शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

ठाणे वाडा अंतर घटविणाऱ्या पुलाचे काम अखेर झाले सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 23:10 IST

अंतर होणार कमी; मार्चला पूर्ण, २२ गावांतील विद्यार्थ्यांची सोय

वाडा : ठाणे व पालघर जिल्ह्यातील भिवंडी व वाडा तालुक्यातील काही गावांना जोडणाºया या तालुक्यातील उचाट या गावाच्या हद्दीत तानसा नदीवरील पुलाचे काम प्रगतीपथावर असून मार्चअखेर तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या पुलामुळे ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यातील अंतर १५ कि.मी.ने कमी होणार असून विशेषत: भिवंडी तालुक्यातील २२ गावांतील मुलांच्या शिक्षणाची सोय होणार आहे.उचाट या गावचे पुनर्वसन १९६२ मध्ये तानसा नदीकाठी झाले. त्यानंतर गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन अ‍ॅस्पी विद्यालयाची स्थापना केली. ती मध्ये पहिली ते बारावीपर्यंत तसेच इंग्लिश मिडीयमची शाळा असून एकूण बाराशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे सुमारे ६५० विद्यार्थी हे भिवंडी तालुक्यातील सागाव, एकसाल, कुशापूर, माडोशी, सावरोली, देवचोळा, वापे, दुधणी, चिंचवली, दिघाशी, पाश्चापूर, कुंदे, खंबाळा, वेडवहाळ, बासे, मैंदे, शिरोळा, करमाळा आदी २२ गावांतील आहेत. मात्र तानसा नदीवर पुल नसल्याने पावसाळ्यात या विद्यार्थांना अंबाडी मार्गे कुडूस उचाट असा वळसा देऊन दहा बारा किलोमीटर चा फेरा घेऊन शाळा गाठावी लागत होती. या नदीवर उचाट येथे एक बंधारा असून या बंधा-यावरून विद्यार्थी प्रवास करीत असत. मात्र पावसाळ्यात पुराच्या वेळी या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत असे. या बंधा-यावरून पडून एका विद्यार्थांचा मृत्यूही झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून या नदीवर पुल व्हावा अशी मागणी उचाटवासीय करीत होते.येत्या फेब्रुवारी/मार्चपर्यंत या पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल.- प्रकाश पातकर, शाखा अभियंतासार्वजनिक बांधकाम विभाग वाडायेथील पुलाला गेल्या वर्षी मंजूरी मिळून त्याचे काम जानेवारीत सुरू केले आहे. यासाठी २ कोटी दहा लाखांचा निधी मंजूर असून त्याचा ठेका आर. के. सावंत यांना देण्यात आला आहे. नाबार्ड योजनेतून तो मंजूर झाला आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारroad transportरस्ते वाहतूक