शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तिसऱ्या टप्प्यात १२१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:18 IST

अधिकारी-कर्मचारी नाराज : नागरिक सुखावले

आशिष राणे।लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई - विरार शहर महापालिकेचे डॅशिंग आयुक्त बळीराम पवार यांनी पुन्हा तिसºया टप्यात १२१ कर्मचाºयांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. आयुक्तांच्या या धडाकेबाज निर्णयामुळे पालिका हद्दीत काही नाखूष व कामचुकार कर्मचाºयांची ‘कही खुशी कही गम’ अशी अवस्था झाली असल्याचे समजते. किंबहुना मागील नवघर माणिकपूर नगरपरिषद स्थापनेपासून एकाच विभागात व टेबलावर फेविकॉलसारखे चिकटून बसलेल्या कर्मचाºयांना तर दणका दिला.

वसई-विरार महापालिकेत एकूण ९ प्रभाग समिती कार्यरत असून या सर्व समित्यांमधील लिपिक वरिष्ठ लिपिक, टंकलेखक, उपअधीक्षक आणि अधीक्षक पदाच्या अंतर्गत बदल्या विविध प्रभागात करून बहुतांश जणांची खाती देखील बदलण्यात आली आहेत.पालिका आयुक्तांनी रुजू झाल्यावर मे - जून नंतर जवळपास २०० पेक्षा अधिक बदल्यांचा सपाटा लावला जाईल, असे सूतोवाच केले होते, आणि ते आज खरे होताना दिसत आहे. आयुक्तांनी पहिल्या टप्प्यात जूनमध्ये नऊ प्रभाग समितीतील प्रभारी सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाºयांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये काहींना प्रभाग समितीपदी विराजमान केले तर काहींना हातात नारळ देत त्यांची पदावनती केली.गेल्या आठवड्यातच दुसºया टप्प्यातील ६४ वरिष्ठ लिपिक आणि अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या आणि आता तिसºया टप्प्यात १२१ जणांच्या बदल्या आता करण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्याची ही कदाचित पहिलीच वेळ असल्याचे सांगत आयुक्त पवार यांनी या बदल्या करताना अनेक वर्ष एकाच ठिकाणी असलेल्या कर्मचाºयांची खाती बदलल्याने धाबे दणाणले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या बदल्या झाल्याने काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तर नवीन खाती, नवीन जागी या कर्मचाºयांना जम बसण्यात वेळ लागेल आणि त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होईल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.सर्वांचे धाबे दणाणलेवसई - विरार मनपाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्याची ही कदाचित पहिलीच वेळ असल्याचे सांगत आयुक्त पवार यांनी अनेक वर्ष एकाच ठिकाणी एकाच पदाला चिकटून बसलेल्या कर्मचाºयांची खाती देखील बदलली.