शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

दुसऱ्या दिवशीही विक्रमगडमध्ये वादळ

By admin | Updated: June 4, 2017 04:08 IST

या परिसरात सलग दुसऱ्या दिवशी थैमान घालणाऱ्या वादळाने अनेक घरांचे पत्रे उडविले असून त्यांना बेघर केले आहे. याच वेळी झालेल्या विजांच्या कडकाटाने सगळ्यांना

- लोकमत न्यूज नेटवर्क

विक्रमगड : या परिसरात सलग दुसऱ्या दिवशी थैमान घालणाऱ्या वादळाने अनेक घरांचे पत्रे उडविले असून त्यांना बेघर केले आहे. याच वेळी झालेल्या विजांच्या कडकाटाने सगळ्यांना भयभीत केले होते. दोन दिवसांमध्ये आलेल्या वादळाने सर्वसामान्याचे मोठे नुकसान केले आहे़ कुणाचे ६०, कुणाचे ३० तर कुणाचे २० ते कुणाचे ७० पत्रे उडाल्याने पावसाच्या पाण्यामध्ये घरातील धान्यांच्या गोण्याच्या गोण्या भिजून गेल्याने मोठयाप्रमाणावर नुकसान झालेले आहेत़ तर अनेकांच्या घरावर झाडे उन्मळून पडल्याने घरे जमीनदोस्त झाली आहेत़तर दुसऱ्या दिवशी झालेल्या या मुसळधार पावसाबरोबर आलेला वादळी वारा व विजेने एकाला आपले प्राण गमवावे लागलेले आहे़ २ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास आदिवासी शेतकरी सोन्या देवजी कुवरा (४५) रा़ शिळ पैकी दांडेकरपाडा हा इसम घराच्या ओटयावर आणखी दोघांसोबत गप्पा मारत असतांना अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला़ मात्र दैवयोगाने बाजूस असलेले इतर दोघे बचावले या सर्वांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय विक्रमगड येथे हलविण्यांत आले़ मात्र सोन्या कुवरा यांचा अगोदरच मृत्यू झाला होता इतर दोघांनाही अ‍ॅडमीट करण्यात आले. तहसिलदार सुरेश सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली व त्याप्रमाणे अहवाल सादर केला व नैसर्गीक आपत्ती म्हणून सोन्या देवजी कुवरा यांच्या कुटुंबियांना तत्काळ ४ लाखाची मदत मंजूर केली. ही रक्कम त्यांच्या पत्नीचे खाते बॅकेमध्ये उघडून त्यात जमा करण्यांत येणार आहे़तसेच इतर सवादे, खांड या गावातील काही लोकांच्या घरासमोरील झाडांवर देखील वीजा पडून त्यांना धक्का बसला असल्याने त्यांचीही चौकशी तहसिलदारांनी त्यांनाही अ‍ॅडमीट करण्यात आले असून त्यांना आता कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे सांगीतले़शेतकऱ्यांच्या घरांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून शासनाच्या जिआरप्रमाणे जर ज्या भागात घराचे नुकसान झाले आहे़ त्याठिकाणी किमान ६५ मि़ मि़ पावसाची नोंद होणे आवश्यक आहे अशा ठिकाणचे पक्के घर पडल्यास ५,२००, साधे घर पडल्यास ३,४०० व साधेघर पूर्णपणे जमीनदोस्त झाल्यास ४,२०० याप्रमाणे भरपाई मिळते़गेल्या दोन वर्षामध्ये अशा प्रकारचा वादळी वारा व पाऊस व वीजा कोसळणे अशी नैसर्गीक आपत्ती आली नव्हती, यावर्षी दोन दिवसांत विक्रमगडमधील वातारवणच बदलून मोठया प्रमाणावर घरांची पडझड झाली आहे़ झाडे, वीजेचे पोल पडण्याचे वीज गायब होण्याचे प्रकार घडले आहेत. ़विजेच्या धक्याने घाबरलेले खांड व सवादे तसेच शिळ येथील काही नागरिंकांच्या घरी जाऊन मी चौकशी केली व त्यांची विचारपूस करुन उपाय योजना करण्यात आली आहे़ तसेच शिळ पैकी दांडेकरपाडा येथील सोन्या देवजी कुवरा हा इसम विजेच्या धक्याने मृत्यू पावला असून त्यांच्या कुंटुंबांला नैसर्गिक आपत्ती म्हणून शासनाकडून तत्काळ ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यांत आली आहे व लवकरच ही रक्कम त्यांच्या पत्नीच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे़-सुरेश सोनवणे, तहसिलदार विक्रमगड