शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

वसई तालुक्यात भात पेरण्यांची लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:23 IST

बियाणांची थैली ५० रुपयांनी महागली; मजुरांची टंचाई, ट्रॅक्टरचे भाडेही महागले

पारोळ : वसई तालुक्यात रोहिणी कोरडी गेल्या नंतर मृगात पावसाने हलकी सुरु वात केल्याने शेतकऱ्यांंनी भात पेरणीला सुरु वात केली. मात्र दोन दिवसांपासून कडक ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांंमध्ये चिंतेचे वातावरण असून पाऊस पडला नाही तर पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.या तालुक्यात सर्वात जास्त घेण्यात येणाºया भाताच्या पेरण्यांना सुरवात झाली आहे. त्यासाठी लागणारे बियाणे म्हणून भाताच्या वाणासह इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकºयांंची कृषिसेवा केंद्रांवर गर्दी दिसून येत आहे . तसेच नांगरणीसाठी ट्रॅक्टर भाड्याने लागलीच मिळावे म्हणून ट्रॅक्टर मालकांकडे खेटे मारणे सुरु झाले असून तो लागलीच मिळावा म्हणून शेतकरी प्रयत्नशील आहेत.चालू वर्षाच्या खरीप हंगामाला तालुक्यात सुरवात झाली असून पेरणीसाठी लागणारे सुधारित व संकरित भात बियाणे, खते ,औषधे ,यांची जुळवा जुळव करण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रावर गर्दी करत आहेत . मात्र चालू वर्षी दरसाल वाढणाºयां महागाईचा परिणाम जाणवत असून खते, बियाणे, औषधे यांच्या सह लागणारी औजारे, नांगरणीसाठी ताशी भाड्याने घेण्यात येणारे ट्रॅक्टर यांचे भाव साधारण ५ ते १५ टक्के वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत .मागील वर्षी च्या तुलनेत भात बियाण्यांच्या १० किलोच्या एका पिशवीचा असलेला दर चालू वर्षी ५० रु पयांनी वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत . वाढती महागाई, मजुरांची टंचाई, वरुण राजाचा लहरीपणा, रोगराई यांचा सामना करून लागवड केलेली शेती पिकली तरी पिकाला मिळणारा भाव यांची सांगड घालताना वरील कारणांमुळे पारंपारिक पद्धतीने केली जाणारी भात शेती न परवडणारी असून दुसरे काही उत्पन्नाचे साधन नसल्याने खोट खाऊन भात शेती कसावी लागत असल्याचे शेतकºयांंचे म्हणणे आहे .यामुळे तालुक्यातील अनेक शेतकºयांंनी भात लागवडीकडे पाठ फिरवली आहे.वसई तालुक्यात ८६४७ हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड होत असून मागील वर्षी ७७३३ हेक्टर मध्ये भात लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षी हेक्टर मागे २५८० किलो भात पिकाचे उत्पादन झाल्याची कृषी विभागाने माहीती दिली. पण या वर्षी पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.