शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

विक्रमगडच्या आमसभेला चार वर्षात मुहुर्तच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:43 IST

जनतेचा संताप लोकसभेच्या पथ्यावर; विक्रमगड मागतायत आमदारांच्या कामाचा हिशेब

- राहुल वाडेकर विक्रमगड : गेल्या चार वर्षांपासून तालुका पंचायत समितीची एकही आमसभा होऊ शकलेली नाही. ही आमसभा न घेण्याबाबत गेल्या चार वर्षांत ग्रामपंचायत, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीच्या अचारसंहितेची कारणे पुढे केली जात असली तरी आगामी लोकसभा निवडणूकीवर त्याचा निश्चित परिणाम होणार आहे. आमदारांनी केलेल्या कामाचा जनता हिशेब मागत असून आमसभेला गत चार वर्षांत मुहुर्त न सापडल्याने विक्रमगडकर संताप व्यक्त करीत आहेत.२००८ मध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेमध्ये विक्र मगड विधानसभा मतदार संघ तयार झाला. मात्र गेल्या ९ वर्षात तालुक्याचा विकासाचा वेग अजूनही मंदावलेलाच आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्ते, वीज, रोजगार अशा अनेक समस्या आ वासुन आजही उभ्या आहेत.तालुक्यातील जनतेला आपल्या सार्वजनिक समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखली जाणारी तालुक्याची आमसभा गेल्या चार वर्षांपासून झालेली नाही. आमसभेत घेतलेल्या ठरावांना, तसेच आम जनतेकडून केलेल्या सार्वजनिक कामांच्या सुचनांना अनन्यसाधारण महत्व असते. विशेषत: दरवर्षी होणाऱ्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दोन ते तीन महिने आधी आमसभा घेणे बंधनकारक असते. या आमसभांमधून घेतलेले धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतुद करता येते मात्र, गेल्या चार वर्षात तालुक्यात एकही आमसभा झालेली नाही. गेल्या चार वर्षात विक्र मगड तालुक्यात ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत विविध कामांमध्ये झालेला लाखो रु पयांचा भ्रष्टाचार, कधी सुका तर कधी ओळा दुष्काळाची शेतकऱ्यांना न मिळालेली भरपाई अशा अनेक मुद्द्यावर येथील जनतेला या तालुक्याच्या आमसभेत मांडायचे होते पण आमसभा न झाल्याने येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.आमसभेच्या माध्यमातून अनेक प्रश्न, समस्या निकाली लागतात, पण आमसभा न झाल्याने या समस्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे.- संदेश राऊत, सामाजिक कार्यकर्तआमसभा दरवर्षी होणे गरजेचे आहे. जेणे करु ण विक्र मगड तालुक्यातील खेडे-पाड्यातील प्रश्न आमदाराना कळतील. तालुक्यातील आमसभा न झाल्याणे सर्व सामन्याचे समस्या मांडायचे तरी कोणा कडे असा प्रश्न पडला आहे.- लहु नडगे, नागरिकगेल्या चार वर्षात आमसभा झाली नाही. या वर्षी ही आमसभा होणे धूसर आहे. या मागे आमदाराचे काम न करणाºया आधिकाºयाना पाठिशी घालण्याचे धोरण तर नाही ना? त्यात तालुक्यातील अनेक गैरव्यावहार उघड झाले आहेत त्यामुळे आमदारानी आमसभा घेणे गरजेचे आहे. - रविंद्र आयरे, सामाजिक कार्यकर्ते