शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाचा भातशेतीला तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:56 IST

शुक्रवारी जिल्ह्यात पाऊस : भातशेतीच्या आशा संपुष्टात; शेतकरी पुन्हा हवालदिल

पारोळ : वादळी पावसाने शुक्रवारी जोरदार हजेरी लावल्याने कापलेले भात पीक भिजले असतानाच शेतात उभे असलेले पीकही आडवे केल्याने या पावसात शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. नदी नाल्यातील पाणी वाढल्याने ते पाणीही शेतात जात भातपिकाचे मोठे नुकसान केले.

६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान ‘महा’ चक्र ीवादळ धडकेल आणि या दरम्यान पाऊसही जोरदार होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. तर या दरम्यान भात कापणीची कामेही बंद ठेवण्यास प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. बुधवारी हवामानात कोणताही बदल दिसला नाही. तर गुरुवारी ऊन असल्याने अनेक शेतकऱ्यांनी भात कापणी केली. तर तयार झालेले पीक पावसाच्या भीतीने किती दिवस शेतात ठेवायचे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पण शेतकºयांचा अंदाज चुकीचा ठरवत पावसाने शुक्र वारी पहाटे जोरदार हजेरी लावली. यात कापलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान होत उभे असलेले उरले सुरले पीकही आडवे केले. तर या पावसात आडव्या झालेल्या पिकात पाणी घुसल्याने ते पाणी शेताबाहेर काढण्याचे नवीन आव्हान शेतकºयांपुढे उभे राहिले आहे. तर शेतात पाणी झाल्याने शेतात कापणी केलेले भातपीक उंच जागी ठेवण्यासाठी पुन्हा शेतकºयांचा मजुरीचा खर्च वाढणार आहे.

या हंगामात भातशेतीवर निसर्गाची अवकृपा राहिली. लावणीच्या हंगामात अतिवृष्टीमुळे भात रोपे खराब झाली. त्यामुळे काही शेतकºयांनी दुबार लागवड केली. तर भातपीक कापणीसाठी तयार झाले असताना, काही ठिकाणी कापणीही केली असताना दिवाळीआधी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे पीक आणि तणाचे मोठे नुकसान केले. कापणी केलेले भातपीक पावसामुळे १० दिवस शेतात राहिल्याने तणही वाया गेल्याने जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला.ढगाळ वातावरणाने शेतकरी चिंताग्रस्ततलासरी : परतीच्या पावसाने शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले असताना नवीन ‘महा’ चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्याने पावसाने आधीच भात पीक वाया गेले. चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर शुक्रवारी पहाटे जोरदार पावसाच्या सरी पडल्याने कापलेल्या पिकाचे नुकसान झाले.त्यातच दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने आता उरले सुरले पीकही वाहून नेतो की काय या चिंतेत शेतकरी आहे. चक्र ीवादळाने मुसळधार पावसाबरोबर जोरदार वादळी वाºयाची शक्यता वर्तवली होती.पण काही वेळच जोरदार सरी कोसळल्याने संभाव्य धोका टाळल्याने शेतकºयांबरोबर प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. पण पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पिकाचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.वाडा : शुक्रवारी पहाटेपासून पुन्हा पावसाने धुमाकूळ घातला असून भात पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. आता मात्र उरले-सुरले तेही हातून निघून गेल्याने शेतकरी पार मेटाकुटीला आला आहे. हाती भातच येणार नसल्याने शेतीसाठी घेतलेले सेवा सहकारी सोसायट्यांचे कर्ज फेडायचे कसे आणि कुटुंब कसे चालवायचे हा प्रश्न बळीराजाला पडला आहे. चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने भात कापण्या जोमाने सुरू झाल्या होत्या. मात्र, शुक्रवारी पहाटेपासून पुन्हा जोरदार सरी बसू लागल्याने पूर्ण पिकच हातून निघून जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्ण शेतात पाणीच पाणी झाल्याने संपूर्ण पिकाची नासाडी झाली आहे.

वाड्यात भात हे एकमेव पीक असून यावर येथील शेतकरी आपली उपजीविका करतात. आता तेच हातून निघून गेल्याने येथील बळीराजा संकटात सापडला असून मुला-बाळांचे शिक्षण तसेच शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.सांगा, आम्ही जगायचे तरी कसे ?कासा : डहाणू तालुक्यात गुरु वारी रात्री जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतात पाणी साचले आहे. पिके पाण्यात भिजत पडल्याने आता घरी खायला पण धान्य राहणार नाही. त्यामुळे सांगा आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न शेतकरी करत आहेत.

तालुक्यातील ग्रामीण भागातील भातशेतीचे पावसामुळे आधीच मोठे नुकसान झाले आहे. असे असताना गुरुवारी रात्री पुन्हा पावसाने तडाखा दिला. त्यामुळे शेती थोडी सुकत नाही तर पुन्हा शेते पावसाने भरून गेली आहेत. आधीच बरीच कुजलेली, रुजलेली पिके कापायलाही पावसाची उघाडी मिळत नाही. त्यामुळे थोड्या फार प्रमाणात शिल्लक राहिलेले पीक कापायला चार, पाच दिवसांपासून सुरु वात केली तर गुरुवारी रात्रभर पाऊस पडल्याने शेतात पुन्हा पाणी भरले आहे. शेतात चिखल झाला आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेले थोडे फार कधी कापायचे असा शेतकºयांना मोठा प्रश्न पडला असून सर्वच पीक वाया गेले. खायचे काय आणि जगायचे कसे? असा यक्ष प्रश्न शेतकºयांना पडला आहे. सतत पीक पाण्यात राहिल्याने आता पावली पण कुजली व काळी पडली आहे. त्यामुळे पाळीव गुरांच्या खाण्याचा प्रश्न पण गंभीर झाला आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार