शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पाणथळ जागेवरील अतिक्रमणांवर कारवाई करा; पालिकेला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:01 IST

संबंधित विभागासोबत झाली चर्चा, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित

- आशिष राणेवसई : पाणथळ जागांवरील अतिक्र मणांवर कारवाई न झाल्यास पर्यावरण संवर्धन समिती २ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करणार असे वृत्त ‘लोकमत’ने १९ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. वसई प्रांताधिकाऱ्यांसह संबंधित यंत्रणेला जाग आणून दिली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेत शुक्र वारी वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांनी ‘पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरारतर्फेभुईगाव येथील सरकारी पाणथळ जागेवरील अतिक्रमणे, बेकायदा कोळंबी प्रकल्प यावरील कारवाई न होणे या विषयासंदर्भात प्रशासनाच्या सर्व विभागांसोबत बैठक झाली.बैठकीत सुरूवातीला पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी सरकारी जमिनी हडप करणाºया भूमाफियांवर गुन्हे दाखल करा, अतिक्रमणे हटवून संपूर्ण कांदळवन पूर्ववत करा अशी मागणी केली. कारवाई जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत २ डिसेंबरपासून सुरु होणारे उपोषण पुढे सुरू ठेवण्याची भूमिकाही त्यांनी मांडली. बेकायदा कोळंबी प्रकल्पांसाठी कोणत्या आधारे वीजपुरवठा मिळतो? या भूमाफियांना प्रशासन का सहकार्य करीत आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे अनेक मुद्दे वर्तक यांनी उपस्थित केले. किंबहुना यापूर्वीच या प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात ‘वनशक्ती’ या संस्थेबरोबर जनहित याचिका करणारे हरित नैसर्गिक वैभव बचावचे अध्यक्ष फ्रान्सिस डिसोझा यांनी ही कारवाई न होणे म्हणजेच हा मुंबई उच्च न्यायालाचा अवमान असल्याचे स्पष्ट करत अवमान याचिका दाखल करणार असल्याचे नमूद केले.मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष संजय कोळी यांनीही भूमाफियांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेतली. तर कोळी युवा शक्तीचे अध्यक्ष मिल्टन सौदीया व आदिवासी एकता परिषदेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष दत्ता सांबरे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. याप्रसंगी रानगाव येथील शेतकरी दीपक घरत यांनी कोळंबी प्रकल्पामुळे सर्वांची शेती नापीक होत असल्याचे प्रांतांना आवर्जून सांगितले.कारवाईची संपूर्ण जबाबदारी ही महापालिकेची असून ती झटकण्याच्या प्रयत्न करीत होती. परंतु वसई प्रांतांनी महानगरपालिकेला यासंदर्भात जबाबदारीची कल्पना दिली. मागील ७ वेळा कारवाईच्यावेळी पोलिस बंदोबस्त का दिला नाही ? यावर आमची अगोदरची बंदोबस्ताची रक्कम मिळाली नाही, म्हणून आम्ही बंदोबस्त दिला नाही असे या बैठकीला उपस्थित पोलीस उपअधीक्षक डॉ.अश्विनी पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीला वाघोलीचे माजी सरपंच टोनी डाबरे व उपसरपंच सुनील डाबरे, मॅक्सवेल रोझ, विक्रांत चौधरी, अभिजित घाग, दर्शन राऊत, दीपक मेहेर आदी उपस्थित होते.हा प्रश्न खूप जुना व गंभीर असून त्यात उच्च न्यायालयाचे पाणथळ जागेवरील अतिक्र मण संदर्भात कारवाईचे स्पष्ट आदेश असताना याआधीच खरंतर संबंधित विभागांनी कारवाई करणे आवश्यक होते, मात्र आता तसे चालणार नाही. पाणथळ जागा असो वा महसूलच्या जागा असो या ठिकाणी महापालिका प्रशासन व त्यांच्या यंत्रणेने यावर कारवाई करणे ही त्यांची जबाबदारी असून तसे आदेश जिल्हाधिकाºयांनी यापूर्वीच दिले आहेत.- स्वप्नील तांगडे, उपविभागीय अधिकारी

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMuncipal Corporationनगर पालिका