शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

केवळ वसई-विरारमध्ये यंदाही १५० शाळा आहेत अनधिकृत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 23:57 IST

पालघर जिल्हा परिषदेने वसई विरारमधील १५० शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे.

नालासोपारा : पालघर जिल्हा परिषदेने वसई विरारमधील १५० शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. जिल्ह्यात १९० शाळा अनिधकृत आहेत, तर एकट्या वसई-विरारमध्ये १५० शाळा अनिधकृत आहेत. जिल्ह्यात इतक्या मोठ्या पटीने नियमबाह्य शाळांची निर्मीती होत असतांना शिक्षण विभाग तसेच स्थानिक पातळीवरील प्रशासन काय झोपा काढत आहे का? असा संतापजनक सवाल नागरिकांनी केला आहे.पालघर जिल्ह्यापेक्षा एकट्या वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात जे बेकायदा शाळांचे पिक आले आहे. अवैध शाळा ह्या केवळ गल्ला भरणे हे एकमात्र निमीत्त ठेवून स्थापन करण्यात आल्या आहेत. कारण अवैध शाळांत शिक्षणाबरोबरच शालेय साहित्यदेखील शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती विद्यार्थी व पालकांवर असते. शाळेतील संस्कारक्षम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण लयास जात असताना अवैध शाळांच्या बाबतीत शासन इतके गाफील कसे राहू शकते.वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनिधकृत शाळांचा आकडा डोळ्यात अंजन घालणारा आहे. या दिडशे शाळांत किती हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतील आणि त्यांच्या शैक्षणिक भविष्याचे काय? याचा गंभीर विचार पालिका आयुक्त बळीराम पवारयांनी करावा. अनिधकृत शाळांच्या बांधकामांकडे पाठ करण्याचे पाप पालिका प्रशासन करत असेल तर शिक्षण विभागानेदेखील आपल्या जबाबदारी टाळण्याचे पाप करू नये गतवर्षी देखील या शाळा अस्तित्वात होत्या. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी आपला शिक्षण विभाग या शाळांना दंड ठोठावण्याची कारवाई करेल, त्यांच्या प्रवेशद्वारे त्या अनधिकृत असल्याचा फ्लेक्स लावेल अशी गर्जना गतवर्षी केली परंतु नंतर वसूल केलेला दंड कोणत्या खात्यात भरायचा याची तरतूद नियमात नाही. असा शेपूट घालू पवित्रा घेऊन स्वत:ची आपल्याच शब्दातून मुक्तता करून घेतली होती.>दरवर्षी जि.प. उरकते यादी जाहीर करण्याचे आन्हिकपालघर जिल्ह्यात १९० शाळा अनधिकृत असून या शाळांची यादीच पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. या शाळांना मान्यता नसतानादेखील त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळ मांडत आहेत. महापालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील १५० शाळांवर कारवाई करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा जून महिन्यात या शाळेत प्रवेश घेऊन विद्यार्थी स्वत:चे नुकसान करून घेतील. जिल्हा परिषदेने या १९० शाळांमध्ये विद्यर्ा्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे जाहीर आवाहनच केले आहे.ही यादी जिल्ह्याने काढली असून ते प्रथम नोटीस देऊन कारवाई करणार व नंतर मी नोटिसा देऊन कारवाई करणार या शाळांना आधी नोटिसा पाठविल्या असून पाल्यांनी आपल्या मुलामुलींना या शाळेत घालू नये. तसेच वसई विरार मधील अनिधकृत शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून ही गंभीर समस्या आहे.- सौ. तांडेल, प्रभारी, गटशिक्षण अधिकारी