शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बुलेट ट्रेनसाठी संपादित जमिनींंना टीडीआर देणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:34 IST

महासभेत खंडित केलेल्या ठरावाचे; सरकारकडूनच कायद्यात रूपांतर !

- आशिष राणेवसई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा वाढता खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने आता नवीन शक्कल लढवली आहे.कोणत्याही प्रकल्पासाठी भूसंपादन करताना संबंधितांना पैशांमध्ये मोबदला दिला जातो, मात्र आता भाजपाचे स्वप्न असणाºया बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन करताना जमीनधारक अथवा शेतकऱ्यांना आता पैशाऐवजी विकास हस्तांतरण (टी डी आर) हक्काच्या स्वरुपात जमिनीचा मोबदला दिला जाणार आहे. याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच राज्याच्या नगरविकास विभागाकडून त्या त्या संबंधित महापालिकांना दिली गेल्याची माहिती नगरविकास विभागाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.मुंबई-अहमदाबाद दरम्यान एकूण ५०८ किमी लांबीचा आणि १ लाख ८ हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाच्या उभारणीची जबाबदारी केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारच्या भागीदारीतून निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रीय हायस्पीड रेल कार्पोरेशन या कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. मात्र या प्रकल्पासाठी जमीन देण्यास शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांकडून होणाºया विरोधामुळे भूसंपादनाची प्रक्रि या जिल्ह्यात तूर्तास तरी रखडली असून ती कुठे चालू तर कुठे बंद अवस्थेत आढळून येत आहे.परिणामी सन २०२२ पर्यंत या मार्गावर बुलेट ट्रेन चालविण्याच्या सरकारच्या मनसुब्यांना खीळ बसली आहे. तर प्रकल्प रखडत असल्याने त्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि आता हा खर्च आटोक्यात ठेवण्याकरिता भूसंपादनाच्या खर्चात कपात करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील जमिनींचे संपादन करताना जमीन मालकांना आता पैशाऐवजी टीडीआरच्यारुपाने मोबदला देण्यात येणार आहे.दरम्यान राष्ट्रीय हायस्पीड रेल कार्पोरेशनने याबाबत वसई-विरार शहर महापालिका ला पत्र पाठवून प्रकल्पबाधितांना पैशाऐवजी टीडीआर देण्याची सूचना केली आहे. या बुलेट ट्रेन मुळे वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील १४ गावातील ३० हेक्टर, वसई- विरार उपप्रदेशातील ७.२९ हेक्टर जमीन लागणार असून विरार व मोरे या गावांच्या हद्दीत बुलेट ट्रेनचे स्थानक प्रस्तावित करण्यात आले असून त्यासाठी ही आणखी काही हेक्टर जमीन लागणार आहे.ही जमीन संपादित करतांना प्रकल्पबाधितांना टी डी आर च्या रुपाने मोबदला देण्याची सूचना वसई विरार महापालिकेस करण्यात आली असली तरी अन्य महापालिका क्षेत्रात सुद्धा अशीच पद्धती लागू करण्यात येणार आहे. याबाबत वसई-विरार महापालिका आयुक्त बी.जी. पवार यांना विचारणा केली असता या प्रकल्पासाठी भूसंपादनास विरोध करणारा महासभेचा ठराव यापूर्वीच राज्य सरकारने रद्द केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर या प्रकल्पासाठी भूसंपादनास विरोध करणारा महासभेचा ठराव सरकारने पूर्ण पणे रद्द (विखंडित ) केल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.बविआच्या सत्ताधारी नगरसेवकांना राज्यसरकारचा दे धक्का !पूर्वी बविआ च्या सत्ताधारी नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर टी डी आर च्या रुपात संपादीत जमिनीचा मोबदला देण्याच्या ठरावाला महासभेत कडाडून विरोध केला होता.मात्र हाच विरोध व ठराव त्यांच्या चांगलाच अंगलट तर आला परंतु याच ठरावाच्या विषयांचा आधार घेऊन राज्याच्या नगरविकास खात्याने महापालिकेने वसई विरार महापालिकेचा हा सरकार विरोधी ठराव खंडित करून त्याचे कायद्यात रूपांतर केले. त्यामुळे राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी निर्णयामुळे आम.हितेंद्र ठाकूर प्रणित बविआ ला चांगलाच दे धक्का बसला आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन