शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश पुजारी मूळचा मटकेवाल्याचा पंटर

By admin | Updated: September 23, 2015 03:48 IST

खंडणी न दिल्याने उल्हासनगरमधील केबल चालक सच्चिदानंद करिरा यांची हत्या करुन सुरेश पुजारी याने खंडणीच्या जगतात आपले नाव कोरण्याचा प्रयत्न केला आहे

पंकज पाटील, अंबरनाथखंडणी न दिल्याने उल्हासनगरमधील केबल चालक सच्चिदानंद करिरा यांची हत्या करुन सुरेश पुजारी याने खंडणीच्या जगतात आपले नाव कोरण्याचा प्रयत्न केला आहे. मंचेकर आणि रवी पुजारीनंतर तो खंडणीसाठी अनेकांना धमकावत आहे. त्याला उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यातील बड्या व्यापाऱ्यांची चांगलीच माहिती असल्याने त्यांना धमकावून खंडणी वसुलण्याचे काम त्याने परदेशात राहुन सुरु केले आहे. मात्र पुजारीविरोधात अनेक तक्रारी आल्याने आता पोलीसांनीही त्याच्या हस्तकांना ताब्यात घेण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. तपासात तो कुणी मोठा गुंड नसून मूळचा अंबरनाथ येथील एका पूर्वाश्रमीच्या मटक्यासह जुगाराच्या अड्ड्यावरील पंटर असल्याचे समोर आले आहे.सुरेश मंचेकर आणि रवी पुजारी यांच्या नावाची दहशत ठाणे जिल्ह्यातील बड्या व्यापाऱ्यांना चांगलीच माहिती आहे. मात्र या दोन्ही नावांना बगल देत रवी पुजारीचा हस्तक म्हणून पुढे आलेला सुरेश पुजारी याने खंडणीसाठी धमक्यांचे सत्र सुरु केले आहे. गेल्या सहा महिन्यात पुजारीने कल्याण, उल्हासनगर,अंबरनाथ आणि आता बदलापूरातील बड्या व्यक्तिंना खंडणीसाठी धमक्यांचे सत्र सुरु केले आहे. आपल्या धमक्यांना कोणीच भीक घालत नाही म्हणून पुजारीने आपल्या हस्तकामार्फत उल्हासनगरमधील केबल चालक करिरा याची हत्या केली. या हत्येनंतर इतर व्यापारी आपल्याला सहज खंडणी देतील अशी त्याची अपेक्षा होती. या हत्येची जबाबदारी त्याने पत्रकारांना फोन करुन घेतली. वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर आपले नाव झळकल्यावर इतर व्यापारी आपल्याला सहज खंडणी देतील अशी अपेक्षा त्याने बाळगली होती. मात्र या हत्येनंतर त्याने पुन्हा खंडणीसाठी ज्यांना फोन केले त्यांनी खंडणी देण्याऐवजी त्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. बदलापूरचे कॅप्टन आशिष दामले यांच्याकडे २ कोटींची खंडणी मागून त्याने आपला दरारा चाचपण्याचा प्रयत्न केला. मात्र परदेशात बसून खंडणी मागणाऱ्या या पुजारीची तक्रार करणे दामले यांनी पसंत केले. तक्रारींचे सत्र वाढल्याने आता पोलीस प्रशासनानेही त्याचा शोध सुरु केला आहे. तसेच त्याच्या हस्तकांची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे. सुरेशचा आलेला धमकीचा फोन हा पोरकटपणा समजून अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काहींनी तर साधी तक्रारही केली नाही. त्यातलाच एक व्यापारी म्हणजे उल्हासनगरचा केबल चालक करिरा हा होता. करिरा त्याच्या धमक्यांना भीक घालत नसल्यानेच त्याची हत्या करुन आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. या हत्येनंतर त्याने बदलापुरातील नगरसेवक दामले याच्याकडे २ कोटींची खंडणी मागून आपला जोर अजमावण्यचा प्रयत्न केला. मात्र दामले यांनी पोलिसांकडे तक्रार करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. खंडणी ऐवजी व्यापारी आपली तक्रार करीत असल्याने तो आणि त्याच्या हस्तकांची चांगलीच कोंडी झाली आहे.