शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘सूर्या’ पाणीप्रश्नावर लवकरच बैठक, प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:38 IST

जिल्ह्यातील सूर्या प्रकल्प आणि पिंजाळ नदीचे पाणी वसई-विरारच्या पुढे नेण्याच्या विरोधात सूर्या पाणी बचाव संघर्ष

पालघर : जिल्ह्यातील सूर्या प्रकल्प आणि पिंजाळ नदीचे पाणी वसई-विरारच्या पुढे नेण्याच्या विरोधात सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने आयोजित उपोषणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी घेतली असून लवकरच ह्या प्रश्नावर बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पाटबंधारे विभागाने वाडा व जव्हार तालुक्यातील शेतीला मुबलक पाणी मिळावे ह्या उद्देशाने १९८० साली पिंजाळ प्रकल्प प्रस्तावित केला. मात्र , त्या विभागाने दिलेल्या दहा वर्षांच्या मुदतीमध्ये हे काम पूर्ण न झाल्याने हा प्रकल्प रद्द झाला होता. मात्र, सरकारने नदीजोड प्रकल्पाच्या नावा खाली पिंजाळ प्रकल्पाचे पुनरु जीवन करून दमणगंगा नदीतून आणलेले ५०० दलघमी पाणी आणि पिंजाळ नदीचे ३०० दलघमी पाणी पाणी मुंबई ला नेण्याचा घाट घातला होता.या आधी पाणी वाटप धोरणाचा फायदा उचलीत सूर्या प्रकल्पांतील २२६.९३ दलघमी पाण्या पैकी १८२.८३ दलघमी पाणी वसई-विरार, मीरा-भार्इंदर, मुंबईला नेण्यात आले होते. इथले सिंचन क्षेत्र घटवून, प्रकल्पा खाली गेलेल्या शेतकऱ्यांना तहानलेले ठेवून स्थानिकांच्या हक्काचे पाणी राजकीय वजनाच्या जोरावर नेले जात असल्याच्या निषेधार्थ सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने पालघर येथे १९ मार्च पासून चार दिवस बेमुदत उपोषण सुरू ठेवले होते. त्यानंतर उपोषण कर्त्यांची तब्येत ढासळत असताना शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या हजारो शेतकरी, नागरिकांनी पोलिसांचे बॅरिकेटर्स ओलांडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताबा घेतला होता. सुमारे सात तास कार्यालयात ठाण मांडल्यानंतर आलेल्या जिल्हाधिकाºयांनी आमदार अमित घोडा, उपोषण कर्ते आणि विविध राजकीय पदाधिकाºयांशी चर्चा करीत मुख्यमंत्र्यांच्या भेटी साठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आ. घोडा ह्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मुख्यमंत्र्याच्या भेटीचे प्रयोजन करण्याची विनंती केली होती. त्यांनी स्वत: संघर्ष समितीचे ब्रायन लोबो, जितू राऊळ आदीं सोबत २३ मार्चला मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी या प्रश्नाची माहिती माझ्या पर्यंत आली असून लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी भेटी दरम्यान सांगितले.मनोर : सूर्या प्रकल्पातील पाणी मीरा-भार्इंदर, वसई-विरार या भागाला देण्यासाठी एमएमआरडीए मार्फत सुरु करण्यात आलेले काम उपोषणकर्त्यांच्या भूमिकेमुळे थांबविण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संबधितांना दिले आहेत. सध्या हे प्रकरण मुख्यमंत्र्याच्या कोर्टामध्ये असून या किचकट प्रश्नावर तेथूनच पुढील रणनिती ठरणार आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये शिवसेनेकडून भूमिका घेतली गेल्याने भाजपाच्या गोटात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.जिल्हातील डहाणू,वाडा, विक्र मगड तालुक्यातील सूर्या व पिंजाळ नदीचे पाणी उचलण्याच्या कामाला नांदगावतर्फे मनोर, चिल्हार, वाडे, वैती असे अनेक ठिकाणी एमएमआरडीएमार्फत पाईप लाईन चे काम सुरू करण्यात आले होते. ते बंद करण्यासाठी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच आंदोलन सुरू केले होते. सुर्या व इतर धरणाच्या पाणी प्रश्ना बाबत मुख्यमंत्र्या सोबत झालेल्या बैठकीनंतर काय निर्णय होते ते ४ एप्रिल रोजी कळणार असून त्या नंतरच पुढील प्रक्रिया ठरणार आहे असे नारनवरे म्हणाले.