शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
धक्कादायक! जालन्यात शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, कारण अद्याप अस्पष्ट
3
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
4
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
5
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
6
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
7
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
8
Bombay HC: थकबाकी दिल्याशिवाय खरेदीदाराला सोसायटीचे सदस्यत्व नाही: हायकोर्ट
9
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
10
अदानी समूहाची 'या' दिग्गज कंपनीतून एक्झिट; विकला उरलासुरला हिस्सा; तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?
11
NIA Terrorist: दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांना उचलले, कॅब चालक, ऊर्दू शिक्षकाचीही चौकशी
12
Pakistan: शिक्षा पूर्ण झालेल्या मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू
13
'नो-कॉस्ट EMI' चे सत्य काय? कंपन्या आणि बँका प्रोसेसिंग फीसच्या नावाखाली वसूल करतात 'इतके' शुल्क!
14
Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
15
Shaurya Patil: पायाचा त्रास, तरीही शिक्षकांचा डान्स करण्यासाठी हट्ट; शौर्य पाटीलने आयुष्य संपवण्यापूर्वी शाळेत काय घडलेलं?
16
टार्गेटवर फक्त विवाहित महिला! आधी जाळ्यात ओढायचा, मग सुरू व्हायचा टॉर्चरचा खेळ; नराधमावर गुन्हा दाखल
17
Jara Hatke: तुमच्या बागेतले ‘ते’ फूल खरे ब्रह्मकमळ नाहीच; पाहा 'हा' व्हिडीओ
18
निर्दयी आई तिला स्मशानाबाहेर टाकून फरार; महिला अधिकाऱ्याने कुशीत घेताच चिमुकली हसली
19
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
20
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
Daily Top 2Weekly Top 5

...तर भर समुद्रात सर्व्हेला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:13 IST

च्छीमाराना विश्वासात न घेता हे सर्वेक्षण लादले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी रोजी सर्व मच्छीमार आपल्या बोटी समुद्रात नेऊन सर्वेक्षणा ठिकाणी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

पालघर : ओएनजीसीच्या सर्वेक्षणामुळे उत्तन, वसई ते झाई-बोर्डी दरम्यानची मासेमारी ठप्प पडली असून मच्छीमाराना विश्वासात न घेता हे सर्वेक्षण लादले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी रोजी सर्व मच्छीमार आपल्या बोटी समुद्रात नेऊन सर्वेक्षणा ठिकाणी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.१ जानेवारी पासून समुद्रात ओएनजीसीच्या पोलर मर्क्युस या महाकाय जहाजा द्वारे बी ६६ या भागात सर्वेक्षण सुरु आहे. हे जहाज ५ नॉटिकल माईल्स च्या वेगाने २४ तास समुद्र तळातील वायू आणि तेल साठ्यांचा शोध घेत आहे.२१ जानेवारी रोजी सातपाटी येथील पंकज म्हात्रे या मच्छीमारांच्या दिव्य लक्ष्मी बोटीला सर्वेक्षणातील एका महाकाय जहाजाने धडक दिल्याने त्याचे ४ ते ५ लाखाचे नुकसान झाले होते. राज्यपाल राम नाईक हे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री असताना मच्छीमाराना विश्वासात घेतल्या शिवाय ओएनजीसी अथवा इतर कंपन्या सर्वेक्षण करणार नाही असे आश्वासन मच्छीमार संघटनांना दिले होते. तसेच मच्छीमारांचे ५ सदस्य असलेली समिती ही नियुक्त करण्यात आली होती. मात्र, या समितीला विश्वासात न घेता सर्व्हे सुरु करण्यात आला. बुधवारी पालघरच्या ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाच्या सभागृहात नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उत्तन, वसई, अर्नाळा, भाटी, मढ, सातपाटी, मुरबे, नवापूर, दांडी, डहाणू, झाई-बोर्डी आदी भागातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेत ओएनजीसीच्या सर्वेक्षणाला एकजुटीने विरोध करीत सर्वेक्षणा ठिकाणी जाऊन आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी लोकमतला सांगितले. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी २५ जानेवारी ला पुन्हा सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.>कवचे मोठे नुकसान६ हजार मीटर्स लांबीच्या ८ ते १० लोखंडी केबल्सद्वारे हे सर्वेक्षण होणार असल्याने कव मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या हजारो कवी उध्वस्त होऊन लाखो रु पयांचे नुकसान होणार आहे. तसेच. दालदा, वागरा, आदी मासेमारी जाळ्यांचेही मोठे नुकसान होणार असल्याने किनारपट्टीवरील मच्छिमारामध्ये मोठा प्रमाणात संतप्त भावना उमटत आहेत.