शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 08:04 IST

पूल नसल्याने होत आहेत ग्रामस्थांचे हाल

वाडा : तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत रायकरपाडा हे २० घरांचे गाव आहे. मात्र ऊन असो की पाऊस, गावातील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी दररोज स्वत:च तराफा चालवत वैतरणा नदीचा अर्ध्या तासाचा प्रवास करून जातात. त्यांचा हा शिक्षणासाठीचा प्रवास पावसाळ्यात जीवघेणा ठरत आहे.

रायकरपाडा या गावातील १५ विद्यार्थी सोनाळा हायस्कूल येथे, २ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा कापरी, तर एक विद्यार्थी वाडा कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेत आहे. मात्र, या पाड्यावरील विद्यार्थ्यांना प्रवासासाठी नदीवर कोणताही पूल नाही तर इतर गावपाड्यांमार्गे असलेला कच्चा रस्ता हा १० ते १२ किलोमीटर वळणाचा ठरतो. त्यामुळे येथील नागरिकांसह विद्यार्थ्यांना ही नदी पार करण्याशिवाय पर्याय नसतो.

पूल होऊन आमची गैरसोय दूर व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांकडे वारंवार हेलपाटे मारूनही आमची कोणी दखल घेत नाही. त्यामुळे आम्हाला संघर्षमय जीवन जगावे लागत आहे.

विनोद हाडळ, ग्रामस्थ

गावात जाण्यासाठी वैतरणा नदी पार करून जावे लागते. त्यामुळे तेथे पूल होणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, या गावातील विद्यार्थ्यांची शाळेच्या ठिकाणी सोनाळे येथील वसतिगृहात, तर मुलींची कंळभे येथील मुलींच्या वसतिगृहात व्यवस्था करणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

कुंदन भोईर, ग्रामपंचायत अधिकारी

गर्भवती महिला, लहान मुले यांचीही गैरसोय

एरवी नदीच्या पात्रात पाणी कमी असते. मात्र, पावसाळ्यात वैतरणा नदी रुद्रावतार धारण करते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तराफ्यावरूनच प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांबरोबरच गर्भवती महिला, लहान मुले, रुग्ण यांचीही गैरसोय होत असून, जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.