शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तलासरीत बससाठी विद्यार्थी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 02:45 IST

आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या प्रवाहात येत असले तरी घरची आर्थिक परिस्थिीत त्यांची पावले रोखत आहे.

तलासरी : आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या प्रवाहात येत असले तरी घरची आर्थिक परिस्थिीत त्यांची पावले रोखत आहे. खिशात पैसे नसल्यामुळे प्रवास खर्च परवडत नाही. म्हणून मंगळवारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन मानव विकास च्या बससाठी आंदोलन केले.गावातील शाळा सातवी आठवी पर्यंत आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी तालुका परिसरातून तलासरीत येतात. परंतु या विद्यार्थ्यांना मानव विकासच्या बसेस उपलब्ध नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. रिक्षा टेम्पोतून यावे लागते. यात त्याचा वेळ, पैसा वाया जातो. तसेच त्याचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे या बसेस साठी शाळा व्यवस्थापनाकडून पंचायत समिती तलासरीला पत्र व्यवहार केला आहे. मात्र, पंचायत समितीचे शिक्षण विभाग व डहाणू एस टी डेपो चे अधिकारी चालढकल करीत असल्याने अखेर विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागले. या वेळी अधिकाऱ्यांनी तलासरी भागात बसेस सुरू करण्याचे अश्वासन दिलेस्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया च्या वतीने मंगळवारी सकाळी हजारो विद्यार्थ्यांनी मानव विकासच्या बस साठी तलासरी नाक्यावर रस्त्यावरच ठिय्या दिला व बसेस सुरू करत नाही तो पर्यंत रस्त्यावर बसण्याचा निर्धार व्यक्त करताच अधिकारी वर्गाची धावाधाव झाली.विद्यार्थ्यांनी या वेळी बसेस नसल्याने त्रास व आर्थिक ओढाताण होत असल्याचे सांगितले. या वेळी डहाणू डेपोचे सुनील वाघ यांनी आपली बाजू मांडताना पंचायत समिती कडून आलेले प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले आहेत. पण अजून मंजुरी न आल्याने मानव विकासच्या बसेस सुरू झाल्या नसल्याचे सांगितले. तलासरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सदानंद जनाथे यांनी शाळांकडून आलेले प्रस्ताव डहाणू डेपोला पाठवीत असतो पण त्याच्या कडून कार्यवाही करण्यास टाळाटाळ होत असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. जुलै महिन्यात दिलेले प्रस्तावावर कार्यवाही केली असती तर विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसायची वेळ आली नसती असे त्यांनी सांगितले.आजच्या घडीला तलासरी भागात मानव विकासच्या सहा बसेस रस्त्यावर धावत आहेत पण त्या फक्त मुख्य रस्त्यावरून असल्याने त्यांचा सर्वच विद्यार्थ्यांना फायदा होत नाही. बरेच विद्यार्थी खेड्या पाड्यावर राहत असल्याने त्यांना तीन ते चार किमी पायपीट करावी लागते. तेव्हा ते मुख्य मार्गावर येतात.तलासरीतील शाळे साठी कासा चारोटी आंबोली पासून ते आच्छाड, डोंगरी, सायवन पासून विद्यार्थी येत असतात. मात्र, या मार्गावर बसेस धावतच नसल्याने विद्यार्थ्यांना रिक्षाने यावे लागते. तसेच आच्छाड, चारोटी आंबोली या गावातील मुली सकाळी लवकर येवून रिक्षा, जीप पकडतात. यामुळे शिक्षणाची गळती वाढत आहे.