शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सूर्याचे कार्यालय पालघर की डहाणूत?

By admin | Updated: December 10, 2015 01:45 IST

पालघर तालुक्यातील सुर्यानगर येथून शहापूर येथे हलवलेले सूर्याच्या प्रकल्पाचे कार्यालय बड्या प्रयत्नांनी पुन्हा पालघर जिल्हयात आणले जाणार आहेत.

शोकत शेख,  डहाणू पालघर तालुक्यातील सुर्यानगर येथून शहापूर येथे हलवलेले सूर्याच्या प्रकल्पाचे कार्यालय बड्या प्रयत्नांनी पुन्हा पालघर जिल्हयात आणले जाणार आहेत. सूर्याच्या नदीवर बांधण्यात आलेले कवडास आणि धामणी ही दोन्ही धरणे पालघर जिल्हयात असूनही त्यांच्या कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय मात्र शहापूर येथे असल्यामुळे शेतकऱ्यांना आपली कामे करण्यासाठी शहापूरला जावे लागत होते. सूर्या नगर येथे केवळ उपअभियंता यांचेच कार्यालय होते. त्यामुळे त्यांना मर्यादित अधिकार असल्यामुळे गळती, पाटाची दुरुस्ती देखभाल यावर अनेक बंधने येत होती. परिणामी सूर्यांच्या कालव्यांना ठिकठिकाणी भगदाडे पडून शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी शहापूर येथील हे कार्यालय डहाणू अथवा पालघर येथे स्थलांतरीत करावे अशी मागणी केली होती. त्यानुसार हे कार्यालय पुन्हा पालघर जिल्ह्यात स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे संकेत मिळत असून १ जानेवारी रोजी हे कार्यालय मनोर येथे स्थलांतरित होणार असल्याचे वृत्त आहे. पाटाला अनेक भागात भगदाड पडल्याने शेतकरी पाण्यापासून वंचित होते. या बाबीबरोबर वेळोवेळी वृत्ते प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेऊन पाटाची बांधबंदिस्ती करण्यात आली आहे. तसेच १५ डिसेंबरपासून सूर्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. कार्याकारी अभियंता दुसाणे यांनी आपल्या अधिकारीवर्गासह प्रत्यक्ष. पाहणी केली असून त्यांनी कालव्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे.