शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
3
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
4
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
5
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
6
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
7
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
8
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
9
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
10
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
11
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
12
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
13
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
16
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
17
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
18
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
19
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
20
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका

केवळ वसई-विरारमध्ये यंदाही १५० शाळा आहेत अनधिकृत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 23:57 IST

पालघर जिल्हा परिषदेने वसई विरारमधील १५० शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे.

नालासोपारा : पालघर जिल्हा परिषदेने वसई विरारमधील १५० शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. जिल्ह्यात १९० शाळा अनिधकृत आहेत, तर एकट्या वसई-विरारमध्ये १५० शाळा अनिधकृत आहेत. जिल्ह्यात इतक्या मोठ्या पटीने नियमबाह्य शाळांची निर्मीती होत असतांना शिक्षण विभाग तसेच स्थानिक पातळीवरील प्रशासन काय झोपा काढत आहे का? असा संतापजनक सवाल नागरिकांनी केला आहे.पालघर जिल्ह्यापेक्षा एकट्या वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात जे बेकायदा शाळांचे पिक आले आहे. अवैध शाळा ह्या केवळ गल्ला भरणे हे एकमात्र निमीत्त ठेवून स्थापन करण्यात आल्या आहेत. कारण अवैध शाळांत शिक्षणाबरोबरच शालेय साहित्यदेखील शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती विद्यार्थी व पालकांवर असते. शाळेतील संस्कारक्षम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण लयास जात असताना अवैध शाळांच्या बाबतीत शासन इतके गाफील कसे राहू शकते.वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनिधकृत शाळांचा आकडा डोळ्यात अंजन घालणारा आहे. या दिडशे शाळांत किती हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतील आणि त्यांच्या शैक्षणिक भविष्याचे काय? याचा गंभीर विचार पालिका आयुक्त बळीराम पवारयांनी करावा. अनिधकृत शाळांच्या बांधकामांकडे पाठ करण्याचे पाप पालिका प्रशासन करत असेल तर शिक्षण विभागानेदेखील आपल्या जबाबदारी टाळण्याचे पाप करू नये गतवर्षी देखील या शाळा अस्तित्वात होत्या. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी आपला शिक्षण विभाग या शाळांना दंड ठोठावण्याची कारवाई करेल, त्यांच्या प्रवेशद्वारे त्या अनधिकृत असल्याचा फ्लेक्स लावेल अशी गर्जना गतवर्षी केली परंतु नंतर वसूल केलेला दंड कोणत्या खात्यात भरायचा याची तरतूद नियमात नाही. असा शेपूट घालू पवित्रा घेऊन स्वत:ची आपल्याच शब्दातून मुक्तता करून घेतली होती.>दरवर्षी जि.प. उरकते यादी जाहीर करण्याचे आन्हिकपालघर जिल्ह्यात १९० शाळा अनधिकृत असून या शाळांची यादीच पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. या शाळांना मान्यता नसतानादेखील त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळ मांडत आहेत. महापालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील १५० शाळांवर कारवाई करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा जून महिन्यात या शाळेत प्रवेश घेऊन विद्यार्थी स्वत:चे नुकसान करून घेतील. जिल्हा परिषदेने या १९० शाळांमध्ये विद्यर्ा्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे जाहीर आवाहनच केले आहे.ही यादी जिल्ह्याने काढली असून ते प्रथम नोटीस देऊन कारवाई करणार व नंतर मी नोटिसा देऊन कारवाई करणार या शाळांना आधी नोटिसा पाठविल्या असून पाल्यांनी आपल्या मुलामुलींना या शाळेत घालू नये. तसेच वसई विरार मधील अनिधकृत शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून ही गंभीर समस्या आहे.- सौ. तांडेल, प्रभारी, गटशिक्षण अधिकारी