शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

ते पाणी भरण्यास टँकर्सना मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:33 IST

गोखीवरे येथील डबक्यात साचलेले पावसाचे पाणी लोकांना पाजण्यासाठी नेणाºया टँकर्सना या परिसरात येण्यास बिल्डरांनी रस्त्यांवर मोठाले पाईप टाकून मज्जाव केला आहे.

शशी करपेवसई : गोखीवरे येथील डबक्यात साचलेले पावसाचे पाणी लोकांना पाजण्यासाठी नेणाºया टँकर्सना या परिसरात येण्यास बिल्डरांनी रस्त्यांवर मोठाले पाईप टाकून मज्जाव केला आहे.मात्र, गेल्या काही दिवसांपासून दररोज हजारो शहरवासियांच्या आरोग्याशी खेळणाºया टँकरलॉबीवर कारवाई करण्याकडे महापालिका आणि महसूल खाते दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होतो आहे.गोखीवरे येथील मधुबन परिसरात मोकळा जागेत आणि डबक्यात साचलेले पावसाचे पाणी पाच पंप लावून टँकरद्वारे पिण्यासाठी पुरवण्यात येत असल्याची धक्कादायक बाब लोकमतने उजेडात आणली होती. गेल्या काही दिवसांपासून टँकरवाले हे दूषित आणि अक्षरश: घाण पाणी पिण्यासाठी म्हणून नवघर-माणिकपूर आणि नालासोपारा परिसरातील हजारो लोकांना विकत होते. पण, त्यावर वसई विरार महापालिका अथवा महसूल खात्याकडून कोणतीच कारवाई केली जात नव्हती.ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेने आपला अधिकारी पाठवून पंचनामा केला. तर महसूल खात्याच्या एका तलाठ्याने जागेचा पंचनामा केला. जनतेच्या आरोग्याशी खेळणाºया टँकरवाल्यांवर कोणतीच कारवाई केली नाही. सध्या वसई विरार परिसरात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. अशावेळी महापालिका आणि महसूल खात्याकडून टँकर लॉबीवर कारवाई होणे अपेक्षित असतांना त्यांच्याकडून ती न झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, येथील बिल्डरांनी एकत्रित येऊन मधुबन रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठाले पाईप टाकून टँकर्सना पाणी भरण्यापासून मज्जाव केला आहे. तसेच पंप काढून टाकले आहेत. त्यामुळे सध्या टँकरद्वारे होणारा दुषित पाणी पुरवठा बंद झाला आहे.धक्कादायक बाब म्हणजे टँकर पाणी भरत असलेल्या डबक्याकडे जाणारा रस्ता नक्की कुणी बंद केला याची माहिती महापालिका आणि महसूल खात्याला नव्हती. हा रस्ता बिल्डरांनीच बंद केल्याची माहिती लोकमतने मिळविली.दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून महापालिकेने नवीन नळकनेक्शन देणे बंद केले आहे. त्यामुळे वसई विरार परिसरात पाणी टंचाई जाणवत आहे. त्यातूनच टँकर माफियांनी धुमाकूळ घातला आहे. दुषित पाणी पुरवठा करणाºया टँकर माफियांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी केली आहे.