शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सूर्या पाणी योजनेचे कंत्राट एल अ‍ॅण्ड टी ला

By admin | Updated: May 30, 2017 05:17 IST

वसई विरार आणि मीरा भाईंदर महापालिका हद्दीत सूर्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे कंत्राट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने

शशी करपे/लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई विरार आणि मीरा भाईंदर महापालिका हद्दीत सूर्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे कंत्राट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने लार्सन अँड टुब्रोला दिले आहे. हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याची अट घालण्यात आली असून ती पूर्ण झाल्यावर वसई विरार महापालिकेला दररोज १८५ एमएलडी आणि मीरा भाईंदर महापालिकेला दररोज २१५ एमएमलडी पाणी पुरवठा होणार आहे. वसई विरार आणि मीरा भाईंदर महापालिकेसाठी एमएमआरडीए स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबवणार आहे. त्यांना सूर्या धरणातून पाणी पुरवठा करणार आहे. त्यासाठी तीन कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यात लार्सन अँड टुब्रोची सर्वात कमी दराची असल्याने मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही कंपनी उदंचन, जलप्रक्रिया , जल शुद्धीकरण केंदे्र आणि प्रयोगशाळा बांधणार आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग ८ च्या बाजूने ८८ किलोमीटर लांब जलवाहिनी टाकणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रसाठी एमएमआरडीएने सूर्या वसाहतीची जागा सरकारकडून घेतली आहे. त्याठिकाणी मेंढवण खिंडीतून बोगदा तयार करून पाणी आणले जाईल. त्यानंतर पाईपलाईनने पाणी वसई विरार आणि मीरा - भाईंदर महापालिकेच्या हद्दीपर्यंत पोचवले जाणार आहे. तिथून पुढे पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित महापालिकांची असणार आहे. या योजनेसाठी एकूण १ हजार ३२९ कोटी खर्च येणार आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर वसई विरार महापालिकेला दररोज १८५ एमएलडी आणि मीरा भाईंदर महापालिकेला दररोज २१५ एमएलडी पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकांच्या हद्दीतील पाणी समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे. सूर्या पाणी पुरवठा योजनेसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने जलवाहिनी टाकण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि खाडी व नदी ओलांडून जलवाहिनी टाकण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची परवानगी घेण्यात आली आहे. पर्यावरण खात्याकडून सीरआरझेड व दिवा-वसई रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्यासाठी मध्य रेल्वेची परवानगी मिळवण्यातही एमएमआरडीएने यश मिळवले आहे. त्याचबरोबर प्रकल्पासाठी विद्युत पुरवठा करण्याकरता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचीही परवानगी घेण्यात आलेली आहे. पाणी पुरवठा योजनेतील संभाव्य अडथळे आधीच दूर करण्यात आल्यामुळे ही योजना तीन वर्षात पूर्ण करण्याचे बंधन ठेकेदार कंपनीला घालण्यात आले आहे. त्यामुळे या दोनही महानगरांची पाणीसमस्या सुटणार आहे.विरोधाचे काय करणार?काहीही झाले तरी सूर्या धरणातील पाण्याचा एक थेंबही वसई-विरार व मीरा भार्इंदरला जाऊ देणार नाही. हा सिंचन प्रकल्प असून आधी त्यावर अवलंबून असलेल्या जमिनीचे सिंचन करा अन्यथा, संघर्ष उद्भवेल असा इशारा दिला गेला आहे. त्याचे काय करणार?