शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारला वादळाचा फटका

By admin | Updated: May 20, 2014 01:55 IST

मोखाडा, जव्हार तालुक्यात रविवारी वादळी पावसाचा फटका ग्रामीण भागातील आदिवासींच्या घरांना बसला.

जव्हार : मोखाडा, जव्हार तालुक्यात रविवारी वादळी पावसाचा फटका ग्रामीण भागातील आदिवासींच्या घरांना बसला. यात खेडोपाड्यातील व शहरातील असंख्य घरांचे पत्रे उडाले असून शेकडो आदिवासींचे आर्थिक नुकसान होऊन ते बेघर झालेले आहेत. जव्हारमध्ये दुपारी ३.०० नंतर सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि पहाता पहाता खेडोपाड्यातील कौलारू पत्रांच्या घरांचे पत्रे, कौले, वार्‍यामुळे उडायला सुरुवात झाली. कुडाच्या घराचे तर घरच शिल्लक राहिलेले नाही. पावसाळ्यापूर्वी वादळी वार्‍यासह अचानक आलेल्या पावसाने काही भागात कहर केला. मोठ - मोठी झाडे रस्त्यावर पडलेली होती. खेडोपाड्यातील आदिवासींच्या कच्चा घरांची अवस्था तर याहूनही भयानक अशीच झाली. खेडोपाड्यातील असंख्य शेतकर्‍यांच्या शेतातील लाखो रूपये खर्च करून बांधलेल्या शेडनेट, पॉली हाऊस, विहिरी या बांधकामांचे वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने लाखोंचे नुकसान झाले आहे. शहरातही सोसाट्याचा वारा सुटला होता. ज्या ज्या लोकांनी घरासमोरी, दुकानासमोर पडव्या लावल्या होत्या, त्या क्षणार्धात उडाल्या आणि दुकाने उघडी पडली. कुणाच्या घराचे पत्रे उडाले, तर कुणाच्या घराची कौले उडाली. अशा नैसर्गिक आपत्तीमुळे जव्हारमध्ये शेकडो लोकांचे आर्थिक नुकसान होऊन हाहाकार झाला होता. जव्हारमध्ये वारा सुरू झाल्यामुळे पाऊस पडला नाही, त्यामुळे दुकानांचे व मालाचे नुकसान झालेले नाही. वादळी वार्‍यामुळे संपूर्ण शहरात धूळ पसरून काळोख पडला होता. रस्त्यांवर कचर्‍याचा व पाल्याचा खच पडला होता. नुकसान भरपाईसाठी खेडोपाड्यातील आदिवासी बांधवांनी तहसील कार्यालयाकडे अर्ज केलेले आहेत व त्याचे पंचनामे करण्याचे काम तलाठी करीत आहेत. (वार्ताहर)