शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

वाड्यात कारखाने हजार पण अग्निशमन दल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 00:32 IST

मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेल्या वाडा तालुक्यात गेल्या अनेक वर्षात अग्निशमन केंद्र उभारण्यात आलेले नाही.

- वसंत भोईरवाडा - मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेल्या वाडा तालुक्यात गेल्या अनेक वर्षात अग्निशमन केंद्र उभारण्यात आलेले नाही. येथील कारखान्यांमध्ये वारंवार आग लागत असून त्या विझविण्यात होणाऱ्या विलंबामुळे कारखान्यांचे कोट्यवधी रुपयंचे नुकसान होत आहे. या पट्ट्यात एक हजारांहून अधिक लहान-मोठे कारखाने आहेत तरीही अग्निशमन केंद्र नाही.वाडा तालुका डी प्लस झोन जाहीर झाल्यापासून या परिसरात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या दाखल झाल्या. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाले असून यात अनेक रासायनिक कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षाांच्या कालावधीत तालुक्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. डोंगरते येथील जे.आय.के. या रासायनिक कंपनीत रिअ‍ॅटरचा स्फोट होऊन कंपनी जळून खाक झाली. वाडा शहरातील स्वामीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून गिरणी खाक झाली. त्यात २० लाखांहून अधिक नुकसान झाले. वडवली येथे असलेल्या एका कंपनीच्या गोदामाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. सापरोडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पराग केमिकल या कंपनीचे ६० लाखांचे नुकसान झाले होते.कोडले येथील फायबर लोन प्रायव्हेट लिमिटेड ही रासायनिक कंपनी पूर्ण खाक झाली. वसुमती प्रिंट अ‍ॅण्ड पॅकेजिंग या कंपनीचे आगीत चार कोटींचे नुकसान झाले. मुसारणे फाटा येथे लाकडाच्या वखारीला आग लागून पंधरा लाखाचे नुकसान झाले होते. वाडा आगाराची एक बस पेटून आणि दोन गाड्यांना त्याची झळ लागून २० लाखांची हानी झाली होती. अशा अनेक घटना घडत असल्याने तालुक्यात अग्निशामक केंद्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.भिवंडी येथूून येतात बंबकोणत्याही कारखान्याला आग लागल्यास अथवा स्फोट झाल्यास आग विझवण्यासाठी ४० कि.मी. लांब असलेल्या असलेल्या भिवंडी अग्निशमन केंद्राचे बंब मागवावे लागतात. त्यांना काही कारणामुळे घटनास्थळी पोहोचायला उशीर होतो. वाडा आणि शेजारच्या विक्रमगड या तालुक्यात आपत्कालीन काळात जीवित तसेच वित्तहानी टाळण्यासाठी अग्निशमन दलाची आवश्यकता असल्याचे घोणसई येथील जेराई फिटनेस कंपनीचे व्यवस्थापक दिलीप लाड यांचे म्हणणे आहे.मी वाड्यात नवीन आहे. त्यामुळे याविषयी योग्य ती माहिती घेतो. मात्र, हा महत्त्वाचा विषय असल्याने यासंदर्भात तातडीने काहीनाकाही उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासंदर्भात नगरपंचायत प्रशासनाशी बोलून वरिष्ठ पातळीवर व्यवहार करू.- डॉ. उद्धव कदम,तहसीलदार, वाडा

टॅग्स :Vasai Virarवसई विरार