शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

वाड्यात कारखाने हजार पण अग्निशमन दल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 00:32 IST

मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेल्या वाडा तालुक्यात गेल्या अनेक वर्षात अग्निशमन केंद्र उभारण्यात आलेले नाही.

- वसंत भोईरवाडा - मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेल्या वाडा तालुक्यात गेल्या अनेक वर्षात अग्निशमन केंद्र उभारण्यात आलेले नाही. येथील कारखान्यांमध्ये वारंवार आग लागत असून त्या विझविण्यात होणाऱ्या विलंबामुळे कारखान्यांचे कोट्यवधी रुपयंचे नुकसान होत आहे. या पट्ट्यात एक हजारांहून अधिक लहान-मोठे कारखाने आहेत तरीही अग्निशमन केंद्र नाही.वाडा तालुका डी प्लस झोन जाहीर झाल्यापासून या परिसरात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या दाखल झाल्या. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाले असून यात अनेक रासायनिक कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षाांच्या कालावधीत तालुक्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. डोंगरते येथील जे.आय.के. या रासायनिक कंपनीत रिअ‍ॅटरचा स्फोट होऊन कंपनी जळून खाक झाली. वाडा शहरातील स्वामीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून गिरणी खाक झाली. त्यात २० लाखांहून अधिक नुकसान झाले. वडवली येथे असलेल्या एका कंपनीच्या गोदामाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. सापरोडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पराग केमिकल या कंपनीचे ६० लाखांचे नुकसान झाले होते.कोडले येथील फायबर लोन प्रायव्हेट लिमिटेड ही रासायनिक कंपनी पूर्ण खाक झाली. वसुमती प्रिंट अ‍ॅण्ड पॅकेजिंग या कंपनीचे आगीत चार कोटींचे नुकसान झाले. मुसारणे फाटा येथे लाकडाच्या वखारीला आग लागून पंधरा लाखाचे नुकसान झाले होते. वाडा आगाराची एक बस पेटून आणि दोन गाड्यांना त्याची झळ लागून २० लाखांची हानी झाली होती. अशा अनेक घटना घडत असल्याने तालुक्यात अग्निशामक केंद्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.भिवंडी येथूून येतात बंबकोणत्याही कारखान्याला आग लागल्यास अथवा स्फोट झाल्यास आग विझवण्यासाठी ४० कि.मी. लांब असलेल्या असलेल्या भिवंडी अग्निशमन केंद्राचे बंब मागवावे लागतात. त्यांना काही कारणामुळे घटनास्थळी पोहोचायला उशीर होतो. वाडा आणि शेजारच्या विक्रमगड या तालुक्यात आपत्कालीन काळात जीवित तसेच वित्तहानी टाळण्यासाठी अग्निशमन दलाची आवश्यकता असल्याचे घोणसई येथील जेराई फिटनेस कंपनीचे व्यवस्थापक दिलीप लाड यांचे म्हणणे आहे.मी वाड्यात नवीन आहे. त्यामुळे याविषयी योग्य ती माहिती घेतो. मात्र, हा महत्त्वाचा विषय असल्याने यासंदर्भात तातडीने काहीनाकाही उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासंदर्भात नगरपंचायत प्रशासनाशी बोलून वरिष्ठ पातळीवर व्यवहार करू.- डॉ. उद्धव कदम,तहसीलदार, वाडा

टॅग्स :Vasai Virarवसई विरार