शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

‘वाढवण बंदर होणारच’ मुळे संतापाची लाट

By admin | Updated: July 24, 2015 03:36 IST

केंद्रसरकार आणि जेएनपीटी दरम्यान डहाणू तालुक्यात वाढवण येथे बंदर उभारण्याबाबत सामंजस्य करार झाला असून तेथे बंदर होणारच अशी

वसई-पालघर : केंद्रसरकार आणि जेएनपीटी दरम्यान डहाणू तालुक्यात वाढवण येथे बंदर उभारण्याबाबत सामंजस्य करार झाला असून तेथे बंदर होणारच अशी घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी याबाबतच्या लक्षवेधीवर निवेदन करताना गुरुवारी विधान परीषदेत केल्याने या संपूर्ण किनारपट्टीत संतापाची लाट उसळली आहे. १९९७-९८ मध्ये भूमीपुत्रांचा या बंदराला असलेला विरोध पाहून युती सरकारचा रिमोटकंट्रोल असलेल्या शिवसेनाप्रमुखांनी हे बंदर रद्द करायला लावले होते. आता १९ वर्षांनी त्याचे भूत पुन्हा एकदा युती सरकारच्याच काळामध्ये जागवले गेल्याने भूमीपुत्र संतप्त आहेत. ज्या भाजपला कधीही डहाणूत पाय रोवता आले नाही. तिथे आम्ही भाजपला आमदार मिळवून दिला. पालघरची आमदारकी आम्ही शिवसेनेला पुन्हा मिळवून दिली. त्याचे हे पांग युती फेडते आहे काय? आज शिवसेनाप्रमुख असते तर हा प्रकल्प पुन्हा सुरु करण्याची हिंमत युती सरकारने दाखवली असती काय? व शिवसेना कार्यप्रमुख याबाबत मौन धारणकर्ते झाले असते काय? असे सवाल भूमीपुत्रांनी उपस्थित केले आहेत.येथील सागरीहद्द पाकिस्तानच्या अत्यंत जवळ आहे, सागरी आणि मत्स्य संपदेने संपन्न असलेल्या या किनारपट्टीची ही संपन्नता नव्या बंदरामुळे नष्ट होईल, बागायती आणि शेती यावर बंदरामुळे होणाऱ्या प्रदुषणाचा विपरीत परीणाम होईल, तसेच तारापूर येथे अणुउर्जा प्रकल्प आहे, हे लक्षात घेऊन हे बंदर होऊ देऊ नये एकीकडे या परिसरात उद्योगबंदी आहे आणि दुसरीकडे असलेल्या पारंपारीक रोजगार उद्योगांवर या बंदरामुळे कुऱ्हाड कोसळणार आहे, असे असताना या बंदराचा अट्टाहास कशासाठी? असा सवाल येथील भूमीपुत्रांनी केला आहे. माजी आदीवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित तसेच राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर यांनी त्याचप्रमाणे शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांनीही या बंदराला अगदी प्रारंभापासून विरोध केला आहे. त्यांनीही आपल्या या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. १९९७-९८ मध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सरकार असताना ‘अ‍ॅडव्हांटेज महाराष्ट्र’ या परीषदेत आॅस्ट्रेलियाच्या ‘पी अ‍ॅण्ड ओ’ या कंपनीला वाढवण बंदर विकसीत करण्याचे इरादापत्र तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांच्या हस्ते देण्यात आले होते. त्याला असलेला विरोध लक्षात आल्यानंतरही ते साकारण्याचा हट्ट युती सरकारने कायम ठेवला तेव्हा शिवसेनेने ३५ हजार भूमीपुत्रांच्या सह्या असलेले निवेदन देऊन हे बंदर रद्द करण्याची मागणी केली होती. ती शिवसेना प्रमुखांनी मान्य केली होती. त्यानंतर पुन्हा हे बंदर साकारणीचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे पर्यावरणमंत्रीही सेनेचे आणि त्याला विरोध करणारे पालघर जिल्हा संपर्क प्रमुखही सेनेचे अशी जुंपली आहे.