शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गणवेशांपासून ९ हजार वंचित, आधार कार्ड नसल्याने बँक खाती नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 03:29 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांतील बँकेत खाते नसलेले सुमारे नऊ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत.

शशी करपेवसई : जिल्हा परिषदेच्या शाळांतील बँकेत खाते नसलेले सुमारे नऊ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत. आधार कार्ड नसल्याने विद्यार्थी बँक खाते उघडू शकत नाहीत. त्यामुळे गणवेशाचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात भरण्याचे राज्य सरकारचे धोरण वसईत अपयशी ठरले आहे.शैक्षणिक साहित्य वाटपात होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य सरकारने गणवेशाचे अनुदान थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, पुरेशी कागदपत्रे आणि आधार कार्ड नसल्याने सुमारे नऊ हजार विद्यार्थी बँकेत खाते उघडू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांना गणवेशाचे पैसे मिळू शकलेले नाहीत.गणवेशाचे पैसे मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचे शू्न्य बॅलन्स खाते राष्ट्रीयीकृत बँकेत उघडण्याची अट राज्य सरकारने घातली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत सध्या अगदीच गरीब घरातील मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पालकांकडे बँक खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्डासारखी पुरेशी कागदपत्रे नाहीत. तर आधार कार्ड बँक खाते उघडण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, वसई विरार परिसरात आधार कार्ड काढून देणारी सेवाच उपलब्ध नाही. आधार कार्ड काढून देणारी काही खाजगी तुरळक केंद्रे आहेत. पण, त्यांच्याकडून लूटमार सुरु असल्याने गरीब आधार कार्ड काढू शकलेले नाहीत. त्यांना खाते उघडता आले नाही. पुरेसे मार्गदर्शन मिळत नसल्याने बँक खाती उघडली न गेल्याने सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांचे पैसे शिक्षण विभागाकडे पडून राहिले आहेत.>जुन्या खात्यात पैसे जमा होणार ?वसई तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २०३ शाळांत ५ हजार ३१५ मुले आणि १४ हजार ५५८ मुली आहेत. यातील नऊ हजार विद्यार्थी बँक खाते उघडू शकलेले नाहीत. त्यांचे पालक जुन्या बँक खात्यावरच गणवेशाचे पैसे जमा व्हावेत यासाठी शासनाकडे प्रयत्न सुुरु असे गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल यांनी सांगितले.