शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

सूर्या पाणी योजनेचे कंत्राट एल अ‍ॅण्ड टी ला

By admin | Updated: May 30, 2017 05:17 IST

वसई विरार आणि मीरा भाईंदर महापालिका हद्दीत सूर्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे कंत्राट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने

शशी करपे/लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई विरार आणि मीरा भाईंदर महापालिका हद्दीत सूर्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे कंत्राट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने लार्सन अँड टुब्रोला दिले आहे. हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याची अट घालण्यात आली असून ती पूर्ण झाल्यावर वसई विरार महापालिकेला दररोज १८५ एमएलडी आणि मीरा भाईंदर महापालिकेला दररोज २१५ एमएमलडी पाणी पुरवठा होणार आहे. वसई विरार आणि मीरा भाईंदर महापालिकेसाठी एमएमआरडीए स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबवणार आहे. त्यांना सूर्या धरणातून पाणी पुरवठा करणार आहे. त्यासाठी तीन कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यात लार्सन अँड टुब्रोची सर्वात कमी दराची असल्याने मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही कंपनी उदंचन, जलप्रक्रिया , जल शुद्धीकरण केंदे्र आणि प्रयोगशाळा बांधणार आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग ८ च्या बाजूने ८८ किलोमीटर लांब जलवाहिनी टाकणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रसाठी एमएमआरडीएने सूर्या वसाहतीची जागा सरकारकडून घेतली आहे. त्याठिकाणी मेंढवण खिंडीतून बोगदा तयार करून पाणी आणले जाईल. त्यानंतर पाईपलाईनने पाणी वसई विरार आणि मीरा - भाईंदर महापालिकेच्या हद्दीपर्यंत पोचवले जाणार आहे. तिथून पुढे पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित महापालिकांची असणार आहे. या योजनेसाठी एकूण १ हजार ३२९ कोटी खर्च येणार आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर वसई विरार महापालिकेला दररोज १८५ एमएलडी आणि मीरा भाईंदर महापालिकेला दररोज २१५ एमएलडी पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकांच्या हद्दीतील पाणी समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे. सूर्या पाणी पुरवठा योजनेसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने जलवाहिनी टाकण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि खाडी व नदी ओलांडून जलवाहिनी टाकण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची परवानगी घेण्यात आली आहे. पर्यावरण खात्याकडून सीरआरझेड व दिवा-वसई रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्यासाठी मध्य रेल्वेची परवानगी मिळवण्यातही एमएमआरडीएने यश मिळवले आहे. त्याचबरोबर प्रकल्पासाठी विद्युत पुरवठा करण्याकरता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचीही परवानगी घेण्यात आलेली आहे. पाणी पुरवठा योजनेतील संभाव्य अडथळे आधीच दूर करण्यात आल्यामुळे ही योजना तीन वर्षात पूर्ण करण्याचे बंधन ठेकेदार कंपनीला घालण्यात आले आहे. त्यामुळे या दोनही महानगरांची पाणीसमस्या सुटणार आहे.विरोधाचे काय करणार?काहीही झाले तरी सूर्या धरणातील पाण्याचा एक थेंबही वसई-विरार व मीरा भार्इंदरला जाऊ देणार नाही. हा सिंचन प्रकल्प असून आधी त्यावर अवलंबून असलेल्या जमिनीचे सिंचन करा अन्यथा, संघर्ष उद्भवेल असा इशारा दिला गेला आहे. त्याचे काय करणार?