शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

भूकंपक्षेत्राची मंगळवारी पाहणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:53 IST

मागील दोन महिन्यांत झालेल्या भूकंपांची मालिका अजूनही संपलेली नाही.

डहाणू : मागील दोन महिन्यांत झालेल्या भूकंपांची मालिका अजूनही संपलेली नाही. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या अनेक भागात मागील काही दिवस भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे या परिसराची पाहणी करण्यासाठी भारतीय भूगर्भशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांचे पथक ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत या भागात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.भूकंपाच्या धक्क्याबाबत लोकांच्या मनात भीती आणि दहशत निर्माण होऊ नये यासाठी असे धक्के बसल्यास कोणती काळजी घ्यावी, काय करावे आणि काय करू नये याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे अजूनही या परिसरातील नागरिकांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येते आहे. बुधवारी आमदार अमित घोडा, पास्कल धनारे, सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, तहसीलदार राहुल सारंग आदींच्या उपस्थितीत नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विशाल नातेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुंदलवाडी येथील आश्रमशाळेत भूकंपाबाबत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.>भूकंप प्रवणक्षेत्र वाढणार?>हितेन नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात मागील १ वर्षांपासून जव्हारच्या वाळवंडा पासून सुरू झालेले भूकंपाचे धक्के आता तलासरी, डहाणू-बोर्डी पर्यंत विस्तारले आहेत. नियोजनबद्ध विकासाच्या नावाखाली एमएमआरडीए ला आपले क्षेत्र डहाणू पर्यंत विस्तारण्याची संधी बिल्डर धार्जिण्या गटाने मिळवून दिली आहे. या सिमेंटच्या विकासा सोबतच वाढवणं बंदर व, जिंदाल जेट्टीच्या निर्मिती साठी लागणाऱ्या दगड, डबर, रेती, साठी पर्यावरणाचे रक्षक असलेले मोठ मोठे डोंगर फोडले जाणार असल्याने भूकंपाचे धक्के सर्वत्र पसरून तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला धोका पोहचण्याची शक्यता आहे.>याचा फटका बसणार : वाढवण बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात २२ मीटर्स खोल,२ किलोमीटर्स रुंद आणि ८ किलोमीटर्स लांब असा भराव टाकला जाणार असून त्यासाठी २५ लाख टन डबर लागेल. त्यामुळे एमएमआरडीए ची कामे, ४४० हेक्टवर उभारण्यात येणाºया इमारती, वाढवणं, बंदर जिंदाल जेट्टी उभारणीसाठी लागणाºया साहित्यासाठी डोंगर फोडावे लागणार आहे. तर दुसरीकडे प्रस्तावित धरणात मोठा पाण्याचा साठा साठविण्यात येणार असल्याने एक बाजूला डोंगराची साखळी तोडली जाणार असून भूपृष्ठावर पाण्याच्या साठ्यांचा प्रचंड भार पडणार आहे. त्यातून कोणता अनर्थ उद्भवेल हे काळच सांगू शकेल.