शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

ते पाणी भरण्यास टँकर्सना मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:33 IST

गोखीवरे येथील डबक्यात साचलेले पावसाचे पाणी लोकांना पाजण्यासाठी नेणाºया टँकर्सना या परिसरात येण्यास बिल्डरांनी रस्त्यांवर मोठाले पाईप टाकून मज्जाव केला आहे.

शशी करपेवसई : गोखीवरे येथील डबक्यात साचलेले पावसाचे पाणी लोकांना पाजण्यासाठी नेणाºया टँकर्सना या परिसरात येण्यास बिल्डरांनी रस्त्यांवर मोठाले पाईप टाकून मज्जाव केला आहे.मात्र, गेल्या काही दिवसांपासून दररोज हजारो शहरवासियांच्या आरोग्याशी खेळणाºया टँकरलॉबीवर कारवाई करण्याकडे महापालिका आणि महसूल खाते दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होतो आहे.गोखीवरे येथील मधुबन परिसरात मोकळा जागेत आणि डबक्यात साचलेले पावसाचे पाणी पाच पंप लावून टँकरद्वारे पिण्यासाठी पुरवण्यात येत असल्याची धक्कादायक बाब लोकमतने उजेडात आणली होती. गेल्या काही दिवसांपासून टँकरवाले हे दूषित आणि अक्षरश: घाण पाणी पिण्यासाठी म्हणून नवघर-माणिकपूर आणि नालासोपारा परिसरातील हजारो लोकांना विकत होते. पण, त्यावर वसई विरार महापालिका अथवा महसूल खात्याकडून कोणतीच कारवाई केली जात नव्हती.ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेने आपला अधिकारी पाठवून पंचनामा केला. तर महसूल खात्याच्या एका तलाठ्याने जागेचा पंचनामा केला. जनतेच्या आरोग्याशी खेळणाºया टँकरवाल्यांवर कोणतीच कारवाई केली नाही. सध्या वसई विरार परिसरात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. अशावेळी महापालिका आणि महसूल खात्याकडून टँकर लॉबीवर कारवाई होणे अपेक्षित असतांना त्यांच्याकडून ती न झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, येथील बिल्डरांनी एकत्रित येऊन मधुबन रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठाले पाईप टाकून टँकर्सना पाणी भरण्यापासून मज्जाव केला आहे. तसेच पंप काढून टाकले आहेत. त्यामुळे सध्या टँकरद्वारे होणारा दुषित पाणी पुरवठा बंद झाला आहे.धक्कादायक बाब म्हणजे टँकर पाणी भरत असलेल्या डबक्याकडे जाणारा रस्ता नक्की कुणी बंद केला याची माहिती महापालिका आणि महसूल खात्याला नव्हती. हा रस्ता बिल्डरांनीच बंद केल्याची माहिती लोकमतने मिळविली.दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून महापालिकेने नवीन नळकनेक्शन देणे बंद केले आहे. त्यामुळे वसई विरार परिसरात पाणी टंचाई जाणवत आहे. त्यातूनच टँकर माफियांनी धुमाकूळ घातला आहे. दुषित पाणी पुरवठा करणाºया टँकर माफियांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी केली आहे.