शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

नवीन वर्षात बळीराजाला भातखरेदी केंद्राचा आधार; शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 01:09 IST

क्विंटलमागे दर तसेच बोनसमध्येही होणार वाढ; जिल्ह्यात २९ केंद्रांची व्यवस्था

- सुनिल घरत पारोळ : सरत्या वर्षी अस्मानी संकटाने कोलमडलेल्या बळीराजाला येणारे नवीन वर्ष हे शुभ संकेत देणारे ठरणार आहे. यंदा आधारभूत भात खरेदी केंद्रावर क्विंटल मागे दरात आणि देण्यात येणाºया बोनसमध्ये वाढ झाल्याने यंदा ही दरवाढ बळीराजाला दिलासा देणारी आहे.गेल्यावर्षी क्विंटलमागे १७५० आणि बोनस २०० रुपये असा शासनाचा भाताला हमीभाव होता. पण यंदा दरात वाढ होत १८५० तसेच बोनस ५०० असा दर लागू झाल्याने शेतकरी बांधवांसाठी ही आनंदवार्ता आहे.भात पीक घेणे आता शेतकऱ्यांसाठी महागडे ठरत असून बी बियाणे, खते, औषधे, मजुरी, ट्रॅक्टरचे वाढणारे दर, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकºयांना भात पीक घेणे परवडत नाही. काही शेतकरी दागिने गहाण ठेवतात तर काही सेवा सोसायटीचे कर्ज घेऊन भात पिकांची लागवड करतात. पीक लागवडीचा खर्च वजा केला असता त्यांच्या हातात काहीच उरत नाही. जर हे भात व्यापारी वर्गाला विकले तर त्यांचा दर हा क्विंटलमागे १२०० ते १५०० असा आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग शेतकºयांची मोठी पिळवणूक करतो. मात्र, आता ही आधारभूत खरेदी केंद्रे शेतकरी वर्गाला मोठी आधार देणारी ठरणार असून शासनाने केलेली दरवाढ ही येणाºया नववर्षाची भेट आहे.धान विक्रीसाठी ७/१२ उतारा, गाव नमुना ‘८ अ’ ची मूळप्रत, शेतकºयांचे बँकेतील खाते पुस्तक, आधारकार्ड, ही कागदपत्रे शेतकºयांना आधारभूत खरेदी केंद्रावर दाखवावी लागणार असून भात खरेदी केल्यानंतर काही दिवसातच शेतकºयांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील आणि बोनसही वेगळा मिळेल.पालघर जिल्ह्यात वाडा, पालघर, विक्रमगड, डहाणू, वसई आणि तलासरी या तालुक्यात ७५ हजार हेक्टरवर भात पीक घेतले जाते. यंदा जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतातील पीक आणि तण वाया गेले. नुकसान मोठे पण भरपाई तुटपुंजी मिळाली.त्यामुळे तयार झालेल्या भात पिकाला योग्य दर मिळावा यासाठी जिल्ह्यात भात खरेदी केंद्रे सुरू करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली होती. त्यानुसार राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय, जव्हार अंतर्गत जिल्ह्यात आधारभूत खरेदी योजना केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.केंद्रे ठरणार शेतकºयांसाठी आधारजव्हार तालुक्यात २, विक्रमगड तालुक्यात ५, मोखाडा तालुक्यात ४, वाडा तालुक्यात ८, डहाणू तालुक्यात ४, तलासरी तालुक्यात २, पालघर तालुक्यात २, वसई तालुक्यात २ अशी पालघर जिल्ह्यात एकूण २९ आधारभूत खरेदी केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही आधारभूत खरेदी केंद्रे शेतकरी वर्गाला मोठी आधार देणारी ठरणार असून शासनाने केलेली दरवाढ ही येणाºया नववर्षाची भेट आहे.