शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

अंदाजपत्रकात करवाढ नाही

By admin | Updated: February 25, 2015 22:50 IST

वसई विरार शहर मनपाचा २०१५-१६ चा आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले. त्यात कोणतीही करवाढ नसून

वसई : वसई विरार शहर मनपाचा २०१५-१६ चा आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले. त्यात कोणतीही करवाढ नसून शिल्लक मात्र ३७ कोटी ५७ लाख रू. आहे. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे कर आणि दरवाढीचा बोजा सर्वसामान्य करदात्यांवर पडू नये याची काळजी घेण्यात आली आहे. एकूण २३७४ कोटी ५८ लाख रू. जमा तर २३३७ कोटी ५७ लाख खर्च दाखवण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प महासभेसमोर येणार असून त्यावर चर्चा झाल्यानंतर तो मंजूर करण्यात येणार आहे.यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा व अन्य नागरीसुविधा ४१८ कोटी, दिवाबत्ती व्यवस्था २५ कोटी, स्वच्छता व साफसफाई १३९ कोटी, अग्नीशमन ३१ कोटी, बांधकाम १ हजार ७ कोटी अशा या तरतूदी आहेत. थकीत कर वसूल करण्यासाठी अभय योजना सुरू करण्यात येणार आहे. ५ वर्षाचा कर एकाच वेळी भरणा केल्यास १५ टक्क्याची सवलत देण्यात येणार आहे. करवसूलीचे इष्टांक गाठता न आल्यामुळे करदात्यासाठी ही योजना अंमलात आणणार आहेत. सदर अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करण्यासाठी अवधी मागितला, पण त्यास नकार देण्यात आल्यामुळे विरोधी पक्ष नेते विनायक निकम, संजय कोळी व राजन पाटील यांनी सभात्याग केला. गेल्या आर्थिक वर्षात कोणत्याही योजना अंमलात येऊ शकल्या नाहीत. या योजनांचा अर्थसंकल्पामध्ये कोणताही उल्लेख नसल्यामुळे या योजना गुंडाळण्यात आल्या का? असा प्रश्न करदात्यांना पडला आहे. डहाणू तालुक्यात सुसरी नदीवर अतिरीक्त पाणीपुरवठा योजना प्रकल्प राबवण्यासंदर्भात तसेच अन्य योजनांची सद्यस्थिती याबाबत कोणतेही आकलन त्यामुळे नगरसेवक व जनतेला होत नाही, असा आक्षेप आहे. (प्रतिनिधी)