शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शिक्षकांना ४ महिने पगार नाही, आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:10 IST

डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाº्या शाळांमधील शिक्षकांचे ४ महिन्यांपासून पगारच झाले नाहीत मात्र आदिवासी विकासमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या विक्रमगड

पालघर : डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाº्या शाळांमधील शिक्षकांचे ४ महिन्यांपासून पगारच झाले नाहीत मात्र आदिवासी विकासमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या विक्रमगड तालुक्यातील शिक्षकांचे पगार मात्र वेळेवर झाले आहेत. या दुजाभावामुळे शिक्षक संतप्त झाले आहेत. जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी डहाणू प्रकल्प अधिकाºयांना हे पगार २७ फेब्रुवारीपर्यंत न झाल्यास २८ पासून आंदोलाचा इशारा दिला आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत २२ प्राथमिक तर २३ माध्यमिक अशा एकूण ४५ अनुदानित आश्रमशाळा असून त्यामध्ये सुमारे १२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर शिक्षक व शिक्षकेत्तरांची संख्या ६२३ आहे. त्यांचे पगार मागील काही महिन्यांपासून आॅनलाइन पद्धतीने देणे सुरू झाल्यानंतर त्यात अनेक अडचणी निर्माण होत असून नोव्हेंबर महिन्यापासून ह्या सर्व शिक्षकांचे पगारच झालेले नाहीत.यावर उपाय योजना करावी यासाठी महाराष्ट्र राज्य अनुदानित आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चिंतामण मोहोडकर, उपाध्यक्ष संजय भोये, सचिव प्रवीण भोईर यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, आमदार अमित घोडा, डहाणू प्रकल्प अधिकारी आँचल गोयल यांना निवेदने दिली आहेत. मात्र कुठलीही कार्यवाही केली जात नाही. महत्वाचे म्हणजे आदिवासींचे तारणहर्ते असलेल्या आदिवासी विकासमंत्री सवरा यांच्या मतदार संघातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथील आश्रमशाळांमधील शिक्षकांचे पगार मात्र वेळेवर होत असून डहाणू तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांवरच मात्र अन्याय का? असा प्रश्न आहे. आदिवासी विकास मंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असा दुजाभाव केला जातो आहे. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती निलेश सांबरे यांच्याकडे शिक्षक संघटना व पालकांनी केल्या नंतर २७ फेब्रुवारी पर्यंत वरील शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न सुटला नाही तर २८ फेब्रुवारी पासून डहाणू प्रकल्प अधिकारी कार्यालया समोर आंदोलन छेडण्याचे पत्र सांबरे यांनी दिले आहे.या संदर्भात प्रकल्प अधिकारी आँचल गोयल ह्यांच्याशी संपर्क साधला असता पुनर्नियोजनास प्रस्तावा मध्ये निधीची मागणी केली होती.ती मान्य झाली असून पगाराचा प्रश्न मार्गी लागेल असे त्यांनी सांगितले.