शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

सूर्या प्रकल्प आजही अपूर्णच, उपकालवे काढले पण पाणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 00:52 IST

डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांमधील शेतीला पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे.

शशिकांत ठाकूरकासा : डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांमधील शेतीला पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. सिंचन या प्रमुख उद्देशाने कासाजवळील धामणी येथे १९७५ मध्ये धरण बांधण्यात आले आणि कालवे काढण्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या. मुख्य कालवे उंचावरून जंगलाच्या बाजूला तयार करण्यात आले तर मुख्य कालव्यातून शेतीला पाणी देण्यासाठी उपकालवे काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी हस्तांतरीत केल्या. मात्र डाव्या कालव्याची एकूण लांबी ४७ कि.मी. असून ३३ कि.मी. ते ४७ कि.मी. या १४ कि.मी. कामाला वनविभागाने अद्याप परवानगी दिली नसल्याने मुख्य कालवा फक्त बोरशेतीपर्यंत आहे. पुढे वनविभागाची परवानगी नसल्याने कालवा तयार केला नाही. त्यामुळे बोरशेतीच्या पुढील किराट, नागझरी, निहे, चरी, दामखिंड, वेळगाव, लालोंडे, गुंदले, खुंटल, करवेले आदी २६ गावात मुख्य कालव्याचे काम राखडल्याने अद्याप पाणी मिळाले नाही. यापैकी किराट, गुंदले, करवेले, लालोंडे आदी गावातील शेतकºयांच्या जमिनीत शेतीला मुख्य कालव्यातून पाणी पुरवठा करणारे उपकालवे खोदले आहेत. विशेष म्हणजे उपकालवे तयार करून ४० वर्षे झाली. पण अद्याप येथील शेतकºयांना पाणी नाही. आधी हे कच्चे माती भरावाचे होते. पण १० वर्षांपूर्वी पाण्याचा ठावठिकाणा नसताना जलसंपदा विभागाने लाखो रुपयांची कामे करून काही ठिकाणी पक्क्या सिमेंटचे कालवे केले आहेत. परंतु पाणीच नसल्याने ते झाड, झुडपे दगडाने भरले आहेत. बांधकाम तुटून गेली आहेत. त्यामुळे लाखो रु पयांचा सरकारी खर्च पाण्यात गेला आहे.दरम्यान सिंचन हा प्रमुख उद्देश असताना अजून डाव्या कालव्याची २६ गावे आणि वाणगाव पूर्वेस पाणी मिळालेले नाही. सूर्या प्रकल्प अपूर्ण असताना पाईपलाईन करून विरार, वसई, तारापूर औद्योगिक क्षेत्रात सूर्याचे पाणी नेण्याचे काम सुरू आहे.>सूर्या प्रकल्प अपूर्ण आहे. आमच्या भागात शेतीला पाणीपुरवठा करणारे उपकालवे खोदले आहेत, पण पाणीच नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेला असून हे उपकालवे फक्त शोभेसाठी आहेत.- अविनाश पाटील, कुणबी सेना तालुका प्रमुखसिंचन या प्रमुख उद्देशाने धरण बांधले आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रातील सर्वच शेतकºयांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, त्याशिवाय बाहेर दिले जाऊ नये. - विजय वझे, शेतकरीवन विभागाची परवानगी नसल्याने कालव्याचे काम थांबले होते. सदर परवानगी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून वनविभागाची परवानगी मिळताच कालव्याच्या कामास सुरु वात करून सिंचनाचा लाभ शेतकºयांना दिला जाईल. - रवी पवार, कार्यकारी अभियंता, सूर्या प्रकल्प