शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

विक्रमगडमध्ये उन्हाळी भात पीक कापणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 07:02 IST

आता उन्हाळी भात पीक तयार झाले असून त्याच्या कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे मजूर मिळेनासे झाले आहेत.

- राहुल वाडेकरविक्रमगड : विक्रमगड तालुक्यात सिंचनाच्या विशेष सुविधा उपलब्ध नसतानाही खरिपात तर भात लागवड होतेच; परंतु उन्हाळी हंगामातसुद्धा मुहू खुर्द लघु पाटबंधारा व खांड लघु पाटबंधाऱ्याच्या पाटाच्या पाण्यावर सजन, झडपोली, खांड गावात भात पिकाची लागवड करून येथील प्रयोगशील शेतकरी भाताचे उत्पादन घेत आहेत. आता उन्हाळी भात पीक तयार झाले असून त्याच्या कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे मजूर मिळेनासे झाले आहेत. यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळून भात कापणीला सुरुवात केली आहे.यावर्षी तालुक्यात अवकाळी पावसाने भात पिकाची पुरती वाट लावली. भात पीक तयार होण्याच्याच काळात पाऊस पडल्याने पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांचे भात पिकाचे ५० टक्के उत्पन्न घटल्याने लागवडीचा खर्चही निघाला नाही. पीक कर्ज कसे फेडायचे या चिंतेत असतानाच आपले मनोबल खचू न देता पुन्हा उभारी घेत झडपोली, सजन गावातील शेतकºयांनी उन्हाळी भातशेतीची लागवड केली. या वर्षी उन्हाळी भात पिकात तरी आपला खर्च भरून निघेल या आशेवर शेतकरी आहेत.यंदा उन्हाळी भात पीक थोड्या फार प्रमाणात चांगले आले आहे. झडपोली, सजन गावातील प्रयोगशील शेतकरी सेवक सांबरे, अंकुश सांबरे, नरेश सांबरे, शरद सांबरे, श्रीधर सांबरे, सुभाष सांबरे, रमेश सांबरे, नारायण सांबरे, मधुकर सांबरे अशा अनेक शेतकºयांनी आपल्या शेतात उन्हाळी हंगामात भाताचे पीक घेतले. त्यासाठी त्यांनी भात लागवडीच्या वर्षानुवर्षे अनुभवाच्या जोरावर शेतात सुधारित पद्धतीने अंदाजे २५ ते ३० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची रोवणी केली आहे. आता भात पीक कापणीस आले आहे.या भागातील शेतकºयांना यंत्राच्या साहाय्याने उन्हाळी भातशेती लागवड प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यांत्रिक पद्धतीने पीक लागवड कशी करतात याचे मार्गदर्शन वेळोवेळी शेतकºयांना कृषी विभागाकडून देण्यात आले.-प्रभाकर सांबर, कृषी सहायक, सजनपावसाळी भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे उन्हाळी भातशेतीतून मोठ्या अपेक्षा आहेत. भातशेती कापणीस तयार झाली आहे. मात्र, अचानक आलेल्या कोरोना संसर्गाच्या संकटामुळे भातकापणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. हाताशी आलेले भात पीक वाया जाऊ नये म्हणून आम्ही शेतकºयांनी कुटुंबाच्या मदतीने सोशल डिस्टन्सिंग पाळत भात पीक कापणीस सुरुवात केली आहे.- सेवक सांबरे, उन्हाळी भात पीक लागवड केलेले शेतकरी, सजन गाव

टॅग्स :palgharपालघर