शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

उद्योजकांना तात्पुरता दिलासा'; नवीन सीईटीपी करण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 23:05 IST

तारापूरचे नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र लवकर सुरू करण्याचे आदेश

बोईसर : पर्यावरणाच्या निकषांचे गेली अनेक वर्षे उल्लंघन करणाऱ्या तारापूरमधील उद्योगांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर (सीईटीपी) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची कारवाई करताच उद्योगमंत्री व एमपीसीबीचे सदस्य सचिव यांच्याकडे सोमवारी अत्यंत वेगाने झालेल्या बैठकीत उद्योजकांना तात्पुरते झुकते माप दिले गेले आहे. यात काही अटी व शर्तीसह नवीन सीईटीपी २० मार्चपर्यंत सुरू करण्यासंदर्भात मुदतवाढ देऊन सीईटीपीवर केलेल्या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्र बंद करण्याचा आदेश ६ मार्च रोजी बजावला होता. या आदेशानंतर हे केंद्र बंद झाले असते तर तारापूर येथील सुमारे ६०० उद्योगांना फटका बसला असता. तसेच लाखो कामगारांवर बेरोजगाराची वेळ येऊ शकली असती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी (दि.९) मंत्रालयात तातडीच्या बोलविलेल्या बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी. अनबलगन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन तसेच तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (टीमा) आणि तारापूर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन सोसायटी (टीईपीएस)चे प्रतिनिधी अशोक सराफ, प्रशांत अगरवाल, पवन पोद्दार, डी.के. राऊत, राम पेठे आदी उपस्थित होते. देसाई यांनी नवीन सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्र येत्या २० मार्च २०२० पर्यंत सुरू करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्यानंतर प्रतिदिन ५० दशलक्ष लिटर क्षमतेपैकी २५ दशलक्ष लिटर नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करण्याचे उद्योजकांनीही या वेळी मान्य केले, तर उद्योजकांनी विहित मुदतीत सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास हयगय केल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देशही उद्योग मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना या वेळी दिले. नवीन ५० एमएलडी क्षमतेचा सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर जुन्या सांडपाणी प्रक्रि या केंद्रावरचा भार कमी होईल. तसेच जुने प्रक्रि या केंद्र ओसंडून वाहण्याची प्रक्रिया थांबेल, असा आशावाद देसाई यांनी बैठकीत व्यक्त केला आहे.टांगती तलवार कायमतारापूर येथील प्रति दिन २५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्रांमध्ये आवश्यक दर्जा राखला जात नाही. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांचे उल्लंघन होत असल्याने सांडपाणी प्रक्रि या केंद्र बंद करण्याचे दिलेले आदेश सरसकट मागे घेतले गेले नसले तरी काही दिवसासाठी शिथिल करण्याबाबत संकेत मिळाले असून सीईटीपीवरील बंदच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे.