शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

पालघर जिल्ह्यात २८५ बालविकास केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 02:53 IST

जिल्हा कुपोषणमुक्त करण्याच्या दृष्टीने ० ते ६ वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी २८५ ग्राम बाल विकास केंद्रे सुरु करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी लोकमतला दिली.

हितेन नाईक पालघर : हा जिल्हा कुपोषणमुक्त करण्याच्या दृष्टीने ० ते ६ वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी २८५ ग्राम बाल विकास केंद्रे सुरु करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी लोकमतला दिली.बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांना पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर या केंद्राद्वारे भर देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सेविका आणि आशा कार्यकर्तींसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन येथे करण्यात आले होते. त्यासाठी जि. प. महिला बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी राजेंद्र पाटील, उप मुख्य कार्यकरी (साप्रवी) प्रकाश देवऋषी, पालघरचे तालुका आरोग्य अधिकारी अभिजित खंदारे संपूर्ण जिल्हातून आलेल्या मुख्यसेविका, आशा ताई व संबंधित अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील बालकांचे नव्याने सर्वेक्षण करून सर्व बालकांचे वजन, उंची, दंड घेर, पायावरील सूज या निकषांवर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणार्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.केंद्रात द्यावयाच्या आहार व औषधांबाबत वेळापत्रक आखून देण्यात आले आहे. या केंद्रामधील बालकांना दररोज तीन वेळा घरचा आहार, दोन वेळा अंगणवाडीतील आहार, तीन वेळा अंगणवाडीतील ग्राम बाल विकास केंद्राअंतर्गत दिला जाणारा विशेष आहार असा एकूण आठ वेळा आहार दिला जाणार आहे.>सेविकांना घ्यावी लागेल ही प्रतिज्ञामी एक अंगणवाडी सेविका अशी प्रतिज्ञा करते की, जी ग्राम बालविकास केंद्र अंगणवाडी स्तरावर सुरु झाली आहेत. त्यात सॅम आणि मॅम ने प्रभावित असलेल्या बालकांसाठी २ हजार १५० रु पये प्राप्त झाले आहेत. मी सर्वांच्या साक्षीने मासिक सभेमध्ये शपथ घेते की, मला माझ्या बालविकास केंद्रासाठी मिळालेल्या एकूण रकमेचा मी बालकांच्या आहार व औषधांसाठी १०० टक्के विनियोग करीन आणि अशी बालके सुदृढ करण्याच्या दृष्टीने प्रामाणिकपणे प्रयत्न करून माझी अंगणवाडी कुपोषणमुक्त करेलच, असे मी आपणास आश्वासित करते. अशी प्रतिज्ञा सेविकांना घ्यावी लागणार आहे. या २८५ ग्राम बाल विकास केंद्रांपैकी डहाणू तालुक्यात ८५ , वसई तालुक्यात ९, वाडा तालुक्यात ३८ ्र, पालघर तालुक्यात १८ , जव्हार तालुक्यात ५५, विक्रमगड तालुक्यात ४३, मोखाडा तालुक्यात २६ तर तलासरी तालुक्यातील ११ केंद्रांचा समावेश आहे. आता ती कधी सुरु होतात व त्यांची फलनिष्पत्ती कशी असेल याकडे लक्ष लागले आहे.