शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तलाठी कार्यालय गावापासून ‘कोसो’ दूर; करावी लागते पदरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 00:15 IST

नायगाव पूर्वेतील परेरानगर हे ठिकाण परप्रांतीय लोकवस्ती असलेले आहे. या ठिकाणी एकही नागरिक शेतकरी नाही.

पारोळ : नायगाव पूर्वेतील जुचंद्र हे गाव शेतीप्रधान असून, आजही येथील मोठ्या प्रमाणावरील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे शेती संदर्भातील कामांसाठी येथील शेतकऱ्यांना नेहमीच तलाठी कार्यालय गाठावे लागते. जुचंद्रमध्ये सरकारी भूखंड असताना महसूल विभागाने जुचंद्रपासून कोसोदूर असलेल्या परेरानगर या ठिकाणी तलाठी कार्यालय बांधले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना पदरमोड करून जुचंद्र तलाठी कार्यालय गाठावे लागते. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नायगाव पूर्वेतील परेरानगर हे ठिकाण परप्रांतीय लोकवस्ती असलेले आहे. या ठिकाणी एकही नागरिक शेतकरी नाही. मात्र, तरीही या ठिकाणी तलाठी कार्यालय स्थापन करण्यात आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसत कार्यालयात यावे लागते. शेती संबंधातील सातबारा उतारे, खावटी दाखला, रेशनकार्ड, विविध दाखले, फेरफार, विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कोसोदूर असलेल्या परेरानगर येथील तलाठी कार्यालयात जावे लागते. त्यातही कधी-कधी तलाठीच कार्यालयात हजर राहत नसल्याने शेतकऱ्यांचा वेळ व पैसे वाया जातात. तलाठी अधिकाऱ्याला फोन लावल्यानंतर तलाठी फोन उचलत नाहीत. आधीच एकही शेतकरी नसलेल्या परेरानगर परिसरात तलाठी कार्यालय आणि त्यातही तलाठ्याची मनमानी यामुळे जुचंद्र येथील स्थानिक शेतकरी संतापलेले आहेत. 

कामांसाठी मारावे लागतात हेलपाटेजुचंद्र गावातील शेतकऱ्यांना वारंवार तलाठी कार्यालयात हेलपाटे मारूनही अनेकदा  कामे होत नाहीत. यामुळे या परिसरातील शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार