शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

सर्वेक्षणाने मच्छीमार भिकेला; मासेमारीचे ५६ दिवस जाणार वाया, कवींचीही होणार हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:08 IST

१ जानेवारी ते २५ फेब्रुवारी पासून समुद्रात ओएनजीसी च्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. मच्छीमार संघटनांनी दर्शविलेला हा विरोध वरवरचा असल्याचे दिसून येत असून ओएनजीसीचे शेकडो प्लॅटफॉर्म सागरात विहारत आहेत.

- हितेंन नाईकपालघर : १ जानेवारी ते २५ फेब्रुवारी पासून समुद्रात ओएनजीसी च्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. मच्छीमार संघटनांनी दर्शविलेला हा विरोध वरवरचा असल्याचे दिसून येत असून ओएनजीसीचे शेकडो प्लॅटफॉर्म सागरात विहारत आहेत. कवीच्या मारलेल्या हजारो खुंटामुळे आधीच मासेमारी क्षेत्र अपुरे पडत असून त्यात या सर्वेक्षणाची भर पडल्याने पालघर, डहाणूतील मच्छीमारांचे कंबरडेच मोडले जाणार आहे. पोलर मर्क्युस या महाकाय जहाजाद्वारे शेअर वॉटर या कंपनीकडून बी ६६ परिसरात ५ नॉटिकल माइल्सच्या गतीने २४ तास समुद्रातील तेल शोध सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. हे सर्वेक्षण २४ तास कार्यरत असून या जहाजाच्या मागे ६ हजार मीटर्स लांबीच्या ८ ते १० लोखंडी केबल्स समुद्रातील तेलाच्या साठ्यांचा खोलवर शोध घेणार आहेत.या केबल्स जहाजाच्या पुढे ७ मीटर्स तर मागे ३० मीटर्स पाण्याखाली असणार आहेत. या जहाजाच्या पाठीमागे असणाऱ्या ६ हजार मीटर्स लांबीच्या केबल्स ना लाइट असणाºया टेलबोय लावण्यात आली असून हे जहाज निरंतर चालत राहणार असल्याने व या जहाजाला अचानक वळण घेता येत नसल्याने मच्छीमारांनी आपल्या बोटी आणि जाळ्याना या जहाजाच्या मार्गिकेत न आणण्याच्या सज्जड दम वजा सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी आपली मासेमारी थांबवावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या महाकाय जहाजाच्या मार्गिकेत कोणी मच्छीमार येऊ नये म्हणून एक सहाय्यक जहाज, आणि २५ ते ३० गार्ड बोट बंदोबस्ताला ठेवण्यात आल्या आहेत.या सहाय्यक बोटीवर काही स्थानिक मच्छीमारांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्फत वायरलेस सेटद्वारे सूचना देऊन मासेमारी करणाºया मच्छीमाराना या जहाजाच्या मार्गातून हुसकावून लावण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.समुद्रातील तेल सर्वेक्षणामुळे समुद्रिय पर्यावरणाची मोठी हानी होत असून जैवविविधता नष्ट होऊन माशाच्या अंड्यांवर त्याचा परिणाम होत आहे. प्रत्येक पावसाळ्यात किनारपट्टीवर लागणारे डांबर गोळे हे या तेल सर्वेक्षणा दरम्यान होणाºया उत्खननामुळे होत असल्याचा मच्छीमार संघटनांचा दावा आहे. या जहाजाला लावण्यात येणाºया महाकाय केबल मुळे समुद्रात रोवलेल्या अनेक कवींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून मासेमारीचे तब्बल ५६ दिवसांचे नुकसान होणार आहे.भरपाईचा वाद पुन्हा उफाळणारया सततच्या सर्वेक्षणातून होणाºया नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी सन २००० पासून महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती व अन्य संघटनांकडून केली जात आहे. मात्र ओएनजीसी कडून नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे, असा यावेळीही हाच वाद नव्याने उफाळून येणार आहे.सध्या वसई, उत्तन भागातील करल्या डोली द्वारे कव मासेमारी करणाºया मच्छीमारांनी थेट जाफराबाद पर्यंतच्या समुद्रात कवी मारल्याने पालघर, डहाणू मधील मच्छीमारांना आपली जाळी समुद्रात टाकण्यासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने मासेमारीची क्षेत्र अपुरे पडत असल्याने हद्दीचा वाद वाढला आहे.यातच या सर्वेक्षणामुळे काही प्रमाणात मासेमारी साठी उरलेला मोकळ्या भागात आता ओएनजीसीच्या जहाजाकडून जबरदस्तीने सर्वेक्षण होणार असल्याने पालघर, डहाणू तालुक्यातील मच्छीमार व्यवसायाचे आर्थिक कंबरडे मोडले जाणार आहे. त्यामुळे जगावे कसे? हा प्रश्न मच्छीमारांपुढे उभा ठाकला आहे.मच्छीमाराना विश्वासात घेऊन नंतरच समुद्रात सर्वेक्षण करण्यात यावे यासाठी राम नाईक पेट्रोलियम मंत्री असताना ओएनजीसी विभागात एक समिती नेमण्यात आली होती.मात्र ह्या समितीला विश्वासात घेतले जात नाही त्यामुळे मच्छीमारांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावी.- नरेंद्र पाटील, अध्यक्ष, एनएफएफ.

टॅग्स :palgharपालघर