शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
3
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
4
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
5
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
6
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
7
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
8
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
9
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
10
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
11
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
12
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
13
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
14
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
15
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
16
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
17
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
18
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
19
Beauty Tips: नैसर्गिकरित्या भुवया दाट करणं आता सहज शक्य; फॉलो करा 'या' तीन टिप्स!
20
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती

दवाखाने भरपूर आहेत, पण उपचार मात्र नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:31 PM

कासा उपजिल्हा रुग्णालयात ट्रॉमा सेंटरची गरज; सुविधा नसल्याने रुग्ण जातात वापी, सिल्व्हासाला

कासा : डहाणू तालुक्यात दोन उपजिल्हा रुग्णालय, दोन ग्रामीण रुग्णालये नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तालुक्याची लोकसंख्या सुमारे साडे तीन लाख आहे. मात्र अनेक वर्षांपासून येथील आरोग्य सुविधात वाढ झालेली नाही. बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, सिटीस्कॅन, सोनोग्राफी, क्ष-किरण विभाग, रक्तपेढी आदी सुविधांचा कमतरतेमुळे येथील रुग्णांना उपचारासाठी बाहेरगावी जावे लागते.मुंबईसारख्या अत्याधुनिक सुविधा नसल्याने गंभीर आजारी व अपघातात जबर जखमी झालेल्या रुग्णांना वेळेवर मुंबई वापी, सिल्व्हासा, बलसाड या ठिकाणी न्यावे लागते. परंतु हे अंतर ६० ते १०० कि.मी. असल्याने रुग्णालयात पोहोचण्यासाठी उशीर होतो व उपचाराअभावी बऱ्यााचवेळा रुग्ण रस्त्यातच दगावतात. त्यामुळे कासासारख्या महामार्गलगत असलेल्या ठिकाणी अद्यावत अपघात उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात आहे.डहाणू तालुक्यातील पूर्वेकडील अनेक आदिवासी गावे कासा उपजिल्हा रुग्णालयाला जोडली गेलेली आहेत. कासा उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत तवा, सोमटा, गंजाड , ऐना, सायवन, धुंदलवाडी, तलवाडा आदी प्राथमिक आरोग्य केंद्र येत आहेत व त्यांना अनेक आदिवासी गावपडे जोडलेली आहेत. त्यामुळे अधिक उपचारासाठी आजारी रुग्णास कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येते. मात्र येथेच अपुºया सुविधा व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तज्ञ डॉक्टरांची कमतरता तर काही वैद्यकीय अधिकारी बदलीवर अन्य ठिकाणी काम करत आहेत. त्यामुळे कासा उपजिल्हा रुग्णालय उपचाराऐवजी यातना केंद्र बनले आहे. कारण येथे दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी वापी, सिल्वासा, मुंबईकडे नेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे कासा भागातील ७० टक्के रु ग्णांना उपचार व शस्त्रक्रि येसाठी वापी येथील हरिया व सिल्व्हासा येथील विनोबा भावे रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो.दरम्यान मुंबई-अहमदाबाद महामार्गवर वारंवार अपघात होतात. चारोटी ते मेंढवण धोकादायक वळणे व चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या पुलावरील उतार यामुळे महिनाभरात दोन तीन गंभीर अपघात होतात. परंतु डहाणू व कासा येथील दोन्ही उपजिल्हा रुग्णालयात अद्यावत सुविधेअभावी उपचार व शस्त्रक्रिया होत नाही. कासा उपजिल्हा रु ग्णालयात पाच महिन्यांपूर्वी ट्रामा सेंटर फलक लावण्यात आला. परंतु सुविधा पुरवल्या न गेल्याचे कारण देत महिना भरात फलक काढण्याची नामुष्की ओढावली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल