शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

जव्हारला वादळाचा फटका

By admin | Updated: May 20, 2014 01:55 IST

मोखाडा, जव्हार तालुक्यात रविवारी वादळी पावसाचा फटका ग्रामीण भागातील आदिवासींच्या घरांना बसला.

जव्हार : मोखाडा, जव्हार तालुक्यात रविवारी वादळी पावसाचा फटका ग्रामीण भागातील आदिवासींच्या घरांना बसला. यात खेडोपाड्यातील व शहरातील असंख्य घरांचे पत्रे उडाले असून शेकडो आदिवासींचे आर्थिक नुकसान होऊन ते बेघर झालेले आहेत. जव्हारमध्ये दुपारी ३.०० नंतर सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि पहाता पहाता खेडोपाड्यातील कौलारू पत्रांच्या घरांचे पत्रे, कौले, वार्‍यामुळे उडायला सुरुवात झाली. कुडाच्या घराचे तर घरच शिल्लक राहिलेले नाही. पावसाळ्यापूर्वी वादळी वार्‍यासह अचानक आलेल्या पावसाने काही भागात कहर केला. मोठ - मोठी झाडे रस्त्यावर पडलेली होती. खेडोपाड्यातील आदिवासींच्या कच्चा घरांची अवस्था तर याहूनही भयानक अशीच झाली. खेडोपाड्यातील असंख्य शेतकर्‍यांच्या शेतातील लाखो रूपये खर्च करून बांधलेल्या शेडनेट, पॉली हाऊस, विहिरी या बांधकामांचे वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने लाखोंचे नुकसान झाले आहे. शहरातही सोसाट्याचा वारा सुटला होता. ज्या ज्या लोकांनी घरासमोरी, दुकानासमोर पडव्या लावल्या होत्या, त्या क्षणार्धात उडाल्या आणि दुकाने उघडी पडली. कुणाच्या घराचे पत्रे उडाले, तर कुणाच्या घराची कौले उडाली. अशा नैसर्गिक आपत्तीमुळे जव्हारमध्ये शेकडो लोकांचे आर्थिक नुकसान होऊन हाहाकार झाला होता. जव्हारमध्ये वारा सुरू झाल्यामुळे पाऊस पडला नाही, त्यामुळे दुकानांचे व मालाचे नुकसान झालेले नाही. वादळी वार्‍यामुळे संपूर्ण शहरात धूळ पसरून काळोख पडला होता. रस्त्यांवर कचर्‍याचा व पाल्याचा खच पडला होता. नुकसान भरपाईसाठी खेडोपाड्यातील आदिवासी बांधवांनी तहसील कार्यालयाकडे अर्ज केलेले आहेत व त्याचे पंचनामे करण्याचे काम तलाठी करीत आहेत. (वार्ताहर)