शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्याच्या पाइपलाइनचे काम रोखले

By admin | Updated: February 28, 2016 04:05 IST

तारापूर औद्योगिक वसाहतीमधून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर पुरेशी प्रक्रिया न करताच ते पाणी समुद्रात सोडून खाड़ी खाजणातील सर्व मासे संपुष्टात आणले आहेत.

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर पुरेशी प्रक्रिया न करताच ते पाणी समुद्रात सोडून खाड़ी खाजणातील सर्व मासे संपुष्टात आणले आहेत. आता थेट समुद्रात ७.१ किमी दूरवर प्रदूषित सांडपाणी सोडण्यात येऊन मासेमरिचा गोल्डन बेल्ट नष्ट करण्याचा कुटिल डाव एमआयडीसी, एम्पीसीबीकडून आखला जात असल्याच्या निषेधार्थ आज दांडी, आलेवाड़ी, नवापुर इ. भागातील शेकडो मच्छीमार महिला-पुरूषांनी एकजूट दाखवित पाईपलाईन चे काम बंद पाडले. तारापुर औद्योगिक वसाहती मधील कारखान्या मधून दर रोज सुमारे ७० ते ७५ दशलक्ष लीटर प्रदूषित सांडपाण्याची निर्मिती होत असून त्या पैकी फक्त २५ ते ३० दशलक्ष लीटर प्रदूषित पाण्यावर एम्पीसीबीच्या सांडपाणी केंद्रातून प्रक्रिया केली जाते. जास्त क्षमतेच्या प्रक्रिया केंद्राची उभारणीचे काम सुरु असल्याने उर्वरित ४० ते ४५ दशलक्ष लीटर प्रदूषित पाण्याची विल्हेवट खाड़ी, खाजणे, समुद्र, खुली गटारे इ. द्वारे केली जात असल्याने दांडी, नवापुर, आलेवाड़ी, मुरबे, सातपाटी, वडराई, इ.भागातील खाडयाचे पाणी काळे पिवळे पडून मासे, शिंपले इ. मत्स्य संपदा जवळपास नष्ट झाली आहे. या विरोधात अनेक निवेदन, मोर्चे आंदोलने काढूनही काही कंपन्यावर प्रदूषण मंडळाकडून थातुरमातुर कारवाई केली जाते होती. कडक कारवाई केल्यास कंपन्या बंद पडून रोजगार बंद पडेल अशी भीति स्थानिकांना कंपन्यांच्या हितचिंतकांकडून दाखविली जात आहे.नावपूरच्या समुद्र किनारी ११० कोटी रुपयांच्या योजने अंतर्गत १ हजार मिलीमीटर व्यासाचे एचडीपीई पाइप एकमेकांना जोडून समुद्रात नेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असताना महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती,अखिल मांगेला समाज परिषद्, पोफरण दांडी मच्छीमार सहकारी संस्था, इ.संघटनांनी या पाइपलाइन टाकण्याास विरोध दर्शविला होता. तरीही याची कुठलीही गंभीर दखल न घेता या कामाचा ठेका घेणाऱ्या एस एमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपले काम सुरूच ठेवले होते. त्या मुळे काम थांबविण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या.जिल्हाधिकारी, एमआयडीसी, प्रदुषण मंडळ यांच्याशी प्रथम चर्चा करा त्या नंतरच कामाला सुरुवात करा. असे कळवले असताना जोपर्यंत पर्यायी मार्ग निघत नाही तो पर्यंत ठेकेदाराने काम सुरु करू नये असे पत्र पोफरण संस्था अध्यक्ष विजय तामोरे, जी. प. सदस्य तुळसीदास तामोरे, सेनेचे सुधीर तामोरे, भावेश तामोरे इ. नी दिले. या पत्रावर नवापूर ग्राम पंचायतीचे सदस्य संतोष पागधरे, खगेश पागधरे, इ. सह रोहित बारी, विजय बारी इ. नी आक्षेप घेतला. याच पाइपलाइन संदर्भात टीमा मध्ये जनसुनवाई झाली असताना आम्हाला कुणीही पाठिंबा दर्शवल नाही. आम्हाला मिळणारा ४० लाख रुपयांचा टॅक्स आता सर्वांच्या डोळ्यावर येत असल्याच्या प्रतिक्रिया त्यानी व्यक्त करुन गावातील पाइपलाइनचे काम आम्ही बंद करू देणार नाही असा पवित्रा नवापुर मधील काही निवडक मंडळींनी घेतल्या नंतर दोन गटात बाचाबाची झाली. (वार्ताहर)