शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

गणवेशांपासून ९ हजार वंचित, आधार कार्ड नसल्याने बँक खाती नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 03:29 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांतील बँकेत खाते नसलेले सुमारे नऊ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत.

शशी करपेवसई : जिल्हा परिषदेच्या शाळांतील बँकेत खाते नसलेले सुमारे नऊ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत. आधार कार्ड नसल्याने विद्यार्थी बँक खाते उघडू शकत नाहीत. त्यामुळे गणवेशाचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात भरण्याचे राज्य सरकारचे धोरण वसईत अपयशी ठरले आहे.शैक्षणिक साहित्य वाटपात होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य सरकारने गणवेशाचे अनुदान थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, पुरेशी कागदपत्रे आणि आधार कार्ड नसल्याने सुमारे नऊ हजार विद्यार्थी बँकेत खाते उघडू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांना गणवेशाचे पैसे मिळू शकलेले नाहीत.गणवेशाचे पैसे मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचे शू्न्य बॅलन्स खाते राष्ट्रीयीकृत बँकेत उघडण्याची अट राज्य सरकारने घातली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत सध्या अगदीच गरीब घरातील मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पालकांकडे बँक खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्डासारखी पुरेशी कागदपत्रे नाहीत. तर आधार कार्ड बँक खाते उघडण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, वसई विरार परिसरात आधार कार्ड काढून देणारी सेवाच उपलब्ध नाही. आधार कार्ड काढून देणारी काही खाजगी तुरळक केंद्रे आहेत. पण, त्यांच्याकडून लूटमार सुरु असल्याने गरीब आधार कार्ड काढू शकलेले नाहीत. त्यांना खाते उघडता आले नाही. पुरेसे मार्गदर्शन मिळत नसल्याने बँक खाती उघडली न गेल्याने सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांचे पैसे शिक्षण विभागाकडे पडून राहिले आहेत.>जुन्या खात्यात पैसे जमा होणार ?वसई तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २०३ शाळांत ५ हजार ३१५ मुले आणि १४ हजार ५५८ मुली आहेत. यातील नऊ हजार विद्यार्थी बँक खाते उघडू शकलेले नाहीत. त्यांचे पालक जुन्या बँक खात्यावरच गणवेशाचे पैसे जमा व्हावेत यासाठी शासनाकडे प्रयत्न सुुरु असे गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल यांनी सांगितले.