शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

दुसऱ्या दिवशीही विक्रमगडमध्ये वादळ

By admin | Updated: June 4, 2017 04:08 IST

या परिसरात सलग दुसऱ्या दिवशी थैमान घालणाऱ्या वादळाने अनेक घरांचे पत्रे उडविले असून त्यांना बेघर केले आहे. याच वेळी झालेल्या विजांच्या कडकाटाने सगळ्यांना

- लोकमत न्यूज नेटवर्क

विक्रमगड : या परिसरात सलग दुसऱ्या दिवशी थैमान घालणाऱ्या वादळाने अनेक घरांचे पत्रे उडविले असून त्यांना बेघर केले आहे. याच वेळी झालेल्या विजांच्या कडकाटाने सगळ्यांना भयभीत केले होते. दोन दिवसांमध्ये आलेल्या वादळाने सर्वसामान्याचे मोठे नुकसान केले आहे़ कुणाचे ६०, कुणाचे ३० तर कुणाचे २० ते कुणाचे ७० पत्रे उडाल्याने पावसाच्या पाण्यामध्ये घरातील धान्यांच्या गोण्याच्या गोण्या भिजून गेल्याने मोठयाप्रमाणावर नुकसान झालेले आहेत़ तर अनेकांच्या घरावर झाडे उन्मळून पडल्याने घरे जमीनदोस्त झाली आहेत़तर दुसऱ्या दिवशी झालेल्या या मुसळधार पावसाबरोबर आलेला वादळी वारा व विजेने एकाला आपले प्राण गमवावे लागलेले आहे़ २ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास आदिवासी शेतकरी सोन्या देवजी कुवरा (४५) रा़ शिळ पैकी दांडेकरपाडा हा इसम घराच्या ओटयावर आणखी दोघांसोबत गप्पा मारत असतांना अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला़ मात्र दैवयोगाने बाजूस असलेले इतर दोघे बचावले या सर्वांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय विक्रमगड येथे हलविण्यांत आले़ मात्र सोन्या कुवरा यांचा अगोदरच मृत्यू झाला होता इतर दोघांनाही अ‍ॅडमीट करण्यात आले. तहसिलदार सुरेश सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली व त्याप्रमाणे अहवाल सादर केला व नैसर्गीक आपत्ती म्हणून सोन्या देवजी कुवरा यांच्या कुटुंबियांना तत्काळ ४ लाखाची मदत मंजूर केली. ही रक्कम त्यांच्या पत्नीचे खाते बॅकेमध्ये उघडून त्यात जमा करण्यांत येणार आहे़तसेच इतर सवादे, खांड या गावातील काही लोकांच्या घरासमोरील झाडांवर देखील वीजा पडून त्यांना धक्का बसला असल्याने त्यांचीही चौकशी तहसिलदारांनी त्यांनाही अ‍ॅडमीट करण्यात आले असून त्यांना आता कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे सांगीतले़शेतकऱ्यांच्या घरांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून शासनाच्या जिआरप्रमाणे जर ज्या भागात घराचे नुकसान झाले आहे़ त्याठिकाणी किमान ६५ मि़ मि़ पावसाची नोंद होणे आवश्यक आहे अशा ठिकाणचे पक्के घर पडल्यास ५,२००, साधे घर पडल्यास ३,४०० व साधेघर पूर्णपणे जमीनदोस्त झाल्यास ४,२०० याप्रमाणे भरपाई मिळते़गेल्या दोन वर्षामध्ये अशा प्रकारचा वादळी वारा व पाऊस व वीजा कोसळणे अशी नैसर्गीक आपत्ती आली नव्हती, यावर्षी दोन दिवसांत विक्रमगडमधील वातारवणच बदलून मोठया प्रमाणावर घरांची पडझड झाली आहे़ झाडे, वीजेचे पोल पडण्याचे वीज गायब होण्याचे प्रकार घडले आहेत. ़विजेच्या धक्याने घाबरलेले खांड व सवादे तसेच शिळ येथील काही नागरिंकांच्या घरी जाऊन मी चौकशी केली व त्यांची विचारपूस करुन उपाय योजना करण्यात आली आहे़ तसेच शिळ पैकी दांडेकरपाडा येथील सोन्या देवजी कुवरा हा इसम विजेच्या धक्याने मृत्यू पावला असून त्यांच्या कुंटुंबांला नैसर्गिक आपत्ती म्हणून शासनाकडून तत्काळ ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यांत आली आहे व लवकरच ही रक्कम त्यांच्या पत्नीच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे़-सुरेश सोनवणे, तहसिलदार विक्रमगड