शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

भूकंपक्षेत्राची मंगळवारी पाहणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:53 IST

मागील दोन महिन्यांत झालेल्या भूकंपांची मालिका अजूनही संपलेली नाही.

डहाणू : मागील दोन महिन्यांत झालेल्या भूकंपांची मालिका अजूनही संपलेली नाही. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या अनेक भागात मागील काही दिवस भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे या परिसराची पाहणी करण्यासाठी भारतीय भूगर्भशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांचे पथक ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत या भागात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.भूकंपाच्या धक्क्याबाबत लोकांच्या मनात भीती आणि दहशत निर्माण होऊ नये यासाठी असे धक्के बसल्यास कोणती काळजी घ्यावी, काय करावे आणि काय करू नये याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे अजूनही या परिसरातील नागरिकांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येते आहे. बुधवारी आमदार अमित घोडा, पास्कल धनारे, सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, तहसीलदार राहुल सारंग आदींच्या उपस्थितीत नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विशाल नातेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुंदलवाडी येथील आश्रमशाळेत भूकंपाबाबत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.>भूकंप प्रवणक्षेत्र वाढणार?>हितेन नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात मागील १ वर्षांपासून जव्हारच्या वाळवंडा पासून सुरू झालेले भूकंपाचे धक्के आता तलासरी, डहाणू-बोर्डी पर्यंत विस्तारले आहेत. नियोजनबद्ध विकासाच्या नावाखाली एमएमआरडीए ला आपले क्षेत्र डहाणू पर्यंत विस्तारण्याची संधी बिल्डर धार्जिण्या गटाने मिळवून दिली आहे. या सिमेंटच्या विकासा सोबतच वाढवणं बंदर व, जिंदाल जेट्टीच्या निर्मिती साठी लागणाऱ्या दगड, डबर, रेती, साठी पर्यावरणाचे रक्षक असलेले मोठ मोठे डोंगर फोडले जाणार असल्याने भूकंपाचे धक्के सर्वत्र पसरून तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला धोका पोहचण्याची शक्यता आहे.>याचा फटका बसणार : वाढवण बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात २२ मीटर्स खोल,२ किलोमीटर्स रुंद आणि ८ किलोमीटर्स लांब असा भराव टाकला जाणार असून त्यासाठी २५ लाख टन डबर लागेल. त्यामुळे एमएमआरडीए ची कामे, ४४० हेक्टवर उभारण्यात येणाºया इमारती, वाढवणं, बंदर जिंदाल जेट्टी उभारणीसाठी लागणाºया साहित्यासाठी डोंगर फोडावे लागणार आहे. तर दुसरीकडे प्रस्तावित धरणात मोठा पाण्याचा साठा साठविण्यात येणार असल्याने एक बाजूला डोंगराची साखळी तोडली जाणार असून भूपृष्ठावर पाण्याच्या साठ्यांचा प्रचंड भार पडणार आहे. त्यातून कोणता अनर्थ उद्भवेल हे काळच सांगू शकेल.