शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

सूर्या प्रकल्प आजही अपूर्णच, उपकालवे काढले पण पाणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 00:52 IST

डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांमधील शेतीला पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे.

शशिकांत ठाकूरकासा : डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांमधील शेतीला पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. सिंचन या प्रमुख उद्देशाने कासाजवळील धामणी येथे १९७५ मध्ये धरण बांधण्यात आले आणि कालवे काढण्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या. मुख्य कालवे उंचावरून जंगलाच्या बाजूला तयार करण्यात आले तर मुख्य कालव्यातून शेतीला पाणी देण्यासाठी उपकालवे काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी हस्तांतरीत केल्या. मात्र डाव्या कालव्याची एकूण लांबी ४७ कि.मी. असून ३३ कि.मी. ते ४७ कि.मी. या १४ कि.मी. कामाला वनविभागाने अद्याप परवानगी दिली नसल्याने मुख्य कालवा फक्त बोरशेतीपर्यंत आहे. पुढे वनविभागाची परवानगी नसल्याने कालवा तयार केला नाही. त्यामुळे बोरशेतीच्या पुढील किराट, नागझरी, निहे, चरी, दामखिंड, वेळगाव, लालोंडे, गुंदले, खुंटल, करवेले आदी २६ गावात मुख्य कालव्याचे काम राखडल्याने अद्याप पाणी मिळाले नाही. यापैकी किराट, गुंदले, करवेले, लालोंडे आदी गावातील शेतकºयांच्या जमिनीत शेतीला मुख्य कालव्यातून पाणी पुरवठा करणारे उपकालवे खोदले आहेत. विशेष म्हणजे उपकालवे तयार करून ४० वर्षे झाली. पण अद्याप येथील शेतकºयांना पाणी नाही. आधी हे कच्चे माती भरावाचे होते. पण १० वर्षांपूर्वी पाण्याचा ठावठिकाणा नसताना जलसंपदा विभागाने लाखो रुपयांची कामे करून काही ठिकाणी पक्क्या सिमेंटचे कालवे केले आहेत. परंतु पाणीच नसल्याने ते झाड, झुडपे दगडाने भरले आहेत. बांधकाम तुटून गेली आहेत. त्यामुळे लाखो रु पयांचा सरकारी खर्च पाण्यात गेला आहे.दरम्यान सिंचन हा प्रमुख उद्देश असताना अजून डाव्या कालव्याची २६ गावे आणि वाणगाव पूर्वेस पाणी मिळालेले नाही. सूर्या प्रकल्प अपूर्ण असताना पाईपलाईन करून विरार, वसई, तारापूर औद्योगिक क्षेत्रात सूर्याचे पाणी नेण्याचे काम सुरू आहे.>सूर्या प्रकल्प अपूर्ण आहे. आमच्या भागात शेतीला पाणीपुरवठा करणारे उपकालवे खोदले आहेत, पण पाणीच नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेला असून हे उपकालवे फक्त शोभेसाठी आहेत.- अविनाश पाटील, कुणबी सेना तालुका प्रमुखसिंचन या प्रमुख उद्देशाने धरण बांधले आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रातील सर्वच शेतकºयांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, त्याशिवाय बाहेर दिले जाऊ नये. - विजय वझे, शेतकरीवन विभागाची परवानगी नसल्याने कालव्याचे काम थांबले होते. सदर परवानगी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून वनविभागाची परवानगी मिळताच कालव्याच्या कामास सुरु वात करून सिंचनाचा लाभ शेतकºयांना दिला जाईल. - रवी पवार, कार्यकारी अभियंता, सूर्या प्रकल्प