शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

वसई तालुक्यात भात पेरण्यांची लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:23 IST

बियाणांची थैली ५० रुपयांनी महागली; मजुरांची टंचाई, ट्रॅक्टरचे भाडेही महागले

पारोळ : वसई तालुक्यात रोहिणी कोरडी गेल्या नंतर मृगात पावसाने हलकी सुरु वात केल्याने शेतकऱ्यांंनी भात पेरणीला सुरु वात केली. मात्र दोन दिवसांपासून कडक ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांंमध्ये चिंतेचे वातावरण असून पाऊस पडला नाही तर पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.या तालुक्यात सर्वात जास्त घेण्यात येणाºया भाताच्या पेरण्यांना सुरवात झाली आहे. त्यासाठी लागणारे बियाणे म्हणून भाताच्या वाणासह इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकºयांंची कृषिसेवा केंद्रांवर गर्दी दिसून येत आहे . तसेच नांगरणीसाठी ट्रॅक्टर भाड्याने लागलीच मिळावे म्हणून ट्रॅक्टर मालकांकडे खेटे मारणे सुरु झाले असून तो लागलीच मिळावा म्हणून शेतकरी प्रयत्नशील आहेत.चालू वर्षाच्या खरीप हंगामाला तालुक्यात सुरवात झाली असून पेरणीसाठी लागणारे सुधारित व संकरित भात बियाणे, खते ,औषधे ,यांची जुळवा जुळव करण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रावर गर्दी करत आहेत . मात्र चालू वर्षी दरसाल वाढणाºयां महागाईचा परिणाम जाणवत असून खते, बियाणे, औषधे यांच्या सह लागणारी औजारे, नांगरणीसाठी ताशी भाड्याने घेण्यात येणारे ट्रॅक्टर यांचे भाव साधारण ५ ते १५ टक्के वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत .मागील वर्षी च्या तुलनेत भात बियाण्यांच्या १० किलोच्या एका पिशवीचा असलेला दर चालू वर्षी ५० रु पयांनी वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत . वाढती महागाई, मजुरांची टंचाई, वरुण राजाचा लहरीपणा, रोगराई यांचा सामना करून लागवड केलेली शेती पिकली तरी पिकाला मिळणारा भाव यांची सांगड घालताना वरील कारणांमुळे पारंपारिक पद्धतीने केली जाणारी भात शेती न परवडणारी असून दुसरे काही उत्पन्नाचे साधन नसल्याने खोट खाऊन भात शेती कसावी लागत असल्याचे शेतकºयांंचे म्हणणे आहे .यामुळे तालुक्यातील अनेक शेतकºयांंनी भात लागवडीकडे पाठ फिरवली आहे.वसई तालुक्यात ८६४७ हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड होत असून मागील वर्षी ७७३३ हेक्टर मध्ये भात लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षी हेक्टर मागे २५८० किलो भात पिकाचे उत्पादन झाल्याची कृषी विभागाने माहीती दिली. पण या वर्षी पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.