शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर्या’ पाणीप्रश्नावर लवकरच बैठक, प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:38 IST

जिल्ह्यातील सूर्या प्रकल्प आणि पिंजाळ नदीचे पाणी वसई-विरारच्या पुढे नेण्याच्या विरोधात सूर्या पाणी बचाव संघर्ष

पालघर : जिल्ह्यातील सूर्या प्रकल्प आणि पिंजाळ नदीचे पाणी वसई-विरारच्या पुढे नेण्याच्या विरोधात सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने आयोजित उपोषणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी घेतली असून लवकरच ह्या प्रश्नावर बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पाटबंधारे विभागाने वाडा व जव्हार तालुक्यातील शेतीला मुबलक पाणी मिळावे ह्या उद्देशाने १९८० साली पिंजाळ प्रकल्प प्रस्तावित केला. मात्र , त्या विभागाने दिलेल्या दहा वर्षांच्या मुदतीमध्ये हे काम पूर्ण न झाल्याने हा प्रकल्प रद्द झाला होता. मात्र, सरकारने नदीजोड प्रकल्पाच्या नावा खाली पिंजाळ प्रकल्पाचे पुनरु जीवन करून दमणगंगा नदीतून आणलेले ५०० दलघमी पाणी आणि पिंजाळ नदीचे ३०० दलघमी पाणी पाणी मुंबई ला नेण्याचा घाट घातला होता.या आधी पाणी वाटप धोरणाचा फायदा उचलीत सूर्या प्रकल्पांतील २२६.९३ दलघमी पाण्या पैकी १८२.८३ दलघमी पाणी वसई-विरार, मीरा-भार्इंदर, मुंबईला नेण्यात आले होते. इथले सिंचन क्षेत्र घटवून, प्रकल्पा खाली गेलेल्या शेतकऱ्यांना तहानलेले ठेवून स्थानिकांच्या हक्काचे पाणी राजकीय वजनाच्या जोरावर नेले जात असल्याच्या निषेधार्थ सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने पालघर येथे १९ मार्च पासून चार दिवस बेमुदत उपोषण सुरू ठेवले होते. त्यानंतर उपोषण कर्त्यांची तब्येत ढासळत असताना शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या हजारो शेतकरी, नागरिकांनी पोलिसांचे बॅरिकेटर्स ओलांडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताबा घेतला होता. सुमारे सात तास कार्यालयात ठाण मांडल्यानंतर आलेल्या जिल्हाधिकाºयांनी आमदार अमित घोडा, उपोषण कर्ते आणि विविध राजकीय पदाधिकाºयांशी चर्चा करीत मुख्यमंत्र्यांच्या भेटी साठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आ. घोडा ह्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मुख्यमंत्र्याच्या भेटीचे प्रयोजन करण्याची विनंती केली होती. त्यांनी स्वत: संघर्ष समितीचे ब्रायन लोबो, जितू राऊळ आदीं सोबत २३ मार्चला मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी या प्रश्नाची माहिती माझ्या पर्यंत आली असून लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी भेटी दरम्यान सांगितले.मनोर : सूर्या प्रकल्पातील पाणी मीरा-भार्इंदर, वसई-विरार या भागाला देण्यासाठी एमएमआरडीए मार्फत सुरु करण्यात आलेले काम उपोषणकर्त्यांच्या भूमिकेमुळे थांबविण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संबधितांना दिले आहेत. सध्या हे प्रकरण मुख्यमंत्र्याच्या कोर्टामध्ये असून या किचकट प्रश्नावर तेथूनच पुढील रणनिती ठरणार आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये शिवसेनेकडून भूमिका घेतली गेल्याने भाजपाच्या गोटात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.जिल्हातील डहाणू,वाडा, विक्र मगड तालुक्यातील सूर्या व पिंजाळ नदीचे पाणी उचलण्याच्या कामाला नांदगावतर्फे मनोर, चिल्हार, वाडे, वैती असे अनेक ठिकाणी एमएमआरडीएमार्फत पाईप लाईन चे काम सुरू करण्यात आले होते. ते बंद करण्यासाठी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच आंदोलन सुरू केले होते. सुर्या व इतर धरणाच्या पाणी प्रश्ना बाबत मुख्यमंत्र्या सोबत झालेल्या बैठकीनंतर काय निर्णय होते ते ४ एप्रिल रोजी कळणार असून त्या नंतरच पुढील प्रक्रिया ठरणार आहे असे नारनवरे म्हणाले.