शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सुरेश पुजारी मूळचा मटकेवाल्याचा पंटर

By admin | Updated: September 23, 2015 03:48 IST

खंडणी न दिल्याने उल्हासनगरमधील केबल चालक सच्चिदानंद करिरा यांची हत्या करुन सुरेश पुजारी याने खंडणीच्या जगतात आपले नाव कोरण्याचा प्रयत्न केला आहे

पंकज पाटील, अंबरनाथखंडणी न दिल्याने उल्हासनगरमधील केबल चालक सच्चिदानंद करिरा यांची हत्या करुन सुरेश पुजारी याने खंडणीच्या जगतात आपले नाव कोरण्याचा प्रयत्न केला आहे. मंचेकर आणि रवी पुजारीनंतर तो खंडणीसाठी अनेकांना धमकावत आहे. त्याला उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यातील बड्या व्यापाऱ्यांची चांगलीच माहिती असल्याने त्यांना धमकावून खंडणी वसुलण्याचे काम त्याने परदेशात राहुन सुरु केले आहे. मात्र पुजारीविरोधात अनेक तक्रारी आल्याने आता पोलीसांनीही त्याच्या हस्तकांना ताब्यात घेण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. तपासात तो कुणी मोठा गुंड नसून मूळचा अंबरनाथ येथील एका पूर्वाश्रमीच्या मटक्यासह जुगाराच्या अड्ड्यावरील पंटर असल्याचे समोर आले आहे.सुरेश मंचेकर आणि रवी पुजारी यांच्या नावाची दहशत ठाणे जिल्ह्यातील बड्या व्यापाऱ्यांना चांगलीच माहिती आहे. मात्र या दोन्ही नावांना बगल देत रवी पुजारीचा हस्तक म्हणून पुढे आलेला सुरेश पुजारी याने खंडणीसाठी धमक्यांचे सत्र सुरु केले आहे. गेल्या सहा महिन्यात पुजारीने कल्याण, उल्हासनगर,अंबरनाथ आणि आता बदलापूरातील बड्या व्यक्तिंना खंडणीसाठी धमक्यांचे सत्र सुरु केले आहे. आपल्या धमक्यांना कोणीच भीक घालत नाही म्हणून पुजारीने आपल्या हस्तकामार्फत उल्हासनगरमधील केबल चालक करिरा याची हत्या केली. या हत्येनंतर इतर व्यापारी आपल्याला सहज खंडणी देतील अशी त्याची अपेक्षा होती. या हत्येची जबाबदारी त्याने पत्रकारांना फोन करुन घेतली. वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर आपले नाव झळकल्यावर इतर व्यापारी आपल्याला सहज खंडणी देतील अशी अपेक्षा त्याने बाळगली होती. मात्र या हत्येनंतर त्याने पुन्हा खंडणीसाठी ज्यांना फोन केले त्यांनी खंडणी देण्याऐवजी त्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. बदलापूरचे कॅप्टन आशिष दामले यांच्याकडे २ कोटींची खंडणी मागून त्याने आपला दरारा चाचपण्याचा प्रयत्न केला. मात्र परदेशात बसून खंडणी मागणाऱ्या या पुजारीची तक्रार करणे दामले यांनी पसंत केले. तक्रारींचे सत्र वाढल्याने आता पोलीस प्रशासनानेही त्याचा शोध सुरु केला आहे. तसेच त्याच्या हस्तकांची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे. सुरेशचा आलेला धमकीचा फोन हा पोरकटपणा समजून अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काहींनी तर साधी तक्रारही केली नाही. त्यातलाच एक व्यापारी म्हणजे उल्हासनगरचा केबल चालक करिरा हा होता. करिरा त्याच्या धमक्यांना भीक घालत नसल्यानेच त्याची हत्या करुन आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. या हत्येनंतर त्याने बदलापुरातील नगरसेवक दामले याच्याकडे २ कोटींची खंडणी मागून आपला जोर अजमावण्यचा प्रयत्न केला. मात्र दामले यांनी पोलिसांकडे तक्रार करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. खंडणी ऐवजी व्यापारी आपली तक्रार करीत असल्याने तो आणि त्याच्या हस्तकांची चांगलीच कोंडी झाली आहे.