शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखडा विरोधी लढा ठाकुरांंनीही लढावा!

By admin | Updated: February 21, 2017 05:10 IST

एमएमआरडीएच्या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी उभारण्यात आलेल्या लढ्यात ठाकूर बंधूंचा सहभाग

वसई : एमएमआरडीएच्या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी उभारण्यात आलेल्या लढ्यात ठाकूर बंधूंचा सहभाग आवश्यक असून, त्यांनी या लढ्यात भूमीपुत्र म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन हरित वसईचे प्रणेते फादर दिब्रिटो यांनी निर्मळ येथे रविवारी बोलताना केले.एमएमआरडीएच्या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी पर्यावरण संवर्धन समिती मार्फत लढा उभारण्यात आला आहे.त्यासाठी गावोगावी जनजागृती सभा घेतल्या जात आहेत. विकास आराखडा मराठीत प्रसिद्ध करण्याची आणि त्यावर हरकती घेण्याची, मुदत वाढवण्याची मागणी या लढ्यामार्फत पूर्ण करण्यात आली. तसेच २५ हजार हरकतीही नोंदवण्यात आल्या. या लढ्याचा पुढील भाग म्हणून जीवन विकास सोसायटीच्या सभागृहात रविवारी सकाळी अभ्यास शिबीर घेण्यात आले. या शिबीरात फादर दिब्रिटो आणि शशी सोनावणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉमणिका डाबरे, टोनी डाबरे, सिलू परेरा, सोसायटीचे अध्यक्ष सुनिल रॉड्रीग्ज उपस्थित होते.हरित वसईचे प्रणेते फादर दिब्रिटो यांनी तर थेट आमदार हितेंद्र ठाकूर यांनाच या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. तालुक्यात ठाकूर बंधू प्रभावशाली आहेत. त्यांचा या लढ्यात सहभाग आवश्यक आहे. त्यांना जनाधारही मिळाला आहे. त्यामुळे त्यांना सहभागी करून घ्यावे, असा सल्ला दिब्रिटो यांनी यावेळी वसईकरांना दिला. तर ठाकूरांनीही भुमिपुत्र म्हणून या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार हितेंद्र ठाकूर यांना त्यांनी यावेळी केले.(प्रतिनिधी)दररोजच्या ७३३ टन कचऱ्याचे काय?पाणी, सांडपाणी आणि घनकचरा या मुद्द्यांवर आॅल्वीन लोपीस याने आराखड्यातील बाबी विषद केल्या. वसई तालुक्याच्या सध्याच्या लोकसंख्येला दररोज १०० एमएलडी पाण्याचा तुटवडा भासतो आहे. आराखड्यानुसार लोकसंख्या वाढली तर एवढे पाणी कुठून आणणार, १०७ एमएलडी सांडपाणी दररोज जमीनीत मुरणार आहे. त्यामुळे जमीनी नापीक होतीलच भूगर्भातील पाणीही दूषित होईल, दररोज निर्माण होणाऱ्या ७३३ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडे कोणताही प्रकल्प अस्तित्वात नाही. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढणार आहे, असे आॅल्वीनने यावेळी स्पष्ट केले. विकास आराखड्या़वर अभ्यास केलेल्या रॉजर रॉड्रीग्ज या तरुणाने आराखड्यातील काही धोकादायक मुद्दे यावेळी मांडले. गोगटे सॉल्टच्या १५०० एकर जमीनीवर भराव टाकून ग्रोथ सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याऐवजी ते गावात शिरेल आणि पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होईल. वाढत्या वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढले आहेत. विकास आराखड्यानुसार वसईत हॉटेल, मोटेल्स, रिसॉर्ट, हॉलीडे होम्स, क्लब हाऊसचाही धोका वाढणार आहे. तरीही हा आराखडा वसईसाठी नाही असा बुद्धीभेद केला जात आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.