शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

पालघर जिल्ह्यात २८५ बालविकास केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 02:53 IST

जिल्हा कुपोषणमुक्त करण्याच्या दृष्टीने ० ते ६ वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी २८५ ग्राम बाल विकास केंद्रे सुरु करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी लोकमतला दिली.

हितेन नाईक पालघर : हा जिल्हा कुपोषणमुक्त करण्याच्या दृष्टीने ० ते ६ वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी २८५ ग्राम बाल विकास केंद्रे सुरु करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी लोकमतला दिली.बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांना पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर या केंद्राद्वारे भर देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सेविका आणि आशा कार्यकर्तींसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन येथे करण्यात आले होते. त्यासाठी जि. प. महिला बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी राजेंद्र पाटील, उप मुख्य कार्यकरी (साप्रवी) प्रकाश देवऋषी, पालघरचे तालुका आरोग्य अधिकारी अभिजित खंदारे संपूर्ण जिल्हातून आलेल्या मुख्यसेविका, आशा ताई व संबंधित अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील बालकांचे नव्याने सर्वेक्षण करून सर्व बालकांचे वजन, उंची, दंड घेर, पायावरील सूज या निकषांवर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणार्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.केंद्रात द्यावयाच्या आहार व औषधांबाबत वेळापत्रक आखून देण्यात आले आहे. या केंद्रामधील बालकांना दररोज तीन वेळा घरचा आहार, दोन वेळा अंगणवाडीतील आहार, तीन वेळा अंगणवाडीतील ग्राम बाल विकास केंद्राअंतर्गत दिला जाणारा विशेष आहार असा एकूण आठ वेळा आहार दिला जाणार आहे.>सेविकांना घ्यावी लागेल ही प्रतिज्ञामी एक अंगणवाडी सेविका अशी प्रतिज्ञा करते की, जी ग्राम बालविकास केंद्र अंगणवाडी स्तरावर सुरु झाली आहेत. त्यात सॅम आणि मॅम ने प्रभावित असलेल्या बालकांसाठी २ हजार १५० रु पये प्राप्त झाले आहेत. मी सर्वांच्या साक्षीने मासिक सभेमध्ये शपथ घेते की, मला माझ्या बालविकास केंद्रासाठी मिळालेल्या एकूण रकमेचा मी बालकांच्या आहार व औषधांसाठी १०० टक्के विनियोग करीन आणि अशी बालके सुदृढ करण्याच्या दृष्टीने प्रामाणिकपणे प्रयत्न करून माझी अंगणवाडी कुपोषणमुक्त करेलच, असे मी आपणास आश्वासित करते. अशी प्रतिज्ञा सेविकांना घ्यावी लागणार आहे. या २८५ ग्राम बाल विकास केंद्रांपैकी डहाणू तालुक्यात ८५ , वसई तालुक्यात ९, वाडा तालुक्यात ३८ ्र, पालघर तालुक्यात १८ , जव्हार तालुक्यात ५५, विक्रमगड तालुक्यात ४३, मोखाडा तालुक्यात २६ तर तलासरी तालुक्यातील ११ केंद्रांचा समावेश आहे. आता ती कधी सुरु होतात व त्यांची फलनिष्पत्ती कशी असेल याकडे लक्ष लागले आहे.