शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सूर्याचे कार्यालय पालघर की डहाणूत?

By admin | Updated: December 10, 2015 01:45 IST

पालघर तालुक्यातील सुर्यानगर येथून शहापूर येथे हलवलेले सूर्याच्या प्रकल्पाचे कार्यालय बड्या प्रयत्नांनी पुन्हा पालघर जिल्हयात आणले जाणार आहेत.

शोकत शेख,  डहाणू पालघर तालुक्यातील सुर्यानगर येथून शहापूर येथे हलवलेले सूर्याच्या प्रकल्पाचे कार्यालय बड्या प्रयत्नांनी पुन्हा पालघर जिल्हयात आणले जाणार आहेत. सूर्याच्या नदीवर बांधण्यात आलेले कवडास आणि धामणी ही दोन्ही धरणे पालघर जिल्हयात असूनही त्यांच्या कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय मात्र शहापूर येथे असल्यामुळे शेतकऱ्यांना आपली कामे करण्यासाठी शहापूरला जावे लागत होते. सूर्या नगर येथे केवळ उपअभियंता यांचेच कार्यालय होते. त्यामुळे त्यांना मर्यादित अधिकार असल्यामुळे गळती, पाटाची दुरुस्ती देखभाल यावर अनेक बंधने येत होती. परिणामी सूर्यांच्या कालव्यांना ठिकठिकाणी भगदाडे पडून शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी शहापूर येथील हे कार्यालय डहाणू अथवा पालघर येथे स्थलांतरीत करावे अशी मागणी केली होती. त्यानुसार हे कार्यालय पुन्हा पालघर जिल्ह्यात स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे संकेत मिळत असून १ जानेवारी रोजी हे कार्यालय मनोर येथे स्थलांतरित होणार असल्याचे वृत्त आहे. पाटाला अनेक भागात भगदाड पडल्याने शेतकरी पाण्यापासून वंचित होते. या बाबीबरोबर वेळोवेळी वृत्ते प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेऊन पाटाची बांधबंदिस्ती करण्यात आली आहे. तसेच १५ डिसेंबरपासून सूर्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. कार्याकारी अभियंता दुसाणे यांनी आपल्या अधिकारीवर्गासह प्रत्यक्ष. पाहणी केली असून त्यांनी कालव्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे.