शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

तीन साहसीवीरांनी पूर्ण केला वसई ते नेपाळ २१०० किमी सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2023 15:57 IST

काठमांडू येथील थमेल मार्केटमध्ये प्रवेश करत आपली साहसी २१०९ किमी सायकल मोहिम संपवली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- "सेव्ह ट्री, सेव लाइफ" हे ब्रीदवाक्य घेऊन वसईतील तीन साहसवीर वसई ते नेपाळ काठमांडू येथे २० ऑगस्टला सायकलवरून प्रवासाला निघाले होते. तब्बल २१०० किलोमीटरचा हा सायकल प्रवास हे तिघे २१ दिवसात पूर्ण करणार होते. मात्र या साहसी वीरांनी निर्धारित वेळेच्या तीन दिवस अगोदरच म्हणजेच १८ दिवसांत ही मोहीम फत्ते केली आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता त्यांनी नेपाळ, काठमांडू येथील थमेल मार्केटमध्ये प्रवेश करत आपली साहसी २१०९ किमी सायकल मोहिम संपवली.

ज्युड डिसोझा, सचिन कवळी व प्रणव राऊत अशी या तिघांची  नावे असून ते वसई एडवेंचर फाउंडेशनच्या माध्यमातून या मोहिमेसाठी निघाले होते. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या विमानाने हे तिघेही मुंब‌ईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. वसई एडवेंचर फाउंडेशन तर्फे वसई ते काठमांडू अशी दीर्घ अंतराची साहसी सायकल मोहीम आयोजित करण्यात आली होती. सेव्ह ट्री सेव लाइफ हा संदेश घेऊन वसई वरून हे सायकल स्वार निघाले होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पुढे भारत-नेपाळ सीमा ओलांडून तेव्हा काठमांडू येथे पोहोचले. २० ऑगस्टला वस‌ई येथून माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी या सायकल मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला होता.

या मोहिमेत सायकल स्वारांनी सायकल व्यतिरीक्त कुठलेही इतर वाहन न वापरता वसई ते काठमांडू हे २१०० किमी अंतर पार केले आहे. वसई एडवेंचर फाउंडेशन ही संस्था गेल्या ३० वर्षांपासून  गिर्यारोहण, सायकलींग, साहसी शिबिरे, पर्यटनस्थळी स्वच्छता मोहीम असे उपक्रम राबवित असून वसई तालुक्यातील कलाक्रीडा महोत्सव, वसई विजयोत्सव इत्यादी सामाजिक उपक्रमातही सक्रिय सहभागी असते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार