शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भूकंपक्षेत्राची मंगळवारी पाहणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:53 IST

मागील दोन महिन्यांत झालेल्या भूकंपांची मालिका अजूनही संपलेली नाही.

डहाणू : मागील दोन महिन्यांत झालेल्या भूकंपांची मालिका अजूनही संपलेली नाही. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या अनेक भागात मागील काही दिवस भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे या परिसराची पाहणी करण्यासाठी भारतीय भूगर्भशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांचे पथक ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत या भागात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.भूकंपाच्या धक्क्याबाबत लोकांच्या मनात भीती आणि दहशत निर्माण होऊ नये यासाठी असे धक्के बसल्यास कोणती काळजी घ्यावी, काय करावे आणि काय करू नये याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे अजूनही या परिसरातील नागरिकांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येते आहे. बुधवारी आमदार अमित घोडा, पास्कल धनारे, सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, तहसीलदार राहुल सारंग आदींच्या उपस्थितीत नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विशाल नातेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुंदलवाडी येथील आश्रमशाळेत भूकंपाबाबत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.>भूकंप प्रवणक्षेत्र वाढणार?>हितेन नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात मागील १ वर्षांपासून जव्हारच्या वाळवंडा पासून सुरू झालेले भूकंपाचे धक्के आता तलासरी, डहाणू-बोर्डी पर्यंत विस्तारले आहेत. नियोजनबद्ध विकासाच्या नावाखाली एमएमआरडीए ला आपले क्षेत्र डहाणू पर्यंत विस्तारण्याची संधी बिल्डर धार्जिण्या गटाने मिळवून दिली आहे. या सिमेंटच्या विकासा सोबतच वाढवणं बंदर व, जिंदाल जेट्टीच्या निर्मिती साठी लागणाऱ्या दगड, डबर, रेती, साठी पर्यावरणाचे रक्षक असलेले मोठ मोठे डोंगर फोडले जाणार असल्याने भूकंपाचे धक्के सर्वत्र पसरून तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला धोका पोहचण्याची शक्यता आहे.>याचा फटका बसणार : वाढवण बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात २२ मीटर्स खोल,२ किलोमीटर्स रुंद आणि ८ किलोमीटर्स लांब असा भराव टाकला जाणार असून त्यासाठी २५ लाख टन डबर लागेल. त्यामुळे एमएमआरडीए ची कामे, ४४० हेक्टवर उभारण्यात येणाºया इमारती, वाढवणं, बंदर जिंदाल जेट्टी उभारणीसाठी लागणाºया साहित्यासाठी डोंगर फोडावे लागणार आहे. तर दुसरीकडे प्रस्तावित धरणात मोठा पाण्याचा साठा साठविण्यात येणार असल्याने एक बाजूला डोंगराची साखळी तोडली जाणार असून भूपृष्ठावर पाण्याच्या साठ्यांचा प्रचंड भार पडणार आहे. त्यातून कोणता अनर्थ उद्भवेल हे काळच सांगू शकेल.