शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

सूर्या प्रकल्प आजही अपूर्णच, उपकालवे काढले पण पाणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 00:52 IST

डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांमधील शेतीला पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे.

शशिकांत ठाकूरकासा : डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांमधील शेतीला पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. सिंचन या प्रमुख उद्देशाने कासाजवळील धामणी येथे १९७५ मध्ये धरण बांधण्यात आले आणि कालवे काढण्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या. मुख्य कालवे उंचावरून जंगलाच्या बाजूला तयार करण्यात आले तर मुख्य कालव्यातून शेतीला पाणी देण्यासाठी उपकालवे काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी हस्तांतरीत केल्या. मात्र डाव्या कालव्याची एकूण लांबी ४७ कि.मी. असून ३३ कि.मी. ते ४७ कि.मी. या १४ कि.मी. कामाला वनविभागाने अद्याप परवानगी दिली नसल्याने मुख्य कालवा फक्त बोरशेतीपर्यंत आहे. पुढे वनविभागाची परवानगी नसल्याने कालवा तयार केला नाही. त्यामुळे बोरशेतीच्या पुढील किराट, नागझरी, निहे, चरी, दामखिंड, वेळगाव, लालोंडे, गुंदले, खुंटल, करवेले आदी २६ गावात मुख्य कालव्याचे काम राखडल्याने अद्याप पाणी मिळाले नाही. यापैकी किराट, गुंदले, करवेले, लालोंडे आदी गावातील शेतकºयांच्या जमिनीत शेतीला मुख्य कालव्यातून पाणी पुरवठा करणारे उपकालवे खोदले आहेत. विशेष म्हणजे उपकालवे तयार करून ४० वर्षे झाली. पण अद्याप येथील शेतकºयांना पाणी नाही. आधी हे कच्चे माती भरावाचे होते. पण १० वर्षांपूर्वी पाण्याचा ठावठिकाणा नसताना जलसंपदा विभागाने लाखो रुपयांची कामे करून काही ठिकाणी पक्क्या सिमेंटचे कालवे केले आहेत. परंतु पाणीच नसल्याने ते झाड, झुडपे दगडाने भरले आहेत. बांधकाम तुटून गेली आहेत. त्यामुळे लाखो रु पयांचा सरकारी खर्च पाण्यात गेला आहे.दरम्यान सिंचन हा प्रमुख उद्देश असताना अजून डाव्या कालव्याची २६ गावे आणि वाणगाव पूर्वेस पाणी मिळालेले नाही. सूर्या प्रकल्प अपूर्ण असताना पाईपलाईन करून विरार, वसई, तारापूर औद्योगिक क्षेत्रात सूर्याचे पाणी नेण्याचे काम सुरू आहे.>सूर्या प्रकल्प अपूर्ण आहे. आमच्या भागात शेतीला पाणीपुरवठा करणारे उपकालवे खोदले आहेत, पण पाणीच नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेला असून हे उपकालवे फक्त शोभेसाठी आहेत.- अविनाश पाटील, कुणबी सेना तालुका प्रमुखसिंचन या प्रमुख उद्देशाने धरण बांधले आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रातील सर्वच शेतकºयांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, त्याशिवाय बाहेर दिले जाऊ नये. - विजय वझे, शेतकरीवन विभागाची परवानगी नसल्याने कालव्याचे काम थांबले होते. सदर परवानगी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून वनविभागाची परवानगी मिळताच कालव्याच्या कामास सुरु वात करून सिंचनाचा लाभ शेतकºयांना दिला जाईल. - रवी पवार, कार्यकारी अभियंता, सूर्या प्रकल्प