शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 08:04 IST

पूल नसल्याने होत आहेत ग्रामस्थांचे हाल

वाडा : तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत रायकरपाडा हे २० घरांचे गाव आहे. मात्र ऊन असो की पाऊस, गावातील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी दररोज स्वत:च तराफा चालवत वैतरणा नदीचा अर्ध्या तासाचा प्रवास करून जातात. त्यांचा हा शिक्षणासाठीचा प्रवास पावसाळ्यात जीवघेणा ठरत आहे.

रायकरपाडा या गावातील १५ विद्यार्थी सोनाळा हायस्कूल येथे, २ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा कापरी, तर एक विद्यार्थी वाडा कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेत आहे. मात्र, या पाड्यावरील विद्यार्थ्यांना प्रवासासाठी नदीवर कोणताही पूल नाही तर इतर गावपाड्यांमार्गे असलेला कच्चा रस्ता हा १० ते १२ किलोमीटर वळणाचा ठरतो. त्यामुळे येथील नागरिकांसह विद्यार्थ्यांना ही नदी पार करण्याशिवाय पर्याय नसतो.

पूल होऊन आमची गैरसोय दूर व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांकडे वारंवार हेलपाटे मारूनही आमची कोणी दखल घेत नाही. त्यामुळे आम्हाला संघर्षमय जीवन जगावे लागत आहे.

विनोद हाडळ, ग्रामस्थ

गावात जाण्यासाठी वैतरणा नदी पार करून जावे लागते. त्यामुळे तेथे पूल होणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, या गावातील विद्यार्थ्यांची शाळेच्या ठिकाणी सोनाळे येथील वसतिगृहात, तर मुलींची कंळभे येथील मुलींच्या वसतिगृहात व्यवस्था करणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

कुंदन भोईर, ग्रामपंचायत अधिकारी

गर्भवती महिला, लहान मुले यांचीही गैरसोय

एरवी नदीच्या पात्रात पाणी कमी असते. मात्र, पावसाळ्यात वैतरणा नदी रुद्रावतार धारण करते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तराफ्यावरूनच प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांबरोबरच गर्भवती महिला, लहान मुले, रुग्ण यांचीही गैरसोय होत असून, जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.