शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

जव्हारचा धबधबा ठरतोय हौशी पर्यटकांचा ‘काळ’ , पर्यटनस्थळी सुरक्षा व्यवस्थाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:50 IST

काळमांडवी धबधबा परिसरात फिरायला गेलेले जव्हारमधील दोन तरुण सेल्फीच्या नादात पाय घसरून पडले. तर त्यांना वाचवायला गेलेल्या अन्य ३ तरुणांसह ते दोघे असे एकूण ५ तरुणांचा धबधबा खोल डोहात पडून बुडाल्याची घटना २ जुलै रोजी घडली होती.

जव्हार : जव्हारपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर असलेल्या (काळशेती) नदीवरील काळमांडवी धबधबा अत्यंत धोकादायक असून त्या ठिकाणी खोल दरी आहे. याच धबधब्यात बुडून पाच तरुणांना जीव गमवावा लागल्याची घटना नुकतीच घडली होती. या धबधबाच्या पर्यटन स्थळी सुरक्षाच नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.काळमांडवी धबधबा परिसरात फिरायला गेलेले जव्हारमधील दोन तरुण सेल्फीच्या नादात पाय घसरून पडले. तर त्यांना वाचवायला गेलेल्या अन्य ३ तरुणांसह ते दोघे असे एकूण ५ तरुणांचा धबधबा खोल डोहात पडून बुडाल्याची घटना २ जुलै रोजी घडली होती. या धबधब्याच्या डोहात पडल्यानंतर चोहोबाजूंनी खडकाळ आणि संपूर्ण उताराचा भाग असल्याने त्या दुर्दैवी पाच तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता.जव्हार शहर १ जुलैपासून पूर्णपणे बंद करण्यात आल्याने, धबधब्यावर जाण्यास बंदी असतानाही हे तरुण आले कसे? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच गेल्या आठवडाभरापासून काळमांडवी धबधबा पर्यटनस्थळी येऊन काही तरुण पार्टी करत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.पाच वर्षापूर्वी गुजरात येथील२ तरुण आणि एक तरुणी असा तिघांचा दाबोसा धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पावसाळ्यात जव्हार तालुक्यातील धबधब्यांवर दरवर्षी अशा अनेक लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत, म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे.काळमांडवी धबधबा हा आपटाळे ग्रामपंचायत हद्दीत येतो. मात्र हा धबधबा धोक्कादायक आहे, असे ग्रामपंचायतीने कुठेही बोर्ड लावलेले नव्हते. बोर्ड लावून काळमांडवी धबधब्याचा डोह किती खोल आहे, यांचीही माहिती देणे आवश्यक आहे. म्हणजेच पर्यटकांनी सावधगिरी बाळगली असती, अशा दुर्दैवी घटना घडल्या नसत्या, असेही बोलले जात आहे.पर्यटनस्थळांवरबंदी : जव्हार शहरातील काळमांडवी धबधबा, दाबोसा धबधबा, भोपतगड, दादरकोपरा धबधबा, सनसेट पॉइंट, हनुमान पॉइंट, राजवाडा, विजय पॅलेस या पर्यटन स्थळांवर बंदी असतानाही लपूनछपून हे पर्यटक येतात तरी कसे? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच बंदी असतानाही त्या पर्यटन ठिकाणी जेवण, दारू पार्सल नेऊन पार्ट्या केल्या जात आहेत. याकडे आता तरी या पाच तरुणांच्या मृत्यूच्या घटनेनंतर अन्य पर्यटक धडा घेतील का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :palgharपालघर