शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

...तर भर समुद्रात सर्व्हेला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:13 IST

च्छीमाराना विश्वासात न घेता हे सर्वेक्षण लादले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी रोजी सर्व मच्छीमार आपल्या बोटी समुद्रात नेऊन सर्वेक्षणा ठिकाणी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

पालघर : ओएनजीसीच्या सर्वेक्षणामुळे उत्तन, वसई ते झाई-बोर्डी दरम्यानची मासेमारी ठप्प पडली असून मच्छीमाराना विश्वासात न घेता हे सर्वेक्षण लादले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी रोजी सर्व मच्छीमार आपल्या बोटी समुद्रात नेऊन सर्वेक्षणा ठिकाणी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.१ जानेवारी पासून समुद्रात ओएनजीसीच्या पोलर मर्क्युस या महाकाय जहाजा द्वारे बी ६६ या भागात सर्वेक्षण सुरु आहे. हे जहाज ५ नॉटिकल माईल्स च्या वेगाने २४ तास समुद्र तळातील वायू आणि तेल साठ्यांचा शोध घेत आहे.२१ जानेवारी रोजी सातपाटी येथील पंकज म्हात्रे या मच्छीमारांच्या दिव्य लक्ष्मी बोटीला सर्वेक्षणातील एका महाकाय जहाजाने धडक दिल्याने त्याचे ४ ते ५ लाखाचे नुकसान झाले होते. राज्यपाल राम नाईक हे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री असताना मच्छीमाराना विश्वासात घेतल्या शिवाय ओएनजीसी अथवा इतर कंपन्या सर्वेक्षण करणार नाही असे आश्वासन मच्छीमार संघटनांना दिले होते. तसेच मच्छीमारांचे ५ सदस्य असलेली समिती ही नियुक्त करण्यात आली होती. मात्र, या समितीला विश्वासात न घेता सर्व्हे सुरु करण्यात आला. बुधवारी पालघरच्या ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाच्या सभागृहात नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उत्तन, वसई, अर्नाळा, भाटी, मढ, सातपाटी, मुरबे, नवापूर, दांडी, डहाणू, झाई-बोर्डी आदी भागातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेत ओएनजीसीच्या सर्वेक्षणाला एकजुटीने विरोध करीत सर्वेक्षणा ठिकाणी जाऊन आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी लोकमतला सांगितले. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी २५ जानेवारी ला पुन्हा सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.>कवचे मोठे नुकसान६ हजार मीटर्स लांबीच्या ८ ते १० लोखंडी केबल्सद्वारे हे सर्वेक्षण होणार असल्याने कव मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या हजारो कवी उध्वस्त होऊन लाखो रु पयांचे नुकसान होणार आहे. तसेच. दालदा, वागरा, आदी मासेमारी जाळ्यांचेही मोठे नुकसान होणार असल्याने किनारपट्टीवरील मच्छिमारामध्ये मोठा प्रमाणात संतप्त भावना उमटत आहेत.