शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
4
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
5
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
6
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
7
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
8
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
9
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
10
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
11
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
12
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
13
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
14
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
15
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कुंभीपाड्यात तीन वर्षे रोहयोचे कामच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:45 IST

मागेल त्याला काम आणि पंधरा दिवसात दाम या तत्वावर आधारलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा कितीही गवगवा होत असला तरी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही योजना बासनात गुंडाल्याचा प्रत्यय आदिवासीना येत आहे.

रविंद्र साळवेमोखाडा : मागेल त्याला काम आणि पंधरा दिवसात दाम या तत्वावर आधारलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा कितीही गवगवा होत असला तरी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही योजना बासनात गुंडाल्याचा प्रत्यय आदिवासीना येत आहे.आसे ग्रामपंचायतीतील २१ गावपाड्यांपैकी एक असलेल्या कुंभी पाडा येथील आदिवासीना गेल्या तीन वर्षांपासून रोजगार हमीचे कामच मिळालेले नाही. मोखाड्यापासून ३० किमी अंतरावर असलेल्या या गावाला लोकमतने भेट दिली असता येथील आदिवासीनी आपल्या व्यथा मांडल्या.या आदिवासी पाडयात कामच मिळाले नसल्याने येथील आदिवासी रोजगारा अभावी मुलाबाळांसह स्थलांतरीत झाले आहेत. येथील काही मजूरांनी महीन्याभरापूर्वी रसत्याचे काम केले आहे परंतु त्यांना त्याची मजूरी अद्यपही मिळालेली नाही गेल्या तीन वर्षात पुरेसे काम मिळाले नाही जवळपास जे मिळाले त्याचीही मजुरी मिळाली नसल्याने स्थानिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.गेल्या तीन वर्षांपासून आम्हाला रोजगार हमीचे काम मिळालेले नाही यामुळे आमचे सर्व आदिवासी बांधव मूलबाळांसह स्थलांतरीत झाले आहेत ज्यांना आम्ही मतदान केले आहे त्यांनी सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे.- चंदर सखाराम राऊत, कुंभी पाडा, ग्रामस्थआम्ही या आदिवासी पाड्याला भेट दिली यावेळी येथील आदिवासी बांधवांनी येथील समस्या व रोजगाराचा प्रश्न मांडला. त्यांना गेल्या तीन वर्षांपासून रोजगार मिळालेला नाही. यामुळे तो तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अन्यथा या मागणीसाठी आम्हाला उग्र आंदोलन उभारावे लागेल.- राजू गोविंद साळवे,कार्याध्यक्ष, आरपीआय, मोखाडा