शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारचा धबधबा ठरतोय हौशी पर्यटकांचा ‘काळ’ , पर्यटनस्थळी सुरक्षा व्यवस्थाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:50 IST

काळमांडवी धबधबा परिसरात फिरायला गेलेले जव्हारमधील दोन तरुण सेल्फीच्या नादात पाय घसरून पडले. तर त्यांना वाचवायला गेलेल्या अन्य ३ तरुणांसह ते दोघे असे एकूण ५ तरुणांचा धबधबा खोल डोहात पडून बुडाल्याची घटना २ जुलै रोजी घडली होती.

जव्हार : जव्हारपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर असलेल्या (काळशेती) नदीवरील काळमांडवी धबधबा अत्यंत धोकादायक असून त्या ठिकाणी खोल दरी आहे. याच धबधब्यात बुडून पाच तरुणांना जीव गमवावा लागल्याची घटना नुकतीच घडली होती. या धबधबाच्या पर्यटन स्थळी सुरक्षाच नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.काळमांडवी धबधबा परिसरात फिरायला गेलेले जव्हारमधील दोन तरुण सेल्फीच्या नादात पाय घसरून पडले. तर त्यांना वाचवायला गेलेल्या अन्य ३ तरुणांसह ते दोघे असे एकूण ५ तरुणांचा धबधबा खोल डोहात पडून बुडाल्याची घटना २ जुलै रोजी घडली होती. या धबधब्याच्या डोहात पडल्यानंतर चोहोबाजूंनी खडकाळ आणि संपूर्ण उताराचा भाग असल्याने त्या दुर्दैवी पाच तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता.जव्हार शहर १ जुलैपासून पूर्णपणे बंद करण्यात आल्याने, धबधब्यावर जाण्यास बंदी असतानाही हे तरुण आले कसे? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच गेल्या आठवडाभरापासून काळमांडवी धबधबा पर्यटनस्थळी येऊन काही तरुण पार्टी करत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.पाच वर्षापूर्वी गुजरात येथील२ तरुण आणि एक तरुणी असा तिघांचा दाबोसा धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पावसाळ्यात जव्हार तालुक्यातील धबधब्यांवर दरवर्षी अशा अनेक लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत, म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे.काळमांडवी धबधबा हा आपटाळे ग्रामपंचायत हद्दीत येतो. मात्र हा धबधबा धोक्कादायक आहे, असे ग्रामपंचायतीने कुठेही बोर्ड लावलेले नव्हते. बोर्ड लावून काळमांडवी धबधब्याचा डोह किती खोल आहे, यांचीही माहिती देणे आवश्यक आहे. म्हणजेच पर्यटकांनी सावधगिरी बाळगली असती, अशा दुर्दैवी घटना घडल्या नसत्या, असेही बोलले जात आहे.पर्यटनस्थळांवरबंदी : जव्हार शहरातील काळमांडवी धबधबा, दाबोसा धबधबा, भोपतगड, दादरकोपरा धबधबा, सनसेट पॉइंट, हनुमान पॉइंट, राजवाडा, विजय पॅलेस या पर्यटन स्थळांवर बंदी असतानाही लपूनछपून हे पर्यटक येतात तरी कसे? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच बंदी असतानाही त्या पर्यटन ठिकाणी जेवण, दारू पार्सल नेऊन पार्ट्या केल्या जात आहेत. याकडे आता तरी या पाच तरुणांच्या मृत्यूच्या घटनेनंतर अन्य पर्यटक धडा घेतील का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :palgharपालघर