शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

हमालांच्या संपामुळे वसई तालुक्यात जुलैचे रेशनिंग नाही

By admin | Updated: July 30, 2015 22:50 IST

वसई तालुक्यात रेशनिंग मालाची ने-आण व चढ-उतर करणाऱ्या हमालांच्या संपामुळे वसई तालुक्यातील जनता रेशनिंगला मुकणार असून त्याचा फटका अंत्योदय कार्डधारकांना बसणार

वसई : वसई तालुक्यात रेशनिंग मालाची ने-आण व चढ-उतर करणाऱ्या हमालांच्या संपामुळे वसई तालुक्यातील जनता रेशनिंगला मुकणार असून त्याचा फटका अंत्योदय कार्डधारकांना बसणार असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे कार्डधारकांनी लोकमतला सांगितले.वसई तालुक्यात ग्रामीण परिसरात आदिवासी, गरीब नागरिकांचे वास्तव्य आहे. पावसाळयामध्ये हाताला काम कमी असल्यामुळे शासनाकडून येणाऱ्या रेशनिंग धान्यावरच त्यांची चूल पेटते. या भागातील वीट उत्पादन, रेती हे व्यवसाय बंद पडत आहेत. तर वाढत्या खर्चामुळे छोट्या शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. त्यामुळे येथील भूमीपुत्रांना रोजगार मिळेनासा झाला आहे. या वर्षी पावसाने सुरूवातीला दडी मारल्याने त्यांनी लावलेला भाजीपालाही वाया गेला आहे. त्यामुळे आता या भागातील गरीब जनतेला आधार होता तो रेशनिंगचा पण, जुलैचे रेशनिंग न आल्याने अच्छे दिन हेच का ? असा सवाल गरीब जनता विचारीत आहे. वसई तालुक्यात अन्नधान्याचा काळाबाजार होत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. तसेच दोन महिन्यांतून येणारे रेशनिंग एकच महिन्याचे मिळत असल्याने एका महिन्याचे जाते कुठे? हा ही शासनाला विचार करायला लागणारा प्रश्न आहे. शासनानेही लवकरच हा संप मिटवून रेशनिंगचे वितरण करून दिलासा द्यावा, अशी जनतेची मागणी आहे. (वार्ताहर)