शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

नवीन वर्षात बळीराजाला भातखरेदी केंद्राचा आधार; शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 01:09 IST

क्विंटलमागे दर तसेच बोनसमध्येही होणार वाढ; जिल्ह्यात २९ केंद्रांची व्यवस्था

- सुनिल घरत पारोळ : सरत्या वर्षी अस्मानी संकटाने कोलमडलेल्या बळीराजाला येणारे नवीन वर्ष हे शुभ संकेत देणारे ठरणार आहे. यंदा आधारभूत भात खरेदी केंद्रावर क्विंटल मागे दरात आणि देण्यात येणाºया बोनसमध्ये वाढ झाल्याने यंदा ही दरवाढ बळीराजाला दिलासा देणारी आहे.गेल्यावर्षी क्विंटलमागे १७५० आणि बोनस २०० रुपये असा शासनाचा भाताला हमीभाव होता. पण यंदा दरात वाढ होत १८५० तसेच बोनस ५०० असा दर लागू झाल्याने शेतकरी बांधवांसाठी ही आनंदवार्ता आहे.भात पीक घेणे आता शेतकऱ्यांसाठी महागडे ठरत असून बी बियाणे, खते, औषधे, मजुरी, ट्रॅक्टरचे वाढणारे दर, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकºयांना भात पीक घेणे परवडत नाही. काही शेतकरी दागिने गहाण ठेवतात तर काही सेवा सोसायटीचे कर्ज घेऊन भात पिकांची लागवड करतात. पीक लागवडीचा खर्च वजा केला असता त्यांच्या हातात काहीच उरत नाही. जर हे भात व्यापारी वर्गाला विकले तर त्यांचा दर हा क्विंटलमागे १२०० ते १५०० असा आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग शेतकºयांची मोठी पिळवणूक करतो. मात्र, आता ही आधारभूत खरेदी केंद्रे शेतकरी वर्गाला मोठी आधार देणारी ठरणार असून शासनाने केलेली दरवाढ ही येणाºया नववर्षाची भेट आहे.धान विक्रीसाठी ७/१२ उतारा, गाव नमुना ‘८ अ’ ची मूळप्रत, शेतकºयांचे बँकेतील खाते पुस्तक, आधारकार्ड, ही कागदपत्रे शेतकºयांना आधारभूत खरेदी केंद्रावर दाखवावी लागणार असून भात खरेदी केल्यानंतर काही दिवसातच शेतकºयांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील आणि बोनसही वेगळा मिळेल.पालघर जिल्ह्यात वाडा, पालघर, विक्रमगड, डहाणू, वसई आणि तलासरी या तालुक्यात ७५ हजार हेक्टरवर भात पीक घेतले जाते. यंदा जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतातील पीक आणि तण वाया गेले. नुकसान मोठे पण भरपाई तुटपुंजी मिळाली.त्यामुळे तयार झालेल्या भात पिकाला योग्य दर मिळावा यासाठी जिल्ह्यात भात खरेदी केंद्रे सुरू करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली होती. त्यानुसार राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय, जव्हार अंतर्गत जिल्ह्यात आधारभूत खरेदी योजना केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.केंद्रे ठरणार शेतकºयांसाठी आधारजव्हार तालुक्यात २, विक्रमगड तालुक्यात ५, मोखाडा तालुक्यात ४, वाडा तालुक्यात ८, डहाणू तालुक्यात ४, तलासरी तालुक्यात २, पालघर तालुक्यात २, वसई तालुक्यात २ अशी पालघर जिल्ह्यात एकूण २९ आधारभूत खरेदी केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही आधारभूत खरेदी केंद्रे शेतकरी वर्गाला मोठी आधार देणारी ठरणार असून शासनाने केलेली दरवाढ ही येणाºया नववर्षाची भेट आहे.