संस्था गेल्या ३० वर्षांपासून  गिर्यारोहण, सायकलींग, साहसी शिबिरे, पर्यटनस्थळी स्वच्छता मोहीम असे उपक्रम राबवित असून वसई तालुक्यातील कलाक्रीडा महोत्सव, वसई विजयोत्सव इत्यादी सामाजिक उपक्रमातही सक्रिय सहभागी असते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार