शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

‘वाढवण बंदर होणारच’ मुळे संतापाची लाट

By admin | Updated: July 24, 2015 03:36 IST

केंद्रसरकार आणि जेएनपीटी दरम्यान डहाणू तालुक्यात वाढवण येथे बंदर उभारण्याबाबत सामंजस्य करार झाला असून तेथे बंदर होणारच अशी

वसई-पालघर : केंद्रसरकार आणि जेएनपीटी दरम्यान डहाणू तालुक्यात वाढवण येथे बंदर उभारण्याबाबत सामंजस्य करार झाला असून तेथे बंदर होणारच अशी घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी याबाबतच्या लक्षवेधीवर निवेदन करताना गुरुवारी विधान परीषदेत केल्याने या संपूर्ण किनारपट्टीत संतापाची लाट उसळली आहे. १९९७-९८ मध्ये भूमीपुत्रांचा या बंदराला असलेला विरोध पाहून युती सरकारचा रिमोटकंट्रोल असलेल्या शिवसेनाप्रमुखांनी हे बंदर रद्द करायला लावले होते. आता १९ वर्षांनी त्याचे भूत पुन्हा एकदा युती सरकारच्याच काळामध्ये जागवले गेल्याने भूमीपुत्र संतप्त आहेत. ज्या भाजपला कधीही डहाणूत पाय रोवता आले नाही. तिथे आम्ही भाजपला आमदार मिळवून दिला. पालघरची आमदारकी आम्ही शिवसेनेला पुन्हा मिळवून दिली. त्याचे हे पांग युती फेडते आहे काय? आज शिवसेनाप्रमुख असते तर हा प्रकल्प पुन्हा सुरु करण्याची हिंमत युती सरकारने दाखवली असती काय? व शिवसेना कार्यप्रमुख याबाबत मौन धारणकर्ते झाले असते काय? असे सवाल भूमीपुत्रांनी उपस्थित केले आहेत.येथील सागरीहद्द पाकिस्तानच्या अत्यंत जवळ आहे, सागरी आणि मत्स्य संपदेने संपन्न असलेल्या या किनारपट्टीची ही संपन्नता नव्या बंदरामुळे नष्ट होईल, बागायती आणि शेती यावर बंदरामुळे होणाऱ्या प्रदुषणाचा विपरीत परीणाम होईल, तसेच तारापूर येथे अणुउर्जा प्रकल्प आहे, हे लक्षात घेऊन हे बंदर होऊ देऊ नये एकीकडे या परिसरात उद्योगबंदी आहे आणि दुसरीकडे असलेल्या पारंपारीक रोजगार उद्योगांवर या बंदरामुळे कुऱ्हाड कोसळणार आहे, असे असताना या बंदराचा अट्टाहास कशासाठी? असा सवाल येथील भूमीपुत्रांनी केला आहे. माजी आदीवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित तसेच राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर यांनी त्याचप्रमाणे शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांनीही या बंदराला अगदी प्रारंभापासून विरोध केला आहे. त्यांनीही आपल्या या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. १९९७-९८ मध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सरकार असताना ‘अ‍ॅडव्हांटेज महाराष्ट्र’ या परीषदेत आॅस्ट्रेलियाच्या ‘पी अ‍ॅण्ड ओ’ या कंपनीला वाढवण बंदर विकसीत करण्याचे इरादापत्र तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांच्या हस्ते देण्यात आले होते. त्याला असलेला विरोध लक्षात आल्यानंतरही ते साकारण्याचा हट्ट युती सरकारने कायम ठेवला तेव्हा शिवसेनेने ३५ हजार भूमीपुत्रांच्या सह्या असलेले निवेदन देऊन हे बंदर रद्द करण्याची मागणी केली होती. ती शिवसेना प्रमुखांनी मान्य केली होती. त्यानंतर पुन्हा हे बंदर साकारणीचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे पर्यावरणमंत्रीही सेनेचे आणि त्याला विरोध करणारे पालघर जिल्हा संपर्क प्रमुखही सेनेचे अशी जुंपली आहे.