शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

रब्बीसाठी ठाणे जिल्हा बँक कर्ज देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:14 IST

शेतकऱ्यांना दिलासा; पावसाने नुकसान

पारोळ : वसईतील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले असताना सोसायटीमधून घेतलेले पीककर्ज कसे फेडायचे व रब्बी पिकासाठी कसा पैसा उभा करायचा असे दुहेरी संकट शेतकºयांपुढे उभे आहे. मात्र ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोठा निर्णय घेतला असून या वर्षीचे खरीप पीक कर्ज असतानाच आता रब्बी पिकासाठी शेतकºयांना बँक कर्ज देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हा निर्णय शेतकºयांसाठी दिलासा देणारा असून यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.वसई तालुक्यात १० सेवा सोसायटी असून यावर्षी वसई पूर्व भागातील खरीप पिकासाठी २४५ शेतकरी यांना १ कोटी ४८ लाखांचे पीक कर्ज वाटप ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने चांदीप शाखेतून केले. या कर्जावर शेतकरी यांनी भातपिक लागवड केली. दरवर्षी शेतकरी भाताचे पीक किंवा भाताचे तण विकून खरीप पिकासाठी घेतलेले कर्ज फेडून पुन्हा रब्बी पिकांसाठी कर्ज उचलत असे. ते बिनव्याजी मिळत असल्याने खरीप व रब्बी कर्जाचा शेती करण्यासाठी शेतकºयांना मोठा फायदा होत असे. तोंडाजवळ आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याने खरीप पिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न उभा असताना कर्ज नाही फेडले तरी रब्बी पिकांसाठी कर्ज दिले जाणार आहे.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी यांच्या पाठिशी असून या वर्षी संकटात असलेल्या शेतकºयांना खरीप पीक कर्ज असतानाही आता रब्बी पीक कर्ज घेता येणार आहे. शेतकºयांनी रब्बी पिकासाठी कर्ज घ्यावे.- राजेंद्र पाटील, अध्यक्ष,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक