वसई : सूर्या धरणातून वसई-विरारला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा एकदा फुटल्यामुळे वसईकरांना पुन्हा एकदा तीन दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.वसई-विरार उपप्रदेशाला पालघर येथील सुर्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी धुकटन येथील प्रकल्पात शुद्ध केल्यानंतर ते मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून वसईला पुरवले जाते. दुरवरून येणारे पाणी वसईकरांना चांगल्या दाबाने आणि समाधानकारक मिळण्यासाठी पंपींग केले जाते. अशावेळी वीज पुरवठा खंय्ऋीत झाल्यावर जास्त दाबाने टाकीत चढलेले पाणी दुप्पट वेगाने खाली उतरते. त्यामुळे अतिरीक्त दाब पडून जलवाहिन्या वारंवार फुटण्याच्या घटना घडताहेत. डिसेंबर २०१६ पासून आतापर्यंत अशा घटना चार-पाच वेळा घय्ऋल्या आहेत. त्यामुळे वसईकरांना सलग तीन दिवस कृत्रीम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.गुरुवारी रात्री पुन्हा ही जलवाहिनी धुकटण येथील दिवेकर पाड्याजवळ फुटली. शुक्रवारी तिच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले असून, अंदाजे ३६ तास हे काम चालणार आहे. त्यामुळे या दरम्यान पाणीपुरवठा पुर्णत: बंद राहणार असून, त्यानंतर कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेच्या पुरवठा विभागाने दिली. (प्रतिनिधी)
‘सूर्या’ची जलवाहिनी पुन्हा फुटली
By admin | Updated: February 4, 2017 02:51 IST