शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

घरात एकही दाणा राहिलेला नाही, कुटुंब खाणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 23:44 IST

कर्जाच्या थकबाकीचा प्रश्न : आवरे येथील शेतकरी किरपण चिंतेत, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही राहिला उभा

भातसानगर : शहापूर तालुक्यात पावसाने कहर केल्याने भातपिके हातची गेली. यामध्ये लष्करी अळीनेही होत्याचे नव्हते केल्याने आवरे येथील शेतकरी भातपिकाबाबतीत नेस्तनाबूत झाला आहे. असे कोणतेही वर्ष नाही की, जे शेतकऱ्याला फलदायी ठरले. मात्र, तरीही शेतकºयाने संकटांचा सामना करत तग धरला. मात्र, यावर्षी परिस्थिती वेगळी असून सतत पडणाºया पावसाने सारीच शेती बेचिराख झाल्याने शेतकरीच देशोधडीला लागला आहे.

आवरे येथील दत्तू बाबू किरपण या शेतकºयाने आपल्या दीड एकरच्या शेतात भातपिकाची लागवड केल्यानंतर त्याने योग्य खतांचा वापरही केला. शेतात आलेले गवत (बेननी), वाढलेले भातपीक मुसळधार पावसातही तग धरून उभे राहिले. हिरव्यागार दिसणाºया भाताच्या पातीने हळूहळू रंग बदलायला सुरुवात केली. पण, जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे भाताच्या लोंबीचा सतत पडणाºया पावसामुळे चेहरामोहरा बदलला. पावसामुळे या भातावर पडलेल्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढल्याने आज एकही दाणा या शेतकऱ्यांच्या घरात गेलेला नाही. शिवाय, त्यांनी सेवा सोसायटीचे कर्ज घेतले असून ९७ हजार रु पये थकबाकी त्यांच्यावर असल्याने आता ही भरायची कशी, असा गहन प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. तीन मुलांचा सांभाळ करणे, त्यातच दोन मुलांचा शिक्षणाचा खर्च करणे आता कसे झेपणार, ही चिंताही सतावत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार