शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

शिक्षक दिन : आयुष्यातील आव्हाने पेलण्याचे धडे शिक्षकांकडूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:28 IST

पोलीस अधिकारी ते राष्ट्रपती पुरस्कार विजेता हा प्रवास करणाऱ्या मंदार धर्माधिकारी यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे ते शिक्षक कोण आहेत?

डहाणू/बोर्डी : अंधेरीच्या परांजपे विद्यालयातून शालांत शिक्षण पूर्ण करताना विज्ञानासह इतिहास, भूगोल आणि भाषा हे विषय आवडीचे होते. पूर्वीचे पार्ले आणि आताच्या साठे कॉलेजात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना, केमिस्ट्री हा माझा आवडता विषय होता. दरम्यान शैक्षणिक गुणवत्तेसह आयुष्यातील आव्हाने पेलण्याचे धडे शिक्षकांकडून मिळाल्यानेच आपले व्यक्तिमत्त्व घडले. आपल्यावर केवळ एक नव्हे तर अनेक शिक्षकांचा प्रभाव असल्यानेच हे यश पदरी पडल्याची कृतज्ञता यंदाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि राष्टÑपती पुरस्कार विजेते मंदार धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे. हे भाग्य ज्या विभूतींमुळे लाभले त्या सर्व शिक्षकांची नावे त्यांना आजही तोंडपाठ आहेत.३१ वर्षांच्या सेवा काळात गुणवत्तापूर्ण सेवेकरिता राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले, हा खरे तर खूप मोठा क्षण! ३१ वर्षांच्या सेवाकाळात २०१७ मध्ये पोलीस महासंचालक पदक, तर यंदा राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले. राष्टÑपती पुरस्कार मिळाल्याचे कळताच, इतिहासाचे शिक्षक शशिकांत जुन्नरकर यांनी अभिनंदनाकरिता फोन केला. ते नव्वदीकडे झुकले आहेत. परांजपे विद्यालयातील धुरूबाई, जुवेकरबाई, कुलकर्णी बाई, जोगळेकर बाई, मालशे बाई, गोखले बाई, नाईक सर यांच्या विषयीचा जिव्हाळा कायमच टिकून आहे. शिक्षकांनी घडविल्यानेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नाव लौकिक मिळविला आहे. या सर्वांशी आजही ऋणानुबंध टिकून आहेत.व्यक्तिमत्त्व घडविण्यात सर्व शिक्षकांचा हातभारपरांजपे शाळा ही मराठी माध्यमाची शाळा. मात्र आठवीपासून शाळेने इंग्लिश मिडियम सुरू केले. तेव्हा आमची ही पहिलीच बॅच. मराठी माध्यमातील शिक्षकांनी इंग्रजीतून शिकवताना अपार कष्ट घेतले. केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे तर व्यवहारी ज्ञानात तरबेज होऊन बाहेरच्या जगात आपला विद्यार्थी सक्षमपणे वावरला पाहिजे याकडे सर्वांनीच विशेष लक्ष दिले.कॉलेजात असताना रसायन शास्त्र हा विषय आवडायचा त्याचे कारण शिक्षक हेच होते. या काळात कौटुंबिक परिस्थितिमुळे शिक्षणात अडथळे आले, नोकरी करण्याची गरज भासली होती. त्यावेळी गुरुवर्यांनी दिलेल्या शिकवणुकीचा तसेच आधाराचा मोठा लाभ झाला. तेव्हा आता सारखं महागडं शिक्षण नव्हतं. ते आमच्या आवाक्यात होतं. कौटुंबिक परिस्थितीने नोकरी करण्याची वेळ आली होती. एका कंपनीत मुलाखतही दिली होती.अपघातानेच आलो या क्षेत्रातपोलीस विभागात नोकरी करेन असं वाटलं नव्हतं, मात्र मित्रांनी परीक्षेचा फॉर्म भरला आणि अपघातानेच या क्षेत्रात आहे. १९८८ च्या बॅचच्या सरळ सेवेत मी एकमेव पोलीस अधिकारी झालो. १९९३ साली बॉम्ब स्कॉड विभागात होतो. तत्कालीन उप विभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र साठे यांचे मार्गदर्शन लाभल्यानेच नांदेड आणि ठाण्याच्या नवीन युनिट बांधणीत महत्त्वाचा वाटा उचलता आला.

टॅग्स :vasai-acवसईVasai Virarवसई विरार