शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

दुर्लक्षामुळे सूर्या कालव्यांची झाली कचराकुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 05:40 IST

सफाईच्या कंत्राटात अनेकांचे उखळ पांढरे : गाळ, दगड, गोटे, गवतामुळे कालवे झाले दिसेनासे

कासा : डहाणू तालूक्यातील गावांना उन्हाळ शेतीला पाणी पुरविणाऱ्या सूर्या धरणाच्या कालव्यांमध्ये साठलेल्या गाळ व कचºयामुळे त्यांना कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आदिवासी भागातील, डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यातील गावांना उन्हाळ्यात शेतीसाठी कालव्याने पाणीपुरवठा केला जातो. या मध्ये डहाणू तालुक्यातील सूर्यानगर, वाघाडी, सोनाळे, खानीव, वेती, वरोती, तवा, पेठ, धामटणे, चारोटी, कासा, सारणी, निकावली, उर्से, साये, रानशेत, साखरे, गोवणे, घोळ, ऐना, दाभोण, वधना आदी तर पालघर तालुक्यातील सोमटा, बºहाणपूर आंबेदा, नानिवली, आकेगव्हान, चिंचारे, रावते, शिगाव, कुकडे, महागाव, गारगाव, वाळवे, गुंदले आदी सुमारे १०० गावांतील शेतीला पाणी पुरविले जाते.

सिंचन या प्रमुख उद्देशाने हे धरण बांधण्यात आले होते. या कालव्यातून १४ हजार ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली आहे. दरवर्षी १५ डिसेंबरपासून कालव्यातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र गाळ, कचरा, दगड मोठ्या प्रमाणात मुख्य कालव्या प्रमाणेच उप कालव्यामध्ये साचले आहे. त्याची साफसफाई न करता यंदाही डाव्या कालव्यातून ८ डिसेंबरला पाणी सोडले. उजवा कालवा काही ठिकाणी नादुरुस्त झाला होता. त्याची फक्त एक दोन ठिकाणी तात्पुरती दुरु स्ती करून १३ डिसेंबरपासून पाणी सोडले. मात्र ८ डिसेंबरला डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी अद्याप गावांपर्यंत पोहोचलेले नाही. बºयाच वेळा सफाई व गाळ काढण्याचे काम न करता बिले काढली असे आरोप केले जातात. त्यामुळे २००९ पासून या कामांना मंजुरी दिली जात नाही. व ती हातीही घेतली जात नाहीत. त्यामुळे यापुढे गाळ कचरा काढण्याची कामे शासनाच्या यांत्रिकी विभागामार्फत केली जातील असे जलसंपदाचे अधिकारी सांगतात.मशिनरीच्या सफाईला मर्यादाच्यांत्रिकी विभागाच्या या मोठ्या मशिनरी फक्त मुख्य कालव्यात काही ठिकाणीच उतरवून साफसफाई करता येते. ती सर्व ठिकाणी होऊ शकत नाही. आणि उप कालवे, शेतीला पाणीपुरवठा करणारे लहान कालवे या मध्ये तर ती उतरवता येत नाही. त्यामुळेच गाळ काढला गेला नाही. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार